AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Premanand Maharaj : थंड पाण्याने अंघोळ करावी की गरम पाण्याने? पाहा प्रेमानंद महाराज काय म्हणाले?

प्रेमानंद महाराज हे वृंदावनातील प्रसिद्ध संत आहेत, त्यांची प्रवचनं देशभरात प्रसिद्ध आहेत. त्यांची प्रवचनं ऐकण्यासाठी त्यांचे भक्त मोठी गर्दी करत असतात. आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून प्रेमानंद महाराज आपल्या भक्तांच्या शंका दूर करून त्यांचं समाधान करतात.

Premanand Maharaj : थंड पाण्याने अंघोळ करावी की गरम पाण्याने? पाहा प्रेमानंद महाराज काय म्हणाले?
प्रेमानंद महाराज Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 07, 2025 | 8:24 PM
Share

जसे-जसे नव नवीन शोध लागत आहेत, हातात पैसा उपलब्ध होत आहे, तशी-तशी मानवाची ओढ ही अधिक आरामदायी गोष्टींकडे वाढत चालली आहे. माणसाच्या हातात ज्या प्रमाणात पैसा येत आहेत, त्याचप्रमाणात त्याच्या गरजा देखील वाढत आहेत. तो अधिक आरामदायी जीवनशैलीचा शोध घेत आहे. मानवाच्या गरजा सध्याच्या काळात एवढ्या वाढल्या आहेत की, त्याच्याजवळ सर्व काही असून देखील तो समाधानी नाही. म्हणजे जर शेजारी असलेल्या एखाद्या व्यक्तीने एखादी वस्तू घेतली की लगेचच ती आपल्याला देखील हवी असते. जर ती आपल्याला मिळाली नाही की आपण अस्वस्थ होतो. मन कायम अशांत असतं. यातून अनेक आजार देखील निर्माण झाले आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळी वाहनांची एवढी उपलब्धता नव्हती, तेव्हा लोक पायीच प्रवास करायचे, त्यामुळे लोक निरोगी होते. मात्र आता वाहनांमुळे चालन थांबल्यानं सध्या अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. याचप्रमाणे पूर्वी अनेक लोक गार पाण्यानेच अंघोळ करायचे, पण आता गिझर आलं आहे. लोक गरम पाण्यानेच अंघोळ करतात. अंघोळीची योग्य पद्धत कोणती? अंघोळ गार पण्याने करावी की गरम पाण्याने याबाबत प्रेमानंद महाराज यांनी माहिती दिली आहे.

प्रेमानंद महाराज म्हणतात माणसानं नेहमी गार पाण्यानेच अंघोळ केली पाहिजे, गरम पाण्याने अंघोळ करू नये. माणसानं सुख सुविधांचा लाभा घ्यावा, मात्र तो इतका देखील घेऊ नये, की ज्यामुळे तुमची आंतरिक शक्ति कमजोर होईल. तुम्ही जेव्हा गरम पाण्यानं अंघोळ करता, तेव्हा तुम्हाला तेवढ्या पुरता आराम तर मिळतो. मात्र हळूहळू तुमची ऊर्जा नष्ट होऊ लागते, तुमच्या शरीरामध्ये ती ताकद राहत नाही, मग तुम्ही थंडीला घाबरू लागता, तुम्हाला थंड पाण्याची भीती वाटू लागते.

याच्या उलट तुम्ही जेव्हा गार पाण्यानं अंघोळ करता त्याचा फायदा असा होतो की तुमचं शरीर बळकट बनतं. तुमच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते, तुम्ही आजारी पडत नाही, एकवेळ अशी येते की कितीही वातावरणात बदल झाला तरी देखील तुम्ही आजारी पडत नाहीत. कारण तुम्ही दररोज थंड पाण्यानं अंघोळ करत असता, असं प्रेमानंद महारज यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?.
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं.
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान.
गॅससिलेंडरवरून राजकारण तापलं;अफवांमुळे रांगा लागल्याचा फडणवीसांचा दावा
गॅससिलेंडरवरून राजकारण तापलं;अफवांमुळे रांगा लागल्याचा फडणवीसांचा दावा.
इंधन टंचाईवरून राजकारण तापलं; संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा
इंधन टंचाईवरून राजकारण तापलं; संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा.
मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात? 2017 चा मोठा नियम मोडला
मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात? 2017 चा मोठा नियम मोडला.
LPG चं टेंशन संपणार! नागरिकांना मोठा दिलासा, चंद्रपूरमधून....
LPG चं टेंशन संपणार! नागरिकांना मोठा दिलासा, चंद्रपूरमधून.....