AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिळी पोळी आणि ‘या’ वस्तू दान करीत असाल तर लगेच व्हा सावध!; येऊ शकते कंगाल होण्याची वेळ!

हिंदू धर्मात देवी-देवतांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी भक्त पूजा-अर्चा करतात. तर काही जण उपवास आणि व्रत करतात . याशिवाय देवाचा कृपा आशीर्वाद मिळविण्याचा आणखी एक मार्ग आहे, जो अनेकजण अवलंबतात तो म्हणजे दान करणे. सनातन धर्मात दानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. सनातन धर्मानुसार चार युग आहेत.  या चार युगांमध्ये विशिष्ट पुण्य कर्माचे वैशिष्ट्य सांगण्यात आले आहे. सत्ययुगात […]

शिळी पोळी आणि 'या' वस्तू दान करीत असाल तर लगेच व्हा सावध!; येऊ शकते कंगाल होण्याची वेळ!
| Updated on: Jun 11, 2022 | 3:14 PM
Share

हिंदू धर्मात देवी-देवतांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी भक्त पूजा-अर्चा करतात. तर काही जण उपवास आणि व्रत करतात . याशिवाय देवाचा कृपा आशीर्वाद मिळविण्याचा आणखी एक मार्ग आहे, जो अनेकजण अवलंबतात तो म्हणजे दान करणे. सनातन धर्मात दानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. सनातन धर्मानुसार चार युग आहेत.  या चार युगांमध्ये विशिष्ट पुण्य कर्माचे वैशिष्ट्य सांगण्यात आले आहे. सत्ययुगात तप, त्रेतामध्ये ज्ञान, द्वापरातील यज्ञ आणि कलियुगात दान यामुळे माणसाचे कल्याण होते. दानधर्माची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. लोकसुद्धा आपल्या पूर्वजांना खुश करण्यासाठी दान करतात. वास्तू आणि ज्योतिषशास्त्रात दान करणे खूप शुभ मानले जात असले तरी यासाठी काही नियमही आहेत. या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास घरात कलह आणि गरिबी येऊ शकते ( trouble for you). लोक काही गोष्टी विचार न करता दान करतात, ज्यामुळे त्यांचे नुकसान होते (donation of wrong things). आज अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत  ज्याचे दान करणे टाळावे.

या गोष्टीचे दान कधीच करू नये

  1. शिळी पोळी-  शास्त्रात अन्न आणि पाणी हे महादानाच्या श्रेणीत आहेत, पण त्यासाठी योग्य पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. बरेच जण उरलेली भाकरी घरी आलेल्या बिक्षेकरीला दान करतात. कोणाचे तरी पोट भरून त्यांनी चांगले काम केले आणि त्यातून पुण्य केले असे त्यांना वाटते, पण ज्योतिषशास्त्रानुसार हे अशुभ कृत्य आहे. गरीब किंवा गरजूंना नेहमी ताजे अन्न दान करा. बऱ्याचदा लोकं अन्नाचे दान करण्याच्या नावाखाली शिळ्या अन्नाची विल्हेवाट लावतात.
  2. स्टीलची भांडी- लोक आपल्या पूर्वजांना किंवा पितरांना प्रसन्न करण्यासाठी अशा गोष्टी दान करू लागतात, जे ज्योतिषशास्त्रानुसार योग्य नाही. ज्यामध्ये स्टीलच्या भांड्यांचाही समावेश आहे. स्टीलच्या भांड्यांचे दान कुटुंबात कलह निर्माण करते.
  3. अपात्र दान- एखाद्या भिक्षुकाला पैसे दान करताना त्याच्या पात्रात दान करावे. पैसे किंवा कुठलेच दान हे अपात्र करू नये. यामुळे कुठलेही पुण्य लाभत नाही उलट दोष निर्माण होतो.
  4. मद्य किंवा मांस- मद्य आणि मांस याचे दान हिंदू धर्मात निषिद्ध आहे. हल्ली पार्टीच्या नावाखाली सर्रास मद्य आणि मांसाहाराची मेजवानी देण्यात येते. ही मेजवानी देणे म्हणजे एक प्रकारे दान देणेच होय. यामुळे धन हानी, कुटुंबात कलह, संततीमध्ये दोष आणि पितृदोष निर्माण होतात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.