AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Spiritual: प्रयत्नांना पाहिजे असेल नशिबाची साथ तर सकाळी उठल्यावर ‘या’ गोष्टी नक्की करा

अनेकजण आयुष्यात प्रचंड मेहनत (Hard work)  घेतात. त्यांच्या ध्येयाबद्दल ते सदैव जागरुकही असतात पण बऱ्याचदा त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नाही. यामागे काही तांत्रिक कारणे असू शकतात. हिंदू धर्मात अशा काही गोष्टी किंवा तोडगे सांगण्यात आलेले आहेत ज्यामुळे प्रयत्नांना नशिबाचे (good Luck) पाठबळ लाभते. ज्या गोष्टीसाठी मेहनत घेत आहात त्यांना यश (Success Tips)  मिळण्याची शक्यता वाढते. […]

Spiritual: प्रयत्नांना पाहिजे असेल नशिबाची साथ तर सकाळी उठल्यावर 'या' गोष्टी नक्की करा
| Updated on: Jul 14, 2022 | 9:08 AM
Share

अनेकजण आयुष्यात प्रचंड मेहनत (Hard work)  घेतात. त्यांच्या ध्येयाबद्दल ते सदैव जागरुकही असतात पण बऱ्याचदा त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नाही. यामागे काही तांत्रिक कारणे असू शकतात. हिंदू धर्मात अशा काही गोष्टी किंवा तोडगे सांगण्यात आलेले आहेत ज्यामुळे प्रयत्नांना नशिबाचे (good Luck) पाठबळ लाभते. ज्या गोष्टीसाठी मेहनत घेत आहात त्यांना यश (Success Tips)  मिळण्याची शक्यता वाढते. नशीब चमकणं आणि दुर्दैव, हे सर्व आपल्या दैनंदिन कामे आणि आपल्या कृतींवर अवलंबून असते. सकाळी उठल्यानंतर नेमक्या कोणत्या गोष्टी कराव्यात, ज्या केल्याने नशिबाची साथ आपल्याला लाभेल याबद्दल शास्त्रात अनेक उपाय सांगितले आहेत. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आध्यात्मिकतेची जोड फार आवश्यक असते. प्रयत्नांना सकारात्मक ऊर्जा मिळाल्याने त्याच्या पूर्ततेची शक्यता अधिक वाढते. जाणून घेऊया अशाच काही उपायांबद्दल.

झोपेतून उठल्यावर तळहाताकडे पहा

अनेकदा तुम्ही ऐकले असेल की सकाळी उठल्यावर आपला तळहाता पाहावा. धार्मिक मान्यतेनुसार माता लक्ष्मी, माता सरस्वती आणि भगवान विष्णू आपल्या दोन्ही तळहातामध्ये वास करतात, त्यामुळे सकाळी उठून दोन्ही हात जोडून ‘कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती। करमूले तु गोविन्द: प्रभाते करदर्शनम्।।’ असा जप करा आणि नंतर हाताच्या तळव्यांकडे पहा.

गायत्री मंत्राचा जप करा

हिंदू धर्मात असे अनेक मंत्र आहेत, ज्यांच्या जपाचा धार्मिक ग्रंथात उल्लेख आहे. त्यापैकी एक गायत्री मंत्र आहे. गायत्री मंत्राचा नियमित जप केल्याने जीवनात सकारात्मकता येते आणि दारिद्र्य दूर होते. याशिवाय त्या व्यक्तीला आयुष्यातील प्रत्येक कामात यश मिळते.

तुळशीजवळ दिवा लावावा

हिंदू धर्मात प्रत्येक घरात तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते. जर तुम्हालाही तुमच्या दुर्दैवाचे रुपांतर सौभाग्यामध्ये करायचे असेल तर सकाळी नियमितपणे उठून स्नान करून तुळशीला तुपाचा दिवा लावावा.

सूर्यदेवाला जल अर्पण करा

सकाळी लवकर उठल्यानंतर नियमित स्नान करून तांब्याच्या कलशात पाणी, रोळी, अक्षत, साखरेची मिठाई आणि लाल फुले टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो, तसेच समाजात मान-सन्मान वाढतो आणि आपल्या क्षेत्रात प्रगती होते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.