AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips: अनावश्यक त्रासाला समोर जाताय? मग वास्तुशास्त्रातील ‘या’ चुकांना अवश्य टाळा 

वास्तुदोष उत्पन्न होणार नाही यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. वास्तूशास्त्रातले काही नियम जाणून घेऊया

Vastu Tips: अनावश्यक त्रासाला समोर जाताय? मग वास्तुशास्त्रातील 'या' चुकांना अवश्य टाळा 
वास्तुशास्त्र Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 09, 2022 | 7:06 PM
Share

मुंबई, वास्तुशास्त्रामध्ये (Vastushastra) घराशी संबंधित अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याचे पालन केल्याने व्यक्तीला वास्तुदोषांपासून (Vastu dosh) मुक्ती मिळते, पण यासोबतच काही कामांचाही त्यात उल्लेख करण्यात आला आहे, जे केल्याने माणसाच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो आणि वास्तुदोष उत्पन्न होण्याची भीती वाढते. वास्तू दोषांमुळे आर्थिक, शारीरिक किंवा मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. यासोबतच कुटुंबात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात, ज्यामुळे व्यक्ती तणावग्रस्त होते. अशा परिस्थितीत, व्यक्तीने अशा काही चुका टाळल्या पाहिजेत, ज्यामुळे घरामध्ये नकारात्मक उर्जेच्या प्रभावाची भीती वाढते. जाणून घेऊया कोणत्या कृतींमुळे घरात नकारात्मकता वाढते.

वास्तुशास्त्रानुसार या चुका करू नये

  1. घर, कामाच्या ठिकाणी किंवा दुकानात जास्त काळ अंधार नसावा असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. असे झाल्यास नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव झपाट्याने वाढतो आणि वास्तू दोषाचा धोकाही वाढतो. म्हणूनच प्रकाशासाठी या ठिकाणी नेहमी कमी पॉवरचे बल्ब किंवा दिवा लावावा.
  2. वास्तुशास्त्रानुसार घरात रोज पूजा करावी. यासोबतच घरामध्ये रोज मंत्रांचा जप करावा. हा नियम न पाळल्यास नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढू शकतो आणि व्यक्तीला वास्तुदोषांना सामोरे जावे लागू शकते.
  3. वास्तुशास्त्रात असेही सांगण्यात आले आहे की, व्यक्तीने रात्रीच्या वेळी सुगंधी वस्तूंचा वापर कमी केला पाहिजे. कारण ते नकारात्मक ऊर्जा जलद आकर्षित करते आणि वास्तू दोषांचा धोका वाढवते.
  4. जर एखाद्या व्यक्तीला घरी येताच तणाव, शक्तीहीन किंवा गोंधळल्यासारखे वाटत असेल तर ते वास्तू दोषाचे लक्षण असू शकते. म्हणूनच रोज सकाळी आणि संध्याकाळी घंटा आणि शंख वाजवा. असे केल्याने तुम्ही लवकरच सकारात्मक बदल पाहू शकता.
  5. वास्तुशास्त्रात असेही सांगण्यात आले आहे की शुद्धतेमुळे वास्तुदोषाचा धोका टळतो. म्हणूनच स्वतःला तसेच घर नेहमी स्वच्छ ठेवा. अन्यथा नकारात्मक शक्ती कुटुंबावर वर्चस्व गाजवू शकतात.
  6. जर घरामध्ये सतत तणाव असेल आणि कुटुंबातील एक किंवा दुसरा सदस्य वेळोवेळी आजारी पडत असेल तर ते वास्तुदोषामुळे असू शकते. म्हणूनच घरी धार्मिक कार्ये भक्तीभावाने करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे.
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका.
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!.
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार.
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद.
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती.
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष.
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक.