AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips: अनावश्यक त्रासाला समोर जाताय? मग वास्तुशास्त्रातील ‘या’ चुकांना अवश्य टाळा 

वास्तुदोष उत्पन्न होणार नाही यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. वास्तूशास्त्रातले काही नियम जाणून घेऊया

Vastu Tips: अनावश्यक त्रासाला समोर जाताय? मग वास्तुशास्त्रातील 'या' चुकांना अवश्य टाळा 
वास्तुशास्त्र Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 09, 2022 | 7:06 PM
Share

मुंबई, वास्तुशास्त्रामध्ये (Vastushastra) घराशी संबंधित अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याचे पालन केल्याने व्यक्तीला वास्तुदोषांपासून (Vastu dosh) मुक्ती मिळते, पण यासोबतच काही कामांचाही त्यात उल्लेख करण्यात आला आहे, जे केल्याने माणसाच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो आणि वास्तुदोष उत्पन्न होण्याची भीती वाढते. वास्तू दोषांमुळे आर्थिक, शारीरिक किंवा मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. यासोबतच कुटुंबात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात, ज्यामुळे व्यक्ती तणावग्रस्त होते. अशा परिस्थितीत, व्यक्तीने अशा काही चुका टाळल्या पाहिजेत, ज्यामुळे घरामध्ये नकारात्मक उर्जेच्या प्रभावाची भीती वाढते. जाणून घेऊया कोणत्या कृतींमुळे घरात नकारात्मकता वाढते.

वास्तुशास्त्रानुसार या चुका करू नये

  1. घर, कामाच्या ठिकाणी किंवा दुकानात जास्त काळ अंधार नसावा असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. असे झाल्यास नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव झपाट्याने वाढतो आणि वास्तू दोषाचा धोकाही वाढतो. म्हणूनच प्रकाशासाठी या ठिकाणी नेहमी कमी पॉवरचे बल्ब किंवा दिवा लावावा.
  2. वास्तुशास्त्रानुसार घरात रोज पूजा करावी. यासोबतच घरामध्ये रोज मंत्रांचा जप करावा. हा नियम न पाळल्यास नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढू शकतो आणि व्यक्तीला वास्तुदोषांना सामोरे जावे लागू शकते.
  3. वास्तुशास्त्रात असेही सांगण्यात आले आहे की, व्यक्तीने रात्रीच्या वेळी सुगंधी वस्तूंचा वापर कमी केला पाहिजे. कारण ते नकारात्मक ऊर्जा जलद आकर्षित करते आणि वास्तू दोषांचा धोका वाढवते.
  4. जर एखाद्या व्यक्तीला घरी येताच तणाव, शक्तीहीन किंवा गोंधळल्यासारखे वाटत असेल तर ते वास्तू दोषाचे लक्षण असू शकते. म्हणूनच रोज सकाळी आणि संध्याकाळी घंटा आणि शंख वाजवा. असे केल्याने तुम्ही लवकरच सकारात्मक बदल पाहू शकता.
  5. वास्तुशास्त्रात असेही सांगण्यात आले आहे की शुद्धतेमुळे वास्तुदोषाचा धोका टळतो. म्हणूनच स्वतःला तसेच घर नेहमी स्वच्छ ठेवा. अन्यथा नकारात्मक शक्ती कुटुंबावर वर्चस्व गाजवू शकतात.
  6. जर घरामध्ये सतत तणाव असेल आणि कुटुंबातील एक किंवा दुसरा सदस्य वेळोवेळी आजारी पडत असेल तर ते वास्तुदोषामुळे असू शकते. म्हणूनच घरी धार्मिक कार्ये भक्तीभावाने करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
नसरापूर प्रकरणातील आरोपीची धक्कादायक कबुली, जीव गेला की नाही पाहण्या..
नसरापूर प्रकरणातील आरोपीची धक्कादायक कबुली, जीव गेला की नाही पाहण्या...
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार?
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार?.
| जळगाव सराफ बाजारात सोनं-चांदी महागलं; 24 तासांत विक्रमी दरवाढ
| जळगाव सराफ बाजारात सोनं-चांदी महागलं; 24 तासांत विक्रमी दरवाढ.
मोठी अपडेट! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार...
मोठी अपडेट! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार....
ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकनाथ शिंदेंसोबत प्रवास....
ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकनाथ शिंदेंसोबत प्रवास.....
ममता बॅनर्जींनी राजीनामा नाही दिला तर... कायदेतज्ञ काय सांगतात?
ममता बॅनर्जींनी राजीनामा नाही दिला तर... कायदेतज्ञ काय सांगतात?.
तमिळनाडूत टीव्हीकेचा सत्तास्थापनेसाठी दावा, काँग्रेसच्या पाठिंब्याने..
तमिळनाडूत टीव्हीकेचा सत्तास्थापनेसाठी दावा, काँग्रेसच्या पाठिंब्याने...
मोठी अपडेट! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला, भाजपच्या विजयी रॅलीत...
मोठी अपडेट! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला, भाजपच्या विजयी रॅलीत....
पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर...
पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर....
नसरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, म्हणाला, मी नशेत...
नसरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, म्हणाला, मी नशेत....