AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या पाच यज्ञाला हिंदू धर्मात आहे विशेष महत्त्व, कोणते यज्ञ कशासाठी केले जाते?

'यज्ञ' (Yagya Importance Hindu) म्हणजे अग्नीत तूप टाकणे आणि मंत्र पठण करणे असा नाही.  व्यक्तीप्रमाणेच समाजाचे कल्याणहाही हेतू धरून याग आणि होमहवन केले जाते. हवन केल्याने सकारात्मक शक्तीचा निर्माण होतो.

या पाच यज्ञाला हिंदू धर्मात आहे विशेष महत्त्व, कोणते यज्ञ कशासाठी केले जाते?
यज्ञाचे महत्त्वImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Apr 12, 2023 | 7:40 PM
Share

मुंबई : वेदानुसार यज्ञांचे पाच प्रकार आहेत.  1. ब्रह्मयज्ञ, 2. देवयज्ञ, 3. पित्री यज्ञ, 4. वैश्वदेव यज्ञ, 5. अतिथी यज्ञ. या पाच यज्ञांचे वर्णन पुराण आणि इतर ग्रंथांमध्ये केले आहे. ‘यज्ञ’ (Yagya Importance Hindu) म्हणजे अग्नीत तूप टाकणे आणि मंत्र पठण करणे असा नाही.  व्यक्तीप्रमाणेच समाजाचे कल्याणहाही हेतू धरून याग आणि होमहवन केले जाते. हवन केल्याने सकारात्मक शक्तीचा निर्माण होतो. अनेक अभ्यासांमध्ये हे स्पष्ट झाले आहे की, हवन केल्याने प्रदूषणमुक्त वातावरण मिळते. यामुळे आपले आरोग्य सुधारते. धार्मिक शास्त्रानुसार, वाईट घटनांना टाळण्यासाठी किंवा इच्छा पूर्ण करण्यासाठी हवन केले जात असत.

यज्ञाचे प्रकार

1. ब्रह्मयज्ञ

हा पहिला यज्ञ मानला जातो. मानव ही ईश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती मानली जाते, परंतु त्यामध्ये पितृ म्हणजेच आई-वडिलांचे स्थान सर्वात वरचे आहे. देवांना पूर्वजांपेक्षा श्रेष्ठ मानले जाते, ज्यामध्ये निसर्ग आणि इतर देवी-देवतांचा विचार केला जातो. याहूनही श्रेष्ठ देव आणि ऋषी मानले जातात. भगवंतालाच ब्रह्म म्हणतात आणि ब्रह्मयज्ञ त्यालाच अर्पण केला जातो. ऋषीमुनींचे ऋण रोज सायंकाळच्या प्रार्थना आणि आत्मअध्ययनाने वेदांचे पठण केल्याने फेडले जाते असे म्हणतात.

2.देव यज्ञ

सत्संगासह अग्निहोत्र कर्माने ते साधता येते. यज्ञवेदीमध्ये अग्नि प्रज्वलित करून होमार्पण करून अग्निहोत्र यज्ञ केला जातो, असे सांगितले जाते. हा यज्ञ संधिकालातील गायत्री श्लोकांसह केला जातो आणि याद्वारे देवाचे ऋण फेडले जाते. घरी केले जाणारे सर्व यज्ञ देव यज्ञ श्रेणीत ठेवले जातात. हा यज्ञ करण्यासाठी 7 झाडांच्या लाकडांचा वापर केला जातो, ज्यामध्ये आंबा, वड, पिंपळ, ढाक, जांती, जामुन आणि शमीचा वापर केला जातो. या यज्ञ-हवनाने सकारात्मकता वाढते आणि रोग-दु:खांचा नाश होतो. या यज्ञामुळे गृहस्थांच्या आश्रमात शुभ फळ मिळते.

3. पितृयज्ञ

नावावरूनच स्पष्ट होते की, भक्तीभावाने आणि खऱ्या भावनेने केलेली कृत्ये, जे आई-वडील आणि शिक्षक यांना संतुष्ट करतात, त्याला पितृयज्ञ म्हणतात. वेदानुसार आपल्या पितरांना श्राद्ध-तर्पण अर्पण केले जाते. पित्याचे ऋण मुलांच्या पिढ्यानपिढ्या आणि त्यांचे लाभ धारण करून फेडले जाते आणि याला पितृयज्ञ म्हणतात.

4. वैश्वदेव यज्ञ

वैश्व देवयज्ञ, ज्याला ‘भूत’ यज्ञ असेही म्हणतात. ‘क्षिती जल पावक गगन समीरा’ पाच तत्वांनी बनलेला देह. आपण जाणतो की आपले शरीर या पाच महातत्त्वांनी बनलेले आहे आणि हा यज्ञ त्यांच्यासाठीच केला जातो.  भोजन करताना काही भाग आगीत टाकला जातो आणि नंतर काही भाग गायी, कुत्रे आणि कावळ्यांना दिला जातो.

5.अतिथी यज्ञ

आपल्या देशात ‘अतिथी देवो भव’ ही परंपरा फार प्राचीन आहे. पाहुण्यांची सेवा करणे, त्यांना अन्न-पाणी देऊन तृप्त करणे, तसेच गरजू स्त्री, तरुण, डॉक्टर इत्यादींची सेवा करणे हे अतिथी यज्ञाच्या श्रेणीत येते. गृहस्थ आश्रमातील सर्वोत्तम सेवेला ‘नर सेवा नारायण सेवा’ असे म्हणतात आणि ‘अतिथी-यज्ञ’ या प्रकारात येतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... गांधींवर मस्केंची टीका
Naresh Maske | दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... राहुल गांधींवर नरेश मस्केंची बोचरी टीका!
देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार मुंबईसाठी २३८ एसी लोकल मंजूर
मुंबईला मिळणार २३८ एसी लोकल; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार
मुंबईत डोमिनोजच्या तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मुंबईत डॉमिनोजवर एफडीएची कारवाई: तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आमदारांच्या...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आज आमदारांच्या अपात्रतेवरुन युक्तीवाद, थेट....
बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
Mallikarjun Kharge | माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?