AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : ईशान्य कोपऱ्यात ठेवा या 5 वस्तू, घरात कधीच वास्तुदोष तयार होणार नाही

घरात जेव्हा नकारात्मक ऊर्जा तयार होते, तेव्हा तिचा परिणाम हा कुटुंबप्रमुखासह घरातील सर्व सदस्यांवर होत असतो. यालाच आपण वास्तुदोष असं देखील म्हणतो. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी आपण आज काही उपाय जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : ईशान्य कोपऱ्यात ठेवा या 5 वस्तू, घरात कधीच वास्तुदोष तयार होणार नाही
Vastu ShastraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 14, 2026 | 8:35 PM
Share

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र ज्यामध्ये तुमच्या घरात निर्माण झालेला वास्तुदोष दूर करण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार काही दिशा या अत्यंत शुभ असतात, त्यापैकीच एक दिशा म्हणजे ईशान्य दिशा आहे. ईशान्य दिशेला देवाचं निवासस्थान आहे, असं मानलं जातं. त्यामुळे ईशान्य दिशा ही सकारात्मक ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत असून, वास्तुशास्त्रात या दिशेला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार जर ईशान्य दिशेला काही शुभ वस्तू ठेवल्या गेल्या तर या सकारात्मक ऊर्जेचा अपेक्षित परिणाम संपूर्ण घरावर होतो. चला तर मग आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या ईशान्य दिशेला ठेवणं शुभ मानलं गेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार देवघर हे नेहमी ईशान्य दिशेलाच असावं. ईशान्य दिशा ही देवाचं निवासस्थान मानली जाते, त्यामुळे तुमचं देवघर हे नेहमी ईशान्य दिशेला असावं, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

तुळशीचं झाड – तुळस ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अत्यंत प्रिय आहे. ज्या घरात तुळस असते, तिची नियमित पूजा होते, त्या घरात कधीही पैशांची कमी भासत नाही, सर्व प्रकारचे आर्थिक संकटं नष्ट होतात. वास्तुशास्त्रानुसार तुळशीचं झाडं हे जर तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात असेल तर त्याचा आणखी सकारात्मक परिणाम तुमच्या घरावर होतो. घराचं सर्व प्रकारच्या वाईट शक्तिंपासून संरक्षण होतं.

पाण्यानं भरलेला कलश – वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मशास्त्रामध्ये पाण्यानं भरलेल्या कलशाला अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. पाण्यानं भरलेला कलश हा सकारात्मक ऊर्जेचं प्रतिक मानला जातो, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण झाला आहे, तर अशावेळी तुम्ही तुमच्या घराच्या ईशान्य दिशेला पाण्यानं भरलेला कलश ठेवू शकता, त्यामुळे तुमच्या घरातील सर्व प्रकारचा वास्तुदोष नष्ट होईल.

शंख – हिंदू धर्मशास्त्रामध्ये शंखाला खूप महत्त्व आहे. शंखाला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. देवघरामध्ये शंख असलाच पाहिजे असं वास्तुशास्त्र सांगतं, जर तुम्ही तुमच्या देवघरात ईशान्य दिशेला शंख ठेवलात तर तुमच्या घरातील सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

कुबेराचा फोटो – वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य दिशेला कुबेराचा फोटो लावला पाहिजे, त्यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष नष्ट होऊन, तुम्हाला कधीही पैशांची कमी भासत नाही.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.