AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यज्ञ करण्याचे आहेत अनेक फायदे, यज्ञामध्ये कोणकोणत्या सामुग्रीचा समावेश होतो

हवन केल्याने कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो, त्यामुळे जीवनात येणारे अडथळे दूर होतात. यज्ञ केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होऊ लागतात

यज्ञ करण्याचे आहेत अनेक फायदे, यज्ञामध्ये कोणकोणत्या सामुग्रीचा समावेश होतो
यज्ञImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 16, 2023 | 7:53 AM
Share

मुंबई, सनातन धर्मात हवन यज्ञ अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. जेंव्हा कोणतेही शुभ कार्य घडते तेंव्हा हवन अवश्य केला जातो. हवन-यज्ञामध्ये (Hawan Benefits) वापरल्या जाणाऱ्या साहित्याच्या दहनाने वातावरण शुद्ध होते आणि घरातून हानिकारक विषाणू-बॅक्टेरिया नष्ट होतात, अशी मान्यता आहे. हवन करण्याचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहेत, ज्याबद्दल आज जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

हवन केल्याने काय लाभ होतो?

शास्त्रानुसार रोज हवन केल्यास जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. त्यामुळे सुख, समृद्धी आणि यशाची दारे आपोआप उघडू लागतात आणि मनाला आध्यात्मिक शांती मिळते.

अडथळे दूर होतात

हवन केल्याने कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो, त्यामुळे जीवनात येणारे अडथळे दूर होतात. यज्ञ केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होऊ लागतात आणि कुटुंबात समृद्धी येते.

वातावरण शुद्ध होते

हवन करण्यासाठी साहित्य, शुद्ध तूप, आंब्याचे लाकूड आणि कापूर यासारख्या शुभ गोष्टींचा वापर केला जातो. त्यांच्या जाळण्यामुळे आणि धुरामुळे नकारात्मक शक्ती दुर होते. तसेच घरातील वातावरण शुद्ध होते.

इच्छा पूर्ण करण्यासाठी लाकडाचा वापर

जर तुम्हाला संतती प्राप्तीची इच्छा असेल पण खूप प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर आठवड्यातून एकदा पिंपळाच्या लाकडाने हवन करायला सुरुवात करावी. असे केल्याने मनोकामना पूर्ण होते असे मानले जाते.

आर्थिक संकट दूर होईल

आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांसाठी पळसाच्या लाकडाने हवन करणे उत्तम मानले जाते. पळसाच्या लाकडातून निघणाऱ्या ओल्या सुगंधाने आकर्षित होऊन माता लक्ष्मी आपोआपच घराकडे ओढली जाते आणि कुटुंबावर धनाचा वर्षाव करते, असे म्हणतात.

जुनाट आजारापासून मुक्ती मिळेल

ज्या घरामध्ये लोकं सतत रोगांशी झुंजत असतात, त्यांनी मदार लाकडाने हवन करावे. या लाकडातून निघणारा धूर नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि विषाणू आणि जीवाणू नष्ट करतो. त्यामुळे रुग्ण हळूहळू बरे होऊ लागतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.