मोठी बातमी! नफ्याच्या हव्यासाने घेतले 14 जीव!; विषारी दारूकांडामागचं काळं सत्य समोर
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. तपासादरम्यान विषारी दारू तयार करण्यापासून ते विविध दारू अड्ड्यांपर्यंत तिचा पुरवठा कसा झाला, याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. तपासादरम्यान विषारी दारू तयार करण्यापासून ते विविध दारू अड्ड्यांपर्यंत तिचा पुरवठा कसा झाला, याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उरळी कांचनमधील राधेश्याम प्रजापती हा हातभट्टी दारू तयार करत होता. त्याच्याकडून योगेश वानखेडे हा दारू खरेदी करून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध अड्ड्यांवर विक्री करत होता. अधिक नफा कमावण्यासाठी योगेश वानखेडे याने दारूमध्ये मोठ्या प्रमाणात मिथेनॉल मिसळल्याने ही दारू विषारी बनली.
ही दारू फुगेवाडीतील कर्नेलसिंह विरका आणि गुरमितसिंह विरका या बापलेकांच्या अड्ड्यावर विकली गेल्याचं समोर आलं आहे. तसेच खडकी, वडारवाडी, हडपसर आणि काळेपडळ परिसरातही या दारूचा पुरवठा करण्यात आला होता.
या प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सहा तर पुणे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे पुणे ग्रामीण, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
नफ्याच्या हव्यासाने घेतले 14 जीव! विषारी दारूकांडामागचं काळं सत्य समोर
तुळजापुरात खुलेआम मटक्याचा बाजार!; सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल
NEET घोटाळ्यावर सुप्रीम कोर्टाचे NTA ला थेट प्रश्न.....
मनोज जरांगे पाटलांच्या भेटीपूर्वी विखे पाटलांचं मोठं विधान, उपोषणावर..

