AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Spiritual: प्रयत्नांना पाहिजे असेल नशिबाची साथ तर सकाळी उठल्यावर ‘या’ गोष्टी नक्की करा

अनेकजण आयुष्यात प्रचंड मेहनत (Hard work)  घेतात. त्यांच्या ध्येयाबद्दल ते सदैव जागरुकही असतात पण बऱ्याचदा त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नाही. यामागे काही तांत्रिक कारणे असू शकतात. हिंदू धर्मात अशा काही गोष्टी किंवा तोडगे सांगण्यात आलेले आहेत ज्यामुळे प्रयत्नांना नशिबाचे (good Luck) पाठबळ लाभते. ज्या गोष्टीसाठी मेहनत घेत आहात त्यांना यश (Success Tips)  मिळण्याची शक्यता वाढते. […]

Spiritual: प्रयत्नांना पाहिजे असेल नशिबाची साथ तर सकाळी उठल्यावर 'या' गोष्टी नक्की करा
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 14, 2022 | 9:08 AM
Share

अनेकजण आयुष्यात प्रचंड मेहनत (Hard work)  घेतात. त्यांच्या ध्येयाबद्दल ते सदैव जागरुकही असतात पण बऱ्याचदा त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नाही. यामागे काही तांत्रिक कारणे असू शकतात. हिंदू धर्मात अशा काही गोष्टी किंवा तोडगे सांगण्यात आलेले आहेत ज्यामुळे प्रयत्नांना नशिबाचे (good Luck) पाठबळ लाभते. ज्या गोष्टीसाठी मेहनत घेत आहात त्यांना यश (Success Tips)  मिळण्याची शक्यता वाढते. नशीब चमकणं आणि दुर्दैव, हे सर्व आपल्या दैनंदिन कामे आणि आपल्या कृतींवर अवलंबून असते. सकाळी उठल्यानंतर नेमक्या कोणत्या गोष्टी कराव्यात, ज्या केल्याने नशिबाची साथ आपल्याला लाभेल याबद्दल शास्त्रात अनेक उपाय सांगितले आहेत. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आध्यात्मिकतेची जोड फार आवश्यक असते. प्रयत्नांना सकारात्मक ऊर्जा मिळाल्याने त्याच्या पूर्ततेची शक्यता अधिक वाढते. जाणून घेऊया अशाच काही उपायांबद्दल.

झोपेतून उठल्यावर तळहाताकडे पहा

अनेकदा तुम्ही ऐकले असेल की सकाळी उठल्यावर आपला तळहाता पाहावा. धार्मिक मान्यतेनुसार माता लक्ष्मी, माता सरस्वती आणि भगवान विष्णू आपल्या दोन्ही तळहातामध्ये वास करतात, त्यामुळे सकाळी उठून दोन्ही हात जोडून ‘कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती। करमूले तु गोविन्द: प्रभाते करदर्शनम्।।’ असा जप करा आणि नंतर हाताच्या तळव्यांकडे पहा.

गायत्री मंत्राचा जप करा

हिंदू धर्मात असे अनेक मंत्र आहेत, ज्यांच्या जपाचा धार्मिक ग्रंथात उल्लेख आहे. त्यापैकी एक गायत्री मंत्र आहे. गायत्री मंत्राचा नियमित जप केल्याने जीवनात सकारात्मकता येते आणि दारिद्र्य दूर होते. याशिवाय त्या व्यक्तीला आयुष्यातील प्रत्येक कामात यश मिळते.

तुळशीजवळ दिवा लावावा

हिंदू धर्मात प्रत्येक घरात तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते. जर तुम्हालाही तुमच्या दुर्दैवाचे रुपांतर सौभाग्यामध्ये करायचे असेल तर सकाळी नियमितपणे उठून स्नान करून तुळशीला तुपाचा दिवा लावावा.

सूर्यदेवाला जल अर्पण करा

सकाळी लवकर उठल्यानंतर नियमित स्नान करून तांब्याच्या कलशात पाणी, रोळी, अक्षत, साखरेची मिठाई आणि लाल फुले टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो, तसेच समाजात मान-सन्मान वाढतो आणि आपल्या क्षेत्रात प्रगती होते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
Phaltan Car Accident | साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! वरुण धवनची पोस्ट
Varun Dhavan On Students Protest | विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! अभिनेता वरुण धवनची पोस्ट व्हायरल
26 दिवसांचं उपोषण संपलं! वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
26 दिवसांचं उपोषण संपलं! सोनम वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
Sanjay Raut | सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं पण... ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा