AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जे लोक स्वत:ला राजा मानायचे ते आज…, ‘ मोदी यांची काँग्रेसवर नाव न घेता जहरी टीका

पंतप्रधान मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर दिले. याआधी बुधवारी लोकसभेत विरोधी पक्षाने मोठा गोंधळ केल्याने मोदी यांचे भाषण झाले नाही.लोकसभेने आभार प्रदर्शन प्रस्ताव उत्तराविनाच पारित केला. लोकसभा अध्यक्षांनी यावेळी विरोधी पक्षाची वागणूकही काळा डाग असल्याचे म्हटले.

'जे लोक स्वत:ला राजा मानायचे ते आज..., ' मोदी यांची काँग्रेसवर नाव न घेता जहरी टीका
pm modi
| Updated on: Feb 05, 2026 | 6:32 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावावर चर्चेला उत्तर देताना काँग्रेससह विरोधी पक्षला झोडून काढले. काँग्रेसच्या सरकारने लक्ष न दिल्याने देश मागे पडला होता. देशासमोर अनेक आव्हाने आहेत. नवी जागतिकी समीकरणे तयार होत आहेत. नव्या जागतिक स्थितीत भारताकडे लोक झुकले आहेत. महिलांचा आणि तरुणांचा विकास आपले ध्यैय आहे. विरोधी पक्षाने यावेळी राज्यसभेत मोदी यांच्या भाषणात आधी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षाला टार्गेट करताना म्हणाले की जे लोक स्वत:ला राजा मानायचे. ते लोक आता आर्थिक असमानतेवर बोलत आहेत. घुसखोरांचे वकीलपत्र घेणाऱ्यांना तरुण कसे माफ करतील. घुसखोर त्यांचा स्वांतत्र्य हिसकावत आहेत. त्यांची रोजी रोठीचा हक्क हिसकावत आहेत. अशा लोकांसाठी हे लोक कवच बनले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की यांनी असे काम केले की जी योजना ९०० कोटींची होती तरी ९० हजार कोटींची झाली.

राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, “जगातील प्रमुख देश आज भारतासोबत व्यापारासाठी भागीदारी करण्यास उत्सुक आहेत. युरोपियन युनियन (EU) सोबतचा व्यापार करार असो किंवा अमेरिकेसोबतचा अलीकडील व्यापार करार असो.” पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “संपूर्ण जग आपल्या व्यापार करारांचे उघडपणे स्वागत करीत आहे. जेव्हा युरोपियन युनियनसोबत व्यापार करार झाला,त्यामुळे स्थिरतेवरील जागतिक विश्वास बळकट झाला. अमेरिकेसोबतच्या व्यापार करारानंतर जागतिक विश्वास आणखी वाढला आहे. पूर्वी स्थिरतेची भावना होती तिच्यासोबत आता गतीची भावना देखील एकत्र मिळाली आहे.

बँकांचा एनपीएचा भार कमी केला

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, आमच्या सरकारने बँकांमधील एनपीएचा डोंगर कमी केला आहे आणि तो १ टक्क्यांपेक्षा कमी या विक्रमी नीचांकी पातळीवर आणला आहे. विरोधक अर्बन नक्षलवाद्यांप्रमाणे सार्वजनिक उपक्रमांबद्दल(पीएसयू) लोकांना दिशाभूल करायचे.पूर्वी असे मानले जात होते की सार्वजनिक उपक्रमांचा एकमेव उद्देश तोटा सहन करणे हाच आहे. परंतु आज ते विक्रमी नफा कमावित आहेत. पंतप्रधान म्हणाले की पूर्वी असा समज होता की सार्वजनिक उपक्रम फक्त तोटा सहन करण्यासाठीच तयार केले जातात, परंतु आज, त्या समजुतीच्या विरुद्ध, सार्वजनिक उपक्रम विक्रमी नफा कमावत आहेत असेही त्यांनी सांगितले.

मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे.
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका.
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!.
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार.
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद.
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती.
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष.
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक.