AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parenting Tips | नावातच सर्व काही, बाळाचं नाव ठेवतायं मग बाळाच्या उज्वल भविष्यासाठी 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा नाहीतर…

आजकाल, बाळाचं नाव इतरांपेक्षा हटके ठेवणे ही खुपच कॉमन गोष्ट झाली आहे. सध्या पालक आपल्या मुलांची नावे आपल्या नावांच्या आद्य अक्षरावरुन ठेवतात.पण ज्योतिषशास्त्रात मुलांचे नाव ठेवताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते.

Parenting Tips | नावातच सर्व काही, बाळाचं नाव ठेवतायं मग बाळाच्या उज्वल भविष्यासाठी 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा नाहीतर...
baby
| Edited By: | Updated on: Nov 20, 2021 | 1:41 PM
Share

मुंबई : आजकाल, बाळाचं नाव इतरांपेक्षा हटके ठेवणे ही खुपच कॉमन गोष्ट झाली आहे. सध्या पालक आपल्या मुलांची नावे आपल्या नावांच्या आद्य अक्षरावरुन ठेवतात. अनेक कलाकारांनी तसे केले आहे. पण ज्योतिषशास्त्रात मुलांचे नाव ठेवताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते.

मूल जेव्हा आईच्या पोटात असते, तेव्हापासूनच त्याचे पालक त्याच्या नावापासून त्याच्या आयुष्याचे सर्व नियोजन सुरू करतात. पण ज्योतिषशास्त्रानुसार ते योग्य मानले जात नाही. नामकरण हे सनातन धर्मातील 16 संस्कारांपैकी एक मानले जाते. बाळाचे नाव आयुष्यभर त्याची ओळख म्हणून त्याच्यासोबत राहते. त्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर, आचरणावर आणि नशिबावरही दिसून येतो. त्यामुळे नामकरण नेहमी ज्योतिषशास्त्राचे नियम लक्षात घेऊनच केले पाहिजे. चला तर मग जाणून घेऊयात बाळाचे नाव ठेवण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे असते.

नामकरण करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

राशीनुसार नाव

मुलाचे नाव नेहमी त्याच्या राशीनुसार ठेवा. जन्माच्या वेळी, जेव्हा मुलाची जन्मकुंडली तयार केली जाते, तेव्हा ज्योतिषी आपल्याला मुलाच्या नावाचे अक्षर सांगतात. तुम्ही त्याच अक्षरांनी मुलाचे नाव द्यावे. नावाचे हे अक्षर त्याच्या ग्रह, नक्षत्र आणि राशीच्या सुसंगततेनुसार निश्चित केले जाते.

योग्य दिवसाची निवड

मुलाचे नामकरण समारंभ करण्यापूर्वी, विशेष दिवसाची काळजी घेणे आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्राच्या नियमांनुसार मुलाचे नामकरण विधी जन्मानंतरच्या अकराव्या, सोळाव्या दिवशी करावे. याशिवाय, नामकरण समारंभासाठी पंडितांकडून इतर कोणतीही शुभ तिथी देखील मिळवू शकता. पण पौर्णिमा किंवा अमावस्येला नामस्मरण करू नका.

नक्षत्राची काळजी घ्या

नामकरण समारंभ योग्य नक्षत्रात केला असेल तर तो खूप शुभ मानला जातो. शास्त्रात अनुराधा, पुनर्वसु, मघा, उत्तरा, उत्तराषादा, उत्तराभद्र, शतभिषा, स्वाती, धनिष्ठा, श्रवण, रोहिणी, अश्विनी, मृगशीर, रेवती, हस्त आणि पुष्य नक्षत्र हे नामकरण शुभ मानले गेले आहे.

नावाला अर्थ हवा

आजकाल इंटरनेटवर मुलांची नावे पाहिल्यानंतर तुम्हाला जे आवडते ते नाव ठेवले जाते, परंतु ही पद्धत चुकीची आहे. नाव नेहमीच अर्थपूर्ण असले पाहिजे कारण नावाच्या अर्थाचा मुलाच्या व्यक्तिमत्त्वावरही परिणाम होतो. त्यामुळे बाळासाठी अर्थपूर्ण असे नाव निवडा.

नावाच्या स्पेलिंगचीही काळजी घ्या

अंकशास्त्रातही नावाला महत्त्व दिले आहे. नावाद्वारे नावाची गणना केली जाते, जी व्यक्तीच्या भविष्याबद्दल बरेच काही सांगते. अनेक सेलिब्रेटी त्यांच्या नावाचे स्पेलिंग संख्याशास्त्र तज्ज्ञांमार्फत अनेकदा बदलतात. त्यामुळे पंडिताकडून नावाचे अक्षर मिळाल्यानंतर अंकशास्त्र तज्ज्ञाच्या मदतीने त्याच्या नावाचे स्पेलिंग निश्चित केले तर ते त्याच्यासाठी अधिक शुभ ठरेल.

संबंधित बातम्या :

Mirror Vastu Tips : घरात आरसा कोणत्या दिशेला लावावा, जाणून घ्या आरशाशी संबंधित सर्व महत्त्वाचे वास्तु नियम

Peacock Feather Remedies | मोराचे पिस केवळ वास्तू दोषच नाही तर नकारत्मकाता देखील काढते, जाणून घ्या याचे जादूई उपाय

20 November 2021 Panchang | मार्गशीर्ष महिना कसा असेल? शुभ-अशुभ मुहूर्त कोणते? जाणून घ्या इत्यंभूत माहिती

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.