AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : पैशांचे व्यवहार करताना कायम या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा व्हाल कंगाल

अनेकदा सगळं सुरळीत सुरू असताना आपल्याला आर्थिक अडचणी जाणवायला लागतात. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा तुम्हाला अशा प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो, आर्थिक अडचणी आपल्या आयुष्यात येऊ नये यासाठी आज आपण काही खास उपाय जाणून घेणार आहेत.

Vastu Shastra : पैशांचे व्यवहार करताना कायम या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा व्हाल कंगाल
MONEYImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 29, 2026 | 9:34 PM
Share

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये केवळ तुमच्या घराच्या रचनेबद्दलच माहिती देण्यात आलेली नाहीये, तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्यास त्याचा प्रचंड त्रास तुम्हाला होण्याची शक्यता असते, ही नकारात्मक ऊर्जा कमी करून ऊर्जा संतुलन कसं निर्माण करायचं? याबद्दल देखील वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार काही विशिष्ट वार असे असतात त्या दिवशी तुम्ही जर एखाद्याकडून कर्ज घेतलं असेल तर ते परतफेड करण्यासाठी शुभ मानले जातात. तर काही विशिष्ट वार असेही असतात या दिवशी चुकूनही कोणाकडून कर्ज घेऊ अथवा देऊ नये, तर काही वार असे असतात जे पैसे देण्यासाठी किंवा घेण्यासाठी शुभ मानले जातात. आज आपण याबद्दल वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगण्यात आलं आहे? पैशांच्या व्यवहारांसाठी कोणते वार शुभ आहेत? कोणते अशुभ? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

मंगळवार – तुम्ही जर एखाद्याकडून कर्ज घेतलं असेल तर ते मंगळवारी परत करणं हे शुभ मानलं जातं. कारण तुम्ही जेव्हा मंगळवारी एखाद्याकडून घेतलेले पैसे परत करतात, तेव्हा तुमच्यावरील कर्जाचं ओझं कमी होतं. एवढंच नाही तर मंगळाची सकारात्मक ऊर्जा तुम्हाला मदत करते. मात्र मंगळवारी कधीही कोणाकडूनही कर्ज घेऊ नये, कारण या दिवशी घेतलेलं कर्ज लवकर फिटत नाही. मंगळवार हा मंगळ ग्रहाचा वार आहे, त्यामुळे या दिवशी उग्र ऊर्जा असते, त्यामुळे या दिवशी कर्ज घेऊ नये, असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे.

बुधवार – बुधवारी कोणालाही कर्ज देऊ नये असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे कारण बुधवार या दिवसाचा संबंध हा बुध ग्रहाशी असतो. हा ग्रंथ वाणी बुद्धीशी संबंधित आहे. त्यामुळे तुम्ही जर बुधवारी एखाद्या व्यक्तीला पैसे दिले असतील तर ते पैसे परत वापस येण्याची शक्यता नसते, त्यामुळे शक्यतो बुधवारी कोणालाही कर्ज देऊ नये, जर एखादा खूपच संकटात सापडला असेल तर तुम्ही मानवतेच्या नात्याने त्याला मदत करू शकतात. परंतु बुधवारी कोणालाही कर्ज देणं टाळावं असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

शुक्रवार – शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार असतो, त्यामुळे हा दिवस सर्व प्रकारच्या पैशांच्या व्यवहारांसाठी शुभ मानला जातो. तुम्ही या दिवशी पैसे देऊ किंवा घेऊ शकतात. जे पैशांचे व्यवहारा शुक्रवारी होतात, त्यामध्ये लक्ष्मी मातेच्या कृपेनं बरकत प्राप्त होते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे, त्यामुळे सर्व प्रकारच्या पैशांच्या व्यवहारांसाठी शुक्रवार हा शुभ दिवस मानला जातो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन