AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयुष्यातील कठीण प्रसंगात उपयुक्त ठरू शकतील गरुड पुराणातील या गोष्टी!

गरुड पुराणामध्ये कर्मांनुसार मृत्यूनंतर स्वर्ग, नरक आणि पितृ लोक मिळण्याविषयी सांगितले गेले आहे. आत्म्यास पुन्हा कसे शरीर प्राप्त होते, कोणताही आत्मा प्रेत कसा बनतो आणि आत्म्यास मोक्ष कसा मिळतो, या सर्व प्रश्नांची उत्तरे गरुड पुराणात आहेत.

आयुष्यातील कठीण प्रसंगात उपयुक्त ठरू शकतील गरुड पुराणातील या गोष्टी!
गरुड पुराणात धनाचा संबंध स्वच्छतेशी सांगताना सांगण्यात आले आहे की, जर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहावी असे वाटत असेल तर घरासोबतच शारीरिक स्वच्छतेकडेही पूर्ण लक्ष द्या. जिथे घाण असते तिथे माता लक्ष्मी वास करत नाही. हे जरी शास्त्रोक्त पद्धतीने बघितले तरी ते अगदी बरोबर असल्याचे सिद्ध होते कारण जिथे घाण असते तिथे रोग आणि नकारात्मकता असते. अशा ठिकाणी पैसा पाण्यासारखा वाया जातो आणि त्या व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक तिन्ही प्रकारे त्रास होतो.
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jul 28, 2021 | 3:08 PM
Share

मुंबई : आपण आपल्या डोळ्यांनी हे जग दररोज पाहतो, परंतु मृत्यूनंतरचे जग कसे आहे, हे फक्त आपण कथांमध्ये ऐकले आहे. मृत्यूनंतरची रहस्ये जाणून घेण्याचे जर कुतूहल असेल तर तुम्ही गरुड पुराण वाचलेच पाहिजे. गरुड पुरातन हे सनातन धर्मातील 18 महापुराणांपैकी एक मानले जाते. यामध्ये भगवान विष्णू आणि गरुड यांच्यातील संभाषणाचे तपशीलवार वर्णन केले गेले आहे. गरुड श्रीहरि यांना जन्म-मृत्यू तसेच मृत्यूनंतरच्या परिस्थितीशी संबंधित प्रश्न विचारले जातात, त्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे नारायण देतात. (These things from Garuda Purana can be useful in difficult situations of life)

गरुड पुराणामध्ये कर्मांनुसार मृत्यूनंतर स्वर्ग, नरक आणि पितृ लोक मिळण्याविषयी सांगितले गेले आहे. आत्म्यास पुन्हा कसे शरीर प्राप्त होते, कोणताही आत्मा प्रेत कसा बनतो आणि आत्म्यास मोक्ष कसा मिळतो, या सर्व प्रश्नांची उत्तरे गरुड पुराणात आहेत. या महापुराणाचा उद्देश लोकांना धर्माच्या मार्गाकडे नेणे आणि त्याच्या नीतिशास्त्रानुसार, नितीसार नावाच्या एका अध्यायात सुखी आयुष्याची अनेक धोरणे सांगण्यात आली आहेत.

1. गरुड पुराणात असे म्हटले आहे की आयुष्यात सन्मान मिळावा अशी सर्वांची इच्छा असते. जर आपल्या दर्जाची किंवा आपल्यापेक्षा वयाने मोठी व्यक्ती जर काही बोलली तर आपण ते सहन करू शकतो. परंतु जर आपल्यापेक्षा कमी वयाच्या किंवा आपल्यापेक्षा कमी दर्जाच्या व्यक्तीने काही म्हटले तर आपणास खूप अपमान वाटतो. अशा वेळी आपण संयम ठेवून काम केले पाहिजे. रागावू नये. कारण रागामुळे समस्या वाढू शकतात.

2. जेव्हा आपण कोणतेही काम सुरू करता, तेव्हा त्या कामात यश मिळेल की नाही हे आपण आधीच ठरवू शकत नाही. परंतु जर आपण पुन्हा पुन्हा अपयशी होत असाल तर आपण हे समजून घेतले पाहिजे की आपल्या प्रयत्नांमध्ये काहीतरी तरी उणीव आहे. अशा परिस्थितीत एखाद्याने अयशस्वी होण्यापासून शिकून आणि चुका दुरुस्त करून पुढे जायला हवे.

3. लग्नानंतर पती-पत्नीचे नाते विश्वासाच्या पायावर अवलंबून असते. म्हणूनच अशी कोणतीही कामे करू नका की ज्यामुळे एकमेकांचा विश्वास मोडेल. कारण विश्वास गमावल्यानंतर वैवाहिक आयुष्य उध्वस्त होते.

4. जेव्हा आपला जोडीदार आजारी असतो, तेव्हा आपण प्राधान्याने त्याच्या आरोग्यावर लक्ष ठेवले पाहिजे आणि त्याला निरोगी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. यामुळे दोघांमधील बंध आणखी मजबूत होतात आणि दोघांमधील प्रेम वाढते. सुखी वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नी दोघेही निरोगी असले पाहिजेत. (These things from Garuda Purana can be useful in difficult situations of life)

इतर बातम्या

काँग्रेस नेते गिरीश पांडव यांचे बॅनर हटवले, युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचं नागपूर महापालिका मुख्यालयात आंदोलन

पुण्यात गांजा विकायला आलेल्या तरुणाला सापळा रचून अटक

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?