AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kojagiri Purnima : शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशात दूध का आटवले जाते? कोजागिरी पौर्णिमेचे शास्त्रीय आणि आध्यात्मिक महत्त्व

आज कोजागिरी पौर्णिमा आहे. चंद्राच्या प्रकाशात दूध आटवण्याला विशेष महत्त्व आहे. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता, त्यामुळे ही तिथी धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानली जाते. या दिवशी श्रीकृष्ण अवतार, धनाची देवी लक्ष्मी आणि सोळा कलेच्या चंद्राची पूजा केल्याने विविध वरदान प्राप्त होतात.

Kojagiri Purnima : शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशात दूध का आटवले जाते? कोजागिरी पौर्णिमेचे शास्त्रीय आणि आध्यात्मिक महत्त्व
कोजागिरी पौर्णिमाImage Credit source: Social Media
| Updated on: Oct 28, 2023 | 11:14 AM
Share

मुंबई : आज शरद पौर्णिमा आहे. याला आपण कोजागिरी पौर्णिमासुद्धा (Kojagiri Purnima) म्हणतो. कोजागिरी म्हंटल की डोळ्यासमोर येते ते आटवलेल्या घट्ट दुधाने भरलेला पेला, भुलाबाईचे गाणे, घरच्या मोठ्या मुलाचे औक्षवण आणि धम्माल मस्ती! कोजागिरी पौर्णिमेला दरवर्षी हिवाळ्याची सुरूवात होते. निरभ्र आकाशात चांदण्यांच्या प्रकाशात काजु, बदाम आणि चारोळ्या टाकून दुध आटवले जाते. या पद्धतीला आध्यात्मिक महत्त्व तर आहेत पण यामागे शास्त्रीय कारणही आहे. कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यामागे दोनीही दृष्टीकोनातून आपण महत्त्व जाणून घेऊया.

कोजागिरी पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात दूधआटवण्यामागचे शास्त्रीय कारण

कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा पृथ्वीच्या जवळ असतो. चंद्राच्या प्रकाशात विशेष सकारात्मक उर्जा असते. या दिशी रात्री चंद्राच्या प्रकाशात दुध आटवल्याने त्याची किरणे दूधात पडतात. हिवाळ्याची सुरूवातीच्या काळात शरद पौर्णिमा येते. ऋतू बदल झाल्यानंतर अनेक संक्रमीत आजार बळावतात. तसेच आपल्या या काळात आपल्या शरिराला विशेष उर्जेची गरज असते. चंद्राच्या प्रकाशात आटवलेले दुध पिल्याने रोगप्रतीकारक शक्ती वाढते. या निमीत्त्याने मित्र मंडळी आणि परिवारातील सदस्य एकत्र येतात. भेटीगाठी होतात. त्यामुळे याला सामाजीक दृष्टीकोणातूनही महत्त्वाचे मानले जाते.

कोजागिरी पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व

पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता, त्यामुळे ही तिथी धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानली जाते. या दिवशी श्रीकृष्ण अवतार, धनाची देवी लक्ष्मी आणि सोळा कलेच्या चंद्राची पूजा केल्याने विविध वरदान प्राप्त होतात. शरद पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. या दिवशी चंद्रप्रकाश सर्वात तेजस्वी असतो. या दिवशी चंद्रप्रकाशातून अमृतवृष्टी होते, या श्रद्धेमुळे लोकं दूध आटवून ती चंद्रप्रकाशात ठेवतात, जेणेकरून चंद्राची किरणे त्यात पडतील. हे दूध सर्वांना प्रसाद म्हणून दिले जाते. यावेळी शरद पौर्णिमा 28 ऑक्टोबर म्हणजेच आज आहे.

दूध आटवताना या गोष्टीची काळजी घ्या

शरद पौर्णिमेच्या रात्री दूध आटवणे खूप शुभ मानले जाते. ज्योतिषांच्या मते ग्रहणाचा सुतक कालावधी सुरू होण्यापूर्वी दुध आटवावे. या दिवशी सुतक सुरू होण्यापूर्वी दुधात तुळशीची पाने टाकावीत. चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी तुम्ही ही दूध चंद्रप्रकाशात ठेवू शकता. पण, लक्षात ठेवा की ग्रहण सुरू होण्यापूर्वी ते घरात घेऊन यावे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ? मिसळ महागणार?
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ? मिसळ महागणार?.
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह.
युद्ध भारताच्या सीमेवर आलंय, तरी षंडाची शांतता; राऊतांचा सरकारवर हल्ला
युद्ध भारताच्या सीमेवर आलंय, तरी षंडाची शांतता; राऊतांचा सरकारवर हल्ला.
राहुल गांधींकडे महत्त्वाची माहिती! संजय राऊतांचा मोठा खुलासा
राहुल गांधींकडे महत्त्वाची माहिती! संजय राऊतांचा मोठा खुलासा.
शेअर बाजारात वाढ! सेन्सेक्स 500 अकांनी तर निफ्टी 150 अकांनी वधारला
शेअर बाजारात वाढ! सेन्सेक्स 500 अकांनी तर निफ्टी 150 अकांनी वधारला.
दादांच्या अपघात प्रकरणी विमान कंपनीला वाचवल्याचा राऊतांचा आरोप
दादांच्या अपघात प्रकरणी विमान कंपनीला वाचवल्याचा राऊतांचा आरोप.
एपस्टिन फालईल हेच युद्धाचं खरं कारण! संजय राऊतांचा मोठा दावा
एपस्टिन फालईल हेच युद्धाचं खरं कारण! संजय राऊतांचा मोठा दावा.
युद्धाचा ड्रायफ्रुटच्या बाजाराला फटका; किमतीत 10 ते 5 टक्क्यांची वाढ
युद्धाचा ड्रायफ्रुटच्या बाजाराला फटका; किमतीत 10 ते 5 टक्क्यांची वाढ.
बंगळूरु हॉटेल्स बंद होणार? एलपीजी पुरवठा अचानक थांबला
बंगळूरु हॉटेल्स बंद होणार? एलपीजी पुरवठा अचानक थांबला.
एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबईतील हॉटेल्स 2 दिवसांत बंद होणार?
एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबईतील हॉटेल्स 2 दिवसांत बंद होणार?.