घर सजवताना सावधान! ‘या’ 5 चित्रांमुळे वाढू शकतो वास्तुदोष; जाणून घ्या सविस्तर
जर तुम्ही देखील घर सजवण्याचा विचार करत असाल आणि घरांमध्ये वेगवेगळे फोटो लावत असाल तर सावधान. घरात हे 5 फोटो कधीच लावू नका. जाणून घ्या कोणते आहेत ते फोटो?

Vastu Tips : घर सुंदर आणि आकर्षक दिसावे यासाठी अनेकजण भिंतींवर विविध प्रकारची पेंटिंग्स आणि सजावटीची चित्रे लावतात. मात्र, वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक चित्रातून विशिष्ट ऊर्जा निर्माण होत असते. त्यामुळे घर सजवताना फक्त सौंदर्याचा विचार न करता वास्तुचे नियमही लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे जाणून घेऊया अशी कोणती 5 चित्रे आहेत जी घरात लावणे अशुभ मानले जाते आणि त्याऐवजी कोणती चित्रे सुख-समृद्धी आणू शकतात.
1. युद्ध, भांडण किंवा हिंसाचार दर्शवणारी चित्रे
महाभारत युद्ध, तलवारी, मारामारी, रक्तपात किंवा कोणत्याही प्रकारच्या संघर्षाचे चित्र घरात लावणे वास्तुशास्त्रानुसार अत्यंत अशुभ मानले जाते. अशी चित्रे घरातील सदस्यांमध्ये मतभेद वाढवतात. त्यामुळे घरात सतत तणावपूर्ण वातावरण निर्माण होते आणि किरकोळ कारणांवरूनही वाद होण्याची शक्यता वाढते.
2. बुडणारे जहाज किंवा नाव दर्शवणारी पेंटिंग
जर घरात किंवा कार्यालयात बुडणाऱ्या जहाजाचे, समुद्रात अडकलेल्या बोटीचे किंवा वादळातील दृश्याचे चित्र असेल तर ते आर्थिक नुकसानाचे प्रतीक मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार अशा चित्रांमुळे व्यवसायात तोटा, पैशांची अडचण आणि प्रगतीत अडथळे निर्माण होऊ शकतात. अनेक वेळा लोक मॉडर्न डेकोरेशन म्हणून अशी चित्रे लावतात, मात्र वास्तुनुसार ती नकारात्मक ऊर्जा वाढवणारी असतात.
3. वाळलेली झाडे, ओसाड जमीन आणि उजाड दृश्ये
वाळलेली झाडे, पानगळ झालेली वनस्पती, बंजर जमीन, उद्ध्वस्त इमारती किंवा ओसाड हवेली यांसारखी चित्रे निराशा आणि उदासीनतेचे प्रतीक मानली जातात. अशी चित्रे पाहिल्याने नकळत मनावर नकारात्मक परिणाम होतो. घरात सकारात्मकता आणि उत्साह टिकवून ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या कलाकृतींपासून दूर राहणे अधिक योग्य मानले जाते.
4. रडणाऱ्या किंवा दुःखी व्यक्तींची चित्रे
आजकाल मॉडर्न आर्टच्या नावाखाली दुःखी चेहरे, रडणारी व्यक्ती किंवा वेदना दर्शवणारी चित्रे घरात लावली जातात. वास्तुशास्त्रानुसार ही चित्रे मानसिक तणाव वाढवू शकतात. घरातील वातावरण सतत जड आणि उदास राहू शकते.
5. मावळत्या सूर्याचे चित्र
उगवता सूर्य ऊर्जा, नवीन सुरुवात आणि आशेचे प्रतीक मानला जातो. मात्र मावळत्या सूर्याचे चित्र जीवनातील स्थिरता कमी होणे, आळस आणि प्रगतीतील मंदी यांचे संकेत मानले जाते. अशी चित्रे घरात लावल्यास कामांमध्ये विलंब होणे, उत्साह कमी होणे आणि निर्णयक्षमता घटणे यासारखे परिणाम दिसू शकतात असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)