AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips: सतत भासत असेल पैशांची चणचण तर अवश्य करा हे वास्तू उपाय

वास्तुदोषांमुळे व्यक्तीला इच्छा असूनही संपत्ती जमवता येत नाही. अशा परिस्थितीत कोणत्या कारणांमुळे घरात पैसा थांबत नाही आणि ते दूर करण्याचे उपाय जाणून घेऊया.

Vastu Tips: सतत भासत असेल पैशांची चणचण तर अवश्य करा हे वास्तू उपाय
वास्तू दोष Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jan 05, 2023 | 3:12 PM
Share

मुंबई, अनेकांची तक्रार असते की, ते खूप कष्ट करून पैसे कमावतात, परंतु हा पैसा त्यांच्याकडे जास्त काळ टिकत नाही. घरात पैसा येतो आणि जातो. म्हणजेच पैसा भरपूर येतो, पण तितक्याच लवकर तो खर्चही होतो. जर तुमच्यासोबतही असे घडत असेल आणि खूप प्रयत्न करूनही घरात पैसा टिकत नसेल, तर त्याचे एक कारण वास्तुदोष  असू शकते. वास्तुशास्त्राच्या (Vastu Tips) जाणकारांचे मत आहे की, आपल्या घरात असे काही वास्तुदोष असतात, ज्यामुळे घरात पैसा टिकत नाही. वास्तुदोषांमुळे व्यक्तीला इच्छा असूनही संपत्ती जमवता येत नाही. अशा परिस्थितीत कोणत्या कारणांमुळे घरात पैसा थांबत नाही आणि ते दूर करण्याचे उपाय जाणून घेऊया.

या दिशेने सुरक्षित ठेवा

वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तरेला कुबेराचे निवासस्थान मानले जाते, त्यामुळे तिजोरी उत्तर दिशेला ठेवण्यासाठी खोली असणे उत्तम मानले जाते. याशिवाय कपाटात पैसे ठेवल्यास मधल्या किंवा वरच्या भागात ठेवा. खालच्या भागात ठेवू नका.

या गोष्टी तिजोरीत बसवा

वास्तूनुसार व्यापार वृद्धी यंत्र, महालक्ष्मी यंत्र, बिसा यंत्र यांसारखे शुभ यंत्र तिजोरीत ठेवणे शुभ असते. यामुळे घराची तिजोरी कधीच रिकामी होत नाही.

लक्ष्मी आणि कुबेर यांच्या मूर्तीची स्थापना करा

लाख प्रयत्न करूनही घरात पैसा थांबत नसेल, तर धनाची देवी लक्ष्मी आणि कुबेर देव यांची मूर्ती देवघरात स्थापित करा. तसेच त्यांची नित्य पूजा करावी. हा उपाय केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही.

उष्टी भांडी ठेवू नका

बरेचदा लोकं रात्रीच्या जेवणानंतर खरकटी भांडी स्वयंपाकघरात ठेवतात आणि सकाळी उठून ती साफ करतात. वास्तूनुसार असे करणे अशुभ मानले जाते. ज्या घरांमध्ये रात्री खरकटी भांडी ठेवली जातात त्या घरांमध्ये माता लक्ष्मी कधीही राहत नाही. म्हणूनच तुम्ही रात्री भांडी धुवा अथवा बहेर ठेवा.

घर नेहमी स्वच्छ ठेवा

असे म्हणतात की ज्या घरात घाण असते, तिथे लक्ष्मीचा वास कधीच राहत नाही. म्हणूनच घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा. तसेच घराच्या पूर्व-उत्तर दिशेला कचरा कधीही ठेवू नये.

देवघरात शंख ठेवा

जर तुम्ही पैशाशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर दक्षिणावर्ती शंख पूजागृहात ठेवा. तसेच नियमित पूजा करताना शंख वाजवा. असे केल्याने घरात लक्ष्मी देवी वास करते आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
Mallikarjun Kharge | माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?