AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : तुम्ही देखील करतायेत ही चूक? पडू शकते महागात, घरात येते गरिबी

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घरात निर्माण झालेल्या विविध वास्तुदोषांबद्दल माहिती देण्यात येते, तसेच त्यांच्या निवारणासाठी काही उपाय देखील सांगितले जातात. आपण दररोज अशा काही छोट्या -छोट्या चुका करत असतो, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो.

Vastu Shastra : तुम्ही देखील करतायेत ही चूक? पडू शकते महागात, घरात येते गरिबी
vastu tips Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 17, 2026 | 8:45 PM
Share

वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमचं घर कसं असावं? घराची रचना कशी असावी? घरात कोणत्या वस्तू असाव्यात? किंवा घरात कोणत्या वस्तू नसाव्यात याबद्दलच माहिती देण्यात आलेली नाहीये. तर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास तो कसा दूर करायचा? याबद्दल देखील अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात अशा काही छोट्या -मोठ्या चुका करतो, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. ज्यांच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, त्या घरातील कुटुंबप्रमुखाच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात. जसं की सर्व काही सुरळीत सुरू असतना अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येतं. व्यवसायात तोटा होतो, किंवा घरात काहीही कारण नसताना भांडणं सुरू होतात. यामुळे तु्म्हाला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे अशा चुका टाळल्या पाहिजेत असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. आज आपण अशाच एका गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत, ही चूक तर अनेक जण दररोज करतात, मात्र त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो.

अनेकांना केस गळतीची समस्या असते, तसेच अनेक जण केस विंचरल्यानंतर किंवा भांग पाडल्यानंतर कंगव्यात अडकलेले केस असेच इतरत्र अस्तव्यस्त पडू देतात. असे केस त्यानंतर सर्व घरभर पसरतात. मात्र ही सवय अत्यंत चुकीची आहे, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. वैज्ञानिक दृष्टीकोनातून देखील ही सवय चुकीची आहे, कारण यामुळे हे केस तुमच्या अन्नामध्ये देखील मिसळू शकतात, ते तुमच्या पोटात जाण्याचा देखील धोका असतो. त्यामुळे हे सर्व केस व्यवस्थित गोळा करून डस्बिनमध्ये टाकावेत. वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात नेहमीच अशाप्रकारे केस कुठेही पडत असतील, सर्व घरभर केस होत असतील तर यामुळे राहु आणि केतू नाराज होतात. घरात राहुदोष निर्माण होतो.

शनीदोष – दरम्यान तुम्हाला देखील अशीच सवय असेल तर त्यामुळे शनी देव देखील नाराज होतात. जर एखाद्या व्यक्तीवर शनीदेव नाराज झाले तर त्यामुळे तुमच्या घरात गरिबी येऊ शकते. त्यामुळे घर नेहमी स्वच्छ ठेवावं. जर तुमचं घर स्वच्छ असेल तर शनी देवांचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी असेल असं वास्तुशास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!