AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shani Dosh : तुमच्यावर तर नाही ना शनिची वक्र दृष्टी? शनिदोष असल्यास येतात असे अनुभव

सूर्यपुत्र शनीचा विवाह चित्ररथ नावाच्या गंधर्वाच्या कन्येशी झाला, जी स्वभावाने अत्यंत तापट होती. एकदा शनिदेव देवाची आराधना करत असताना त्यांची पत्नी ऋतुस्नानानंतर भेटण्याच्या इच्छेने त्यांच्याकडे पोहोचली.

Shani Dosh : तुमच्यावर तर नाही ना शनिची वक्र दृष्टी? शनिदोष असल्यास येतात असे अनुभव
शनिदेवImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 14, 2023 | 11:11 PM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रात शनिला न्यायदेवता म्हटले आहे. पुण्य आणि पापाच्या आधारे ते प्रत्येकाला फळ देतात. हा क्रोधी ग्रह मानला जातो. यामुळे शनिदेवाची (Shanidev) वक्र दृष्टी ज्याच्यावर पडते त्याचे वाईट दिवस सुरू होतात. आज आम्ही तुम्हाला शनिदेवाची दृष्टी अशुभ का मानली जाते ते सांगत आहोत. शनिदेवाची तुमच्यावर वक्र दृष्टी आहे हे कसे ओळखावे आणि त्याचा प्रभाव कसा टाळावा हेही जाणून घेणार आहोत.

शनिची दृष्टी वाईट का मानली जाते?

सूर्यपुत्र शनीचा विवाह चित्ररथ नावाच्या गंधर्वाच्या कन्येशी झाला, जी स्वभावाने अत्यंत तापट होती. एकदा शनिदेव देवाची आराधना करत असताना त्यांची पत्नी ऋतुस्नानानंतर भेटण्याच्या इच्छेने त्यांच्याकडे पोहोचली. पत्नीने आपल्या सौंदर्याने त्यांना भुरळ घालण्याचा प्रयत्न केला पण ध्यानस्थ बसलेल्या शनिदेवांनी डोळे उघडले नाही. त्यानंतर त्यांच्या पत्नीने संतापून शनिदेवाला शाप दिला की शनिदेव जेव्हा कोणाला पाहतील तेव्हा त्या व्यक्तीचे नुकसान होईल. शनिदेवाच्या पत्नीने शाप देताना सांगीलले की शनिदेवाचे कोणालातरी दर्शन होणे आणि शनिदेवाला दुसर्‍याने भेटल्याने त्या व्यक्तीचे नुकसान होईल. त्याच्या आयुष्यात संकटांचा डोंगर कोसळेल. त्या व्यक्तीला शनिदेवाचा तीव्र प्रकोप सहन करावा लागेल.

शनीच्या अशुभ दृष्टीची काय कारणे आहेत

  1.  शनीच्या साडेसाती किंवा अडीचकी असणाऱ्यावर प्रभाव असतो.
  2.  शनीच्या महादशा वर.
  3.  कुंडलीत शनि अशुभ स्थानी (3, 7 किंवा 10व्या घरात) बसलेला असेल तर.

शनीची वाईट नजर एखाद्यावर पडल्यास काय होते?

  1. पायाशी संबंधित कोणताही आजार होऊ शकतो.
  2. तुम्हाला तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करून व्याक्ती मिळते आणि तुम्हाला त्या कामाचे श्रेयही मिळत नाही.
  3. सतत पैशाचे नुकसान होत आहे.
  4. पाळीव प्राणी (जसे की काळा कुत्रा किंवा म्हैस) मरू शकतो.
  5. केलेले काम बिघडू शकते. खूप मेहनत करूनही त्याला थोडेफार फळ मिळते.
  6. काही खोटे आरोप होऊ शकतात, कोर्टात चकरा माराव्या लागतील.
  7. नोकरदारांना कार्यालयात अडचणींचा सामना करावा लागतो.
  8.  एखादी महागडी वस्तू हरवली किंवा चोरीला जाऊ शकते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.