AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vat Purnima 2025: 10 की 11 जून कधी करावा पौर्णिमेचा उपवास? मुहूर्तासह विधी जाणून घ्या

Vat Purnima 2025: विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे वटपौर्णिमा, जाणून घ्या 10 की 11 जून कधी कराल उपवास? मुहूर्तासह विधी जाणून घ्या...

Vat Purnima 2025: 10 की 11 जून कधी करावा  पौर्णिमेचा उपवास? मुहूर्तासह विधी जाणून घ्या
फाईल फोटो
| Updated on: Jun 09, 2025 | 8:46 PM
Share

Vat Purnima 2025: पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वट सावित्री व्रत (Vat Purnima 2023) पाळले जाते. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला वट सावित्री व्रत पाळण्याची प्रथा आहे. हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. काही पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष दर्जा देण्यात आला आहे. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा देखील यामध्ये समाविष्ट आहे. या दिवशी वट सावित्री व्रत पाळले जाते म्हणून याला वट पौर्णिमा असेही म्हणतात.

अनेक राज्यात वट सावित्रीचे उपवास केले जातात. तर महाराष्ट्र, गुजरात आणि दक्षिण भारतीय राज्यांमध्ये ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वट सावित्री व्रत पाळले जाते. जाणून घ्या यावर्षी वट सावित्री पौर्णिमेचे व्रत कधी पाळले जाईल?

पंचांगानुसार, यंदाच्या वर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी 10 जून रोजी सकाळी 11.35 वाजता सुरू होईल आणि 11 जून रोजी दुपारी 1.13 वाजता संपेल. रात्री चंद्रोदयापासून पौर्णिमेचे व्रत पाळले जाते. म्हणून, 10 जून रोजी वट सावित्री व्रत पाळले जाईल.

यंदाच्या वर्षी, वट पौर्णिमा व्रताच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 8:52 ते दुपारी 2:05 पर्यंत आहे. स्नान आणि दान करण्याची वेळ पहाटे 4:02 ते 4:42 पर्यंत असेल. चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी 6:45 वाजता असेल.

विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेला महिला वडाच्या झाडाखाली एकत्रीत येतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करतात. वडाच्या झाडाला 7, 11 किंवा 21 वेळा प्रदक्षिणा घालतात. दिवा लावतात आणि पूजा झाल्यानंतर, महिला सावित्री आणि सत्यवानाची कथा ऐकतात. शेवटी, आरती करतात आणि. प्रसाद वाटतात.

वट सावित्री व्रताचे महत्त्व

पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी वट सावित्रीचे व्रत ठेवते. धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने पतीच्या सर्व अडचणी दूर होतात. वट सावित्रीच्या आख्यायिकेनुसार या व्रताच्या प्रभावामुळे सावित्री देवीचा पती सत्यवानाला मृत्यूची देवता यमराजाने जीवनदान दिले. याशिवाय हे व्रत ठेवल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यांपासूनही सुटका मिळते. वट सावित्री व्रताच्या दिवशी वट म्हणजेच वटवृक्षाची पूजा केली जाते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं.
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय....
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....