AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shattila Ekadashi 2023: उद्या षटतीला एकादशी, काय आहे या एकादशीचे महत्व?

यावर्षी षटतीला एकादशीचे व्रत 18 जानेवारीला म्हणजेच उद्या पाळले जाणार आहे. या व्रताचे कोणकोणते नियम आहेत ते जाणून घेउया.

Shattila Ekadashi 2023: उद्या षटतीला एकादशी, काय आहे या एकादशीचे महत्व?
एकादशीImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 17, 2023 | 10:32 AM
Share

मुंबई, माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला षटतीला एकादशीचे (Shatatila Ekadashi 2023) व्रत केले जाते. या दिवशी भगवान विष्णूची आराधना आणि नियमानुसार उपवास केल्याने इच्छित फळ मिळते, असे सांगितले जाते. या दिवशी जो साधक भगवान विष्णूंना तीळ अर्पण करतो, तिळाचे दान करतो आणि स्वतः तीळ सेवन करतो, त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. यावर्षी षटतीला एकादशीचे व्रत 18 जानेवारीला म्हणजेच उद्या पाळले जाणार आहे. या व्रताचे कोणकोणते नियम आहेत ते जाणून घेउया.

षटतीला एकादशीला या चुका करू नका

1. षटतीला एकादशीच्या दिवशी वांगी आणि तांदूळाचे सेवन करू नये. 2. या दिवशी मांस, मद्य आणि मद्यपान करू नका आणि ब्रह्मचर्य पूर्णत: पाळा. 3. उपवासाचे व्रत घेणाऱ्या साधकाने पलंगाच्या ऐवजी जमिनीवर झोपावे, विश्रांती घ्यावी. 4. षटतीला एकादशीच्या दिवशी वाईट शब्द उच्चारू नका. खोटे बोलणे टाळा. 5. षटतीला एकादशीच्या दिवशी झाडाची फुले, पाने किंवा डहाळे तोडू नका.

हे काम एकादशीला अवश्य करावे

  1. षटतीला एकादशीला तीळ दान करण्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे. तिळापासून बनवलेल्या वस्तूही दान करू शकता.
  2.  या दिवशी श्री हरी भगवान विष्णूला तीळ अर्पण करणे शुभ मानले जाते. या दिवशी भगवान विष्णूला तीळ अर्पण केल्याने मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते असे म्हणतात.
  3.  ज्या व्यक्तीने षटतीला एकादशीचे व्रत घेतले असेल त्यांनी उकडलेले तीळ लावावे आणि पाण्यात तीळ टाकून स्नान करावे.
  4.  षटतीला एकादशीच्या व्रताची कथा ऐकल्यानंतर तीळ अर्पण केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो.

एकादशीचा महिमा

वर्षभरात एकूण 24 एकादशी असतात आणि प्रत्येक एकादशीचे स्वतःचे महत्त्व असते. वैदिक शास्त्रात एकादशीचे व्रत हे सर्वोत्तम आणि सर्वात मोठे व्रत मानले गेले आहे. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, एकादशीच्या उपवासाचा थेट परिणाम मनावर आणि शरीरावर होतो. या व्रताने चंद्राचा प्रत्येक नकारात्मक प्रभाव थांबवला जाऊ शकतो. या व्रताने ग्रहांचा प्रभावही बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान.
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य.
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?.
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट.
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ.
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ट्रॅफिक पोलिस सरसावले
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ट्रॅफिक पोलिस सरसावले.
नार्वेकरांना अधिकार देणं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेची धुरा डाकू....
नार्वेकरांना अधिकार देणं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेची धुरा डाकू.....
आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार
आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीस आणि अमित शाह यांची दिल्लीत बैठक
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीस आणि अमित शाह यांची दिल्लीत बैठक.
सावरकरांवरील माझा लेख मोहन भागवतांनी वाचला नसावा
सावरकरांवरील माझा लेख मोहन भागवतांनी वाचला नसावा.