AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shanidosh Upay : उडदाच्या डाळीचे हे प्रयोग आहेत अत्यंत प्रभावी, आर्थिक समस्या लगेच होते दूर

Shanidosh Upay धार्मिक मान्यतेनुसार ज्या व्यक्तीवर शनिदेव प्रसन्न होतात, त्याला जीवनात अपार प्रगती तर प्राप्त होतेच शिवाय त्याचबरोबर व्यक्तीला शनिदोषापासूनही मुक्ती मिळते. असे अनेक उपाय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत.

Shanidosh Upay : उडदाच्या डाळीचे हे प्रयोग आहेत अत्यंत प्रभावी, आर्थिक समस्या लगेच होते दूर
उडदाच्या डाळीचे उपायImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 05, 2023 | 10:32 AM
Share

मुंबई : न्यायदेवता शनिदेवाची शनिवारी पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार ज्या व्यक्तीवर शनिदेव प्रसन्न होतात, त्याला जीवनात अपार प्रगती तर प्राप्त होतेच शिवाय त्याचबरोबर व्यक्तीला शनिदोषापासूनही (Shanidosh Upay) मुक्ती मिळते. असे अनेक उपाय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत, ज्याचा उपयोग जीवनात सुख, समृद्धी आणण्यासाठी केला जाऊ शकतो. एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या-वाईट कर्मानुसार भगवान शनि फळ देतात. जे चांगले कर्म करतात त्यांना शुभ फळ मिळते आणि जे वाईट कर्म करतात त्यांना अशुभ फळ मिळते. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात उडदाच्या डाळीशी संबंधित काही उपाय सांगण्यात आले आहेत. असे म्हणतात की हे उपाय खुप फलदायी आहेत. यामुळे संपत्ती वाढते आणि व्यक्तीला सौभाग्य प्राप्त होते. उडीद डाळीचे काही सोपे उपाय जाणून घेऊया.

उडीद डाळीचा हे उपाय शनिवारी करा

  1.  जर एखादी व्यक्ती शनिदोषाने त्रस्त असेल तर उडीद डाळीचा हा उपाय खूप प्रभावी ठरू शकतो. शनिवारी पूर्ण विधीपूर्वक शनिदेवाची पूजा करा. पूजेत उडीद डाळ वापरावी. यानंतर, आपल्या डोक्यातून 3-4 दाणे ओवाळा आणि कावळ्याला खाऊ घाला. यामुळे शनिदोषाचा प्रभाव कमी होईल.
  2. ज्योतिष शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या कामात वारंवार अडथळा येत असेल, खूप प्रयत्न करूनही काम पूर्ण होत नसेल तर शनिवारी संध्याकाळी उडीद डाळीचे काही दाणे घेऊन पिंपळाच्या झाडाखाली ठेवा आणि मागे वळून पाहू नका.  हा उपाय सतत 11 दिवस केल्याने कामातील अडथळा दूर होईल.
  3. याशिवाय ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती खराब असेल तर शनिवारी रात्री एका भांड्यात मोहरीचे तेल टाकून डोक्याजवळ ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी या तेलात उडीद डाळीचे पोळे बनवून गरिबांना खायला द्यावे. असे म्हटले जाते की यामुळे संपत्ती येते आणि आर्थिक स्थिती देखील मजबूत होते.
  4. ज्योतिष शास्त्रानुसार, जर अनेक लोक नवीन व्यवसाय सुरू करत असतील तर एखादी लोखंडी वस्तू खरेदी करून आणा. ज्या दुकानात किंवा तुम्ही व्यवसाय करणार आहात त्या ठिकाणी ठेवा आणि त्यावर स्वस्तिक बनवा. यानंतर उडीद डाळीचे काही दाणे येथे ठेवा. असे केल्याने व्यवसायात प्रगती होते असे म्हणतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... गांधींवर मस्केंची टीका
Naresh Maske | दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... राहुल गांधींवर नरेश मस्केंची बोचरी टीका!
देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार मुंबईसाठी २३८ एसी लोकल मंजूर
मुंबईला मिळणार २३८ एसी लोकल; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार
मुंबईत डोमिनोजच्या तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मुंबईत डॉमिनोजवर एफडीएची कारवाई: तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आमदारांच्या...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आज आमदारांच्या अपात्रतेवरुन युक्तीवाद, थेट....
बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
Mallikarjun Kharge | माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?