AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : छोट्या विचारांचे लोक केवळ धनामागे धावतात, तर महान लोकांना सन्मान हवा, चाणक्य यांनी सांगितलं यशस्वी जीवनाचं सूत्र

आर्य चाणक्य हे एक विचारवंत होते, त्यांचे विचार आजच्या काळातही मार्गदर्शकाची भूमिका बजावतात. चाणक्य म्हणतात जे छोट्या विचारांची माणसं असतात, ते आयुष्यभर संपत्तीच्या मागे धावतात, परंतु असे लोक आपल्या आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : छोट्या विचारांचे लोक केवळ धनामागे धावतात, तर महान लोकांना सन्मान हवा, चाणक्य यांनी सांगितलं यशस्वी जीवनाचं सूत्र
Chanakya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 15, 2026 | 8:33 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही लागू होतात. चाणक्य म्हणतात एखादा व्यक्ती महान का होतो तर तो इतरांपेक्षा वेगळा विचार करतो. प्रत्येक व्यक्तीला वाटतं आपलं आयुष्य सुखा समाधानात व्यतीत व्हावं. आपल्याला जगातील सर्व सुख मिळावं. आपल्या कुटुंबाला कोणत्याही गोष्टीची कमी पडता कामा नये. आपलं कुटुंब आनंदी असलं पाहिजे. मात्र असा जे लोक विचार करतात ते लोक सामान्य असतात. कारण इतर सर्वजण जसा विचार करतात तसाच विचार हे लोक देखील करतात. मात्र जे लोक महान असतात ते कधीही पैशांच्या मागे धावत नाहीत, त्यांना समाजात मान -सन्मान हवा असतो. विचारातील हाच फरक व्यक्तीला महान बनवतो, अशाच व्यक्तीला जगाची मान्यता मिळते असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

पैशांच्या मागे धावू नका –चाणक्य म्हणतात जर तुम्हाला खरोखरच महान बनायचं असेल तर नुसतं पैशांच्या मागे धावू नका, कारण जी व्यक्ती फक्त पैशांच्या मागे धावते, ती व्यक्ती आयुष्यभर आपल्या कुटुंबापुरतीच मर्यादित राहते, अशा व्यक्तीला जगात कधीही सन्मान प्राप्त होऊ शकत नाही. आपण जगाचं काहीतरी देणं लागतो, याची जाणीव माणसानं कायम ठेवावी असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

महान लोकांची ओळख – चाणक्य म्हणतात जे महान लोक असतात ते आपल्या कुटुंबाचा चांगल्या पद्धतीने सांभाळ तर करतातच परंतु आपण जगाचं काहीतरी देणं लागतो ही जाणीव त्यांना कायम असते. अशा लोकांना जगात सन्मान प्राप्त होतो. अशी लोक आपल्या मृत्यूनंतर देखील आपल्या विचाराने जगात जिवंत राहतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत?
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स
'पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता १० लाखांचा दंड'
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; मराठवाडा दौरा रद्द
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू