AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैशाख अमावस्येला पूर्वजांच्या शांतीसाठी करा ‘हे’ 5 उपाय, पिटृदोष होईल दूर..

वैशाख अमावस्या हा पितरांच्या स्मरणासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी पितृ तर्पण, दान आणि पूजा केल्याने पितरांना शांती मिळते व त्यांचे आशीर्वाद लाभतात. सकाळी स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यावे आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. तसेच काळे तीळ टाकून पाण्याचे अर्पण करणे शुभ मानले जाते.

वैशाख अमावस्येला पूर्वजांच्या शांतीसाठी करा 'हे' 5 उपाय, पिटृदोष होईल दूर..
Pitridosh
| Edited By: | Updated on: Apr 16, 2026 | 2:58 PM
Share

वैशाख अमावस्या ही हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची तिथी मानली जाते. 2026 साली ही अमावस्या 17 एप्रिल रोजी येत असून, या दिवशी विशेषतः पितरांच्या शांतीसाठी आणि त्यांच्या आशीर्वादासाठी विविध धार्मिक विधी केले जातात. शास्त्रांनुसार अमावस्येचा दिवस हा पितरांना समर्पित असतो आणि या दिवशी केलेले दान, जप, तर्पण आणि पूजन यामुळे पितर प्रसन्न होतात व आपल्या वंशजांवर कृपा करतात. असे मानले जाते की, या दिवशी केलेल्या पुण्यकर्मांचा अनेकपटीने फल मिळतो आणि जीवनातील अडथळे दूर होतात. विशेषतः ज्यांच्या कुंडलीत पितृदोष असतो किंवा ज्यांना आयुष्यात वारंवार अडचणी येतात, त्यांनी या दिवशी उपाय केल्यास त्यांना विशेष लाभ मिळतो. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते.

शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करावे, अन्यथा घरच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजा करावी. पितरांच्या स्मरणार्थ तर्पण करणे हा या दिवसाचा मुख्य भाग आहे. तर्पण करताना तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात काळे तीळ, कुशा आणि अक्षता टाकून दक्षिण दिशेकडे तोंड करून पितरांचे स्मरण करत पाणी अर्पण केले जाते. हा विधी केल्याने पितरांना शांती मिळते आणि ते आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देतात.

वैशाख अमावस्येला दानधर्माला विशेष महत्त्व आहे. या दिवशी अन्न, वस्त्र, पाणी, गूळ, तांदूळ, तीळ आणि इतर आवश्यक वस्तूंचे दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. विशेषतः पाण्याने भरलेला घडा दान करणे हे महादान समजले जाते, कारण हा काळ उन्हाळ्याचा असल्याने तहानलेल्या लोकांना पाणी देणे हे अत्यंत पुण्याचे कार्य आहे. याशिवाय गरजूंना अन्नदान करणे, पक्ष्यांना अन्न-पाणी देणे, तसेच गरीबांना मदत करणे हे देखील या दिवशी करणे योग्य मानले जाते. या सर्व गोष्टी केल्याने पितर तृप्त होतात आणि कुटुंबात सुख-समृद्धी वाढते. या दिवशी काही विशेष उपाय केल्यास पितृदोष कमी होतो असे मानले जाते. उदाहरणार्थ, पिंपळाच्या झाडाला पाणी घालणे आणि त्याभोवती प्रदक्षिणा घालणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण पिंपळात पितरांचे वास असल्याचे मानले जाते. तसेच संध्याकाळी दक्षिण दिशेला दिवा लावणेही महत्त्वाचे आहे, कारण दक्षिण दिशा पितरांची दिशा मानली जाते. या दिवशी पिंडदान आणि श्राद्ध विधी केल्याने पितरांना शांती मिळते आणि त्यांच्या आत्म्यांना मोक्ष प्राप्त होतो. तसेच घरात सात्विक वातावरण ठेवणे, जप-तप करणे आणि भगवान विष्णूचे नामस्मरण करणे यालाही विशेष महत्त्व आहे. वैशाख अमावस्या हा आत्मचिंतन, कृतज्ञता आणि पितरांच्या स्मरणाचा दिवस आहे. या दिवशी केवळ विधी करणेच नव्हे, तर मनापासून आपल्या पूर्वजांप्रती आदर व्यक्त करणे महत्त्वाचे आहे. असे मानले जाते की, पितर प्रसन्न असल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम राहते. त्यामुळे या दिवशी केलेले छोटेसे पुण्यकर्म देखील मोठे फल देऊ शकते. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार या दिवशी दान, जप, तर्पण आणि पूजन करावे, ज्यामुळे पितरांची कृपा लाभून जीवनातील अडचणी दूर होऊन आनंद आणि समाधान मिळते.

वैशाख अमावस्येच्या दिवशी काही गोष्टी करू नये? वैशाख अमावस्येच्या दिवशी काही गोष्टी टाळणे अत्यंत आवश्यक मानले जाते, कारण या दिवशी केलेल्या चुकीच्या कृतींमुळे पितर नाराज होऊ शकतात असे धार्मिक मान्यता सांगते. सर्वप्रथम, या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद, भांडण किंवा कटु वाणी वापरणे टाळावे. घरात शांतता आणि सौहार्द टिकवणे महत्त्वाचे असते. तसेच मद्यपान, मांसाहार किंवा तामसी अन्नाचे सेवन करणे पूर्णपणे निषिद्ध मानले जाते. या दिवशी सात्विक आहार घ्यावा आणि मन, वाणी व कृती यांमध्ये शुद्धता ठेवावी. कारण हा दिवस आध्यात्मिक साधना आणि पितरांच्या स्मरणासाठी असतो. या दिवशी कोणालाही अपमानित करणे, गरजूंना नकार देणे किंवा दानधर्म टाळणे योग्य मानले जात नाही. विशेषतः ब्राह्मण, वृद्ध व्यक्ती, किंवा गरजू लोक यांचा अपमान केल्यास त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो असे मानले जाते. तसेच या दिवशी पितरांसाठी तर्पण किंवा श्राद्ध करताना नियमांचे पालन न करणे किंवा ते अर्धवट सोडणे टाळावे. अशा धार्मिक विधींमध्ये श्रद्धा आणि एकाग्रता आवश्यक असते, अन्यथा त्याचे अपेक्षित फळ मिळत नाही. या दिवशी आळशीपणा, उशिरा उठणे किंवा दिवस व्यर्थ घालवणे टाळावे. अमावस्येच्या दिवशी लवकर उठून स्नान, जप, ध्यान आणि पूजन करणे शुभ मानले जाते. तसेच झाडे तोडणे, प्राण्यांना त्रास देणे किंवा निसर्गाचा अपमान करणेही टाळावे, कारण हा दिवस पुण्यकर्म करण्यासाठी असतो. घरात नकारात्मक विचार, राग किंवा द्वेष ठेवण्याऐवजी सकारात्मकता आणि कृतज्ञता ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. या सर्व गोष्टींचे पालन केल्यास पितरांची कृपा प्राप्त होते आणि जीवनात सुख-शांती नांदते.

Follow Us
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान.
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार.
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल.
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं.
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान.
भोंदू खरात प्रकरणी पडद्यामागे मोठ्या हालचाली, पोलिसांकडून... बड्या नेत
भोंदू खरात प्रकरणी पडद्यामागे मोठ्या हालचाली, पोलिसांकडून... बड्या नेत.
नाशिकच्या IT कंपनीतील महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे मलेशिया कनेक्शन,
नाशिकच्या IT कंपनीतील महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे मलेशिया कनेक्शन,.
अमरावती अत्याचार प्रकरणात पोलीस अलर्ट मोडवर, आयाज अहमदच्या घरावर बुलडो
अमरावती अत्याचार प्रकरणात पोलीस अलर्ट मोडवर, आयाज अहमदच्या घरावर बुलडो.
कैसा हराया... म्हणणाऱ्या सहर शेख यांचं नगरसेविका पद धोक्यात, नेमकं काय
कैसा हराया... म्हणणाऱ्या सहर शेख यांचं नगरसेविका पद धोक्यात, नेमकं काय.
परतवाड्यात लैंगिक शोषण रॅकेट उघड: आरोपी तनवीर अटकेत 180 हून अधिक....
परतवाड्यात लैंगिक शोषण रॅकेट उघड: आरोपी तनवीर अटकेत 180 हून अधिक.....