AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन वर्षातून एकदाच येते ही एकादशी, व्रताने होतात सर्व मनोकामना पूर्ण

यंदा ही एकादशी 29 जुलै म्हणजेच उद्या शनिवारी आहे. शास्त्रानुसार कमला एकादशीचे व्रत केल्यास सौभाग्य, संतती आणि सुख प्राप्त होते. भगवान श्रीकृष्णाने या तिथीला सर्वोत्तम तिथी म्हटले आहे.

तीन वर्षातून एकदाच येते ही एकादशी, व्रताने होतात सर्व मनोकामना पूर्ण
एकादशीImage Credit source: Social media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 28, 2023 | 11:47 AM
Share

मुंबई : तीन वर्षातून एकदा म्हणजे अधिक महिन्यात पुरुषोत्तमी एकादशी येते. याच एकादशीला कमला किंवा पद्मणी एकादशी (Padmini Ekadashi) म्हणूनही ओळखले जाते. यंदा ही एकादशी 29 जुलै म्हणजेच उद्या शनिवारी आहे. शास्त्रानुसार कमला एकादशीचे व्रत केल्यास सौभाग्य, संतती आणि सुख प्राप्त होते. भगवान श्रीकृष्णाने या तिथीला सर्वोत्तम तिथी म्हटले आहे. या व्रताचे पालन केल्याने मनुष्याचे सुख, सौभाग्य वाढते आणि भगवान विष्णूसह श्री महालक्ष्मीजींची कृपा प्राप्त होते.

पुरुषोत्तमी एकादशीचे महत्त्व

शास्त्रानुसार पुरुषोत्तमी एकादशीचे व्रत केल्यास सौभाग्य, संतती आणि सुख प्राप्त होते. या दिवशी घरी नामजप केल्याने दुप्पट फायदा होतो तर गोशाळेत शंभर पट,  तुळशीजवळ हजार पट आणि तुळशी जवळ जनार्दनाची पूजा करून जप केल्यास लाख पटीने फलप्राप्ती होते. तसेच जनार्दन, शिव आणि विष्णूच्या परिसरात जप केल्याने कोटीने फळ मिळते.

पुरुषोत्तमी एकादशीची पूजाविधी

या दिवशी सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा करावी. पूजेच्या ठिकाणी ईशान्य कोपऱ्यात एका चैरंगावर सात प्रकारचे धान्य ठेवून त्यावर पाण्याचा कलश ठेवावा आणि आंब्याच्या पानांनी सजवावे. त्यानंतर भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो स्थापित केल्यानंतर पिवळी फुले, हंगामी फळे, तुळस इत्यादी अर्पण करावे आणि धूप-दीप आणि कापूरने भगवान विष्णूची आरती करावी. या दिवशी विष्णूजी आणि तुळशीच्या मंदिरात दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी हरी भक्तांनी निंदा, कपट, लोभ, द्वेष या भावनांपासून दूर राहून यथाशक्ती विष्णूजींच्या ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करावा.

एकादशीची कथा

पौराणिक कथेनुसार, उज्जयिनी नगरात एक ब्राह्मण राहत होता, त्याला पाच पुत्र होते. त्यापैकी सर्वात धाकट्या मुलाचे नाव जयशर्मा होते, जो अधर्मी होऊन पापमार्गाकडे निघून गेला, त्यामुळे त्याचे आई, वडील, भाऊ अत्यंत दुःखी झाले. त्याच्या कूकर्मामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याला सोडून दिले. वाईट कामात मग्न असल्याने काही वेळाने आई-वडिलांनीही त्याला घराबाहेर हाकलून दिले. तो जंगलाकडे निघाला आणि फिरत फिरत एके दिवशी तीर्थराज प्रयागला पोहोचला. भुकेने व्याकूळ होऊन त्यांनी त्रिवेणीत स्नान केले आणि जवळच असलेल्या हरिमित्र मुनींच्या आश्रमात पोहोचला. तेथे ब्राह्मणांनी सर्व पापांचा नाश करणाऱ्या, परम पुण्य देणाऱ्या आणि भोग व मोक्ष देणाऱ्या ‘कमला’ एकादशीचा महिमा सांगितला. जयशर्मा यांनीही कमला एकादशीची कथा विधिवत पाळली आणि ऋषींच्या आश्रमात उपवास केला.

मध्यरात्र झाली तेव्हा भगवती श्रीमहालक्ष्मी त्यांच्याकडे आल्या आणि म्हणाल्या, हे ब्राह्मणपुत्र! कमला एकादशी व्रताचा चांगला परिणाम झाल्यामुळे मी तुमच्यावर खूप प्रसन्न झाले आहे आणि देवाधिदेव श्रीहरीची परवानगी मिळाल्यानंतर मी तुम्हाला वरदान देण्यासाठी आले आहे. जयशर्मा म्हणाले की आई, जर तू माझ्यावर प्रसन्न असेल तर मला ते व्रत सांग, ज्याच्यात ऋषी-मुनी नेहमी गुंतलेले असतात. श्रीमहालक्ष्मी म्हणाल्या – हे ब्राह्मण ! एकादशी व्रताचे माहात्म्य हे श्रोत्यांनी ऐकावे असा सर्वोत्तम विषय आहे, पवित्र गोष्टींमध्ये तो सर्वश्रेष्ठ आहे. यामुळे सर्व पापांचा नाश होऊन अक्षय पुण्य प्राप्त होते. जो मनुष्य या एकादशीचे व्रत भक्तिभावाने पाळतो आणि तिचे माहात्म्य श्रवण करतो, तो सर्व महापापांपासून त्वरित मुक्त होतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. तसेच ही एक पौराणिक कथा आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद