AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Premanand Maharaj : पत्नी खोटारडी, धोका देणारी असली तर करायचं काय ? प्रेमानंद महाराजांनी थेट सांगितलं..

प्रेमानंद महाराजांचे उपदेश आणि प्रवचने लोकांच्या जीवनाला नवीन दिशा देतात. अलिकडेच एका व्यक्तीने प्रेमानंद महाराजांना विचारले की जर एखाद्याची पत्नी कठोर शब्द बोलली किंवा तिने फसवणूक केली तर अशा वेळी काय करावे ? यावर प्रेमानंद महाराजांनी काय सल्ला दिला ते जाणून घेऊया.

Premanand Maharaj : पत्नी खोटारडी, धोका देणारी असली तर करायचं काय ? प्रेमानंद महाराजांनी थेट सांगितलं..
प्रेमानंद महाराज
| Updated on: Nov 12, 2025 | 10:31 AM
Share

वृंदावनमधील प्रसिद्ध संत आणि गुरु प्रेमानंदजी महाराज हे नेहमीच त्यांचे विचार आणि उपदेशांमुळे चर्चेत असतात. ते त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून लाखो लोकांच्या जीवनाला दिशा देतात. त्यांची शिकवण अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होते, ज्यापासून लोक प्रेरणा घेतात. एखाद्याची पत्नी जर खोटं बोलायला लागली किंवा छळ करत असेल तर अशा वेळी काय करावं, कसं वागावं हे प्रेमानंद महाराज यांनी नुकतंच सांगितलं.

प्रेमानंद महाराजांना सवाल

एका भक्ताने प्रेमानंद महाराजांना विचारलं की पत्नी जर खूप खोटं बोलत असेल, कटू बोलत असेल, त्रास देत असेल किंवा त्यांना साथ देत नसेल तर अशा परिस्थितीत काय करावं? या प्रश्नाचं उत्तर देताना प्रेमानंद महाराज म्हणाले की जर तुमची पत्नी तुमच्याशी खोटं बोलत असेल किंवा फसवणूक करत असेल तर, अशा परिस्थितीत (तुम्ही) तिला अधिक प्रेम दिलं पाहिजे.

प्रत्येक परिस्थितीत निभवा कर्तव्य

प्रेमानंद महाराज म्हणाले , “पती म्हणून तुमचे कर्तव्य आहे की, पत्नीवर प्रेम करणे आणि त्यांची काळजी घेणं आणि तुम्ही ती जबाबदारी पार पाडली पाहिजे. जर तुमची पत्नी तिचे कर्तव्य विसरून तुम्हाला वेदना देत असेल, कठोर शब्द बोलत असेल आणि संकटे आणत असेल तर ते सहन करा आणि तुमच्या प्रेमात अंतर आणू देऊ नका. तुम्ही तुमची कर्तव्यं नीट पार पाडली पाहिजेत. पत्नीची कर्तव्ये काय आहेत ते देव पाहून घेईल.” असं त्यांनी सांगितलं.

पत्नीमध्ये देव असतो, त्यामुळे तिला कधी विरोध करू नका. एक पती म्हणून, तिला सल्ला द्या, पण जर ती ऐकत नसेल तर तिच्यावर रागावण्याऐवजी तुम्ही शांत राहिलं पाहिजे. कारण तुमचे कर्म तुमच्यासोबत आहेत आणि तिचे कर्म तिच्यासोबत असतं असंही त्यांनी सांगितलं.

प्रेमानंद महाराजांनी दिला सल्ला

जर तुमची पत्नी तुम्हाला सोडून गेली तर ते ठीक आहे, पण कधीही तुमच्या पत्नीला सोडून देऊ नका किंवा विरोध करू नका. प्रेमानंद महाराज म्हणाले, “जर आपण सहन करायला शिकलो तर आपण आपल्या कुटुंबाला वाचवू शकतो, स्वतःला वाचवू शकतो आणि मोठ्या संकटांना तोंड देऊ शकतो. आजकाल सहनशीलता खूप कमी झाली आहे, ज्यामुळे लोक अगदी छोट्याशा गोष्टीवरही रागावतात. पण असं होऊ नये; आपण स्वतःमध्ये सहनशीलता आणली पाहिजे” असा सल्ला त्यांनी तिला.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका.
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप.
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा.
पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेना; इस्राईल-इराण युद्धाचा परिणाम
पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेना; इस्राईल-इराण युद्धाचा परिणाम.
जालन्यातील अवैध गर्भपात प्रकरणात दानवेंचे भाजपवर आरोप
जालन्यातील अवैध गर्भपात प्रकरणात दानवेंचे भाजपवर आरोप.
आई दुसऱ्यांकडे धुणीभांडी करते, वडील वॉचमन; मुलागा झाला IPS अधिकारी
आई दुसऱ्यांकडे धुणीभांडी करते, वडील वॉचमन; मुलागा झाला IPS अधिकारी.
सिलेंडर रिफिल बुकिंगचे नियमात मोठा बदल! 25 दिवसांनीच करता येणार बुकिंग
सिलेंडर रिफिल बुकिंगचे नियमात मोठा बदल! 25 दिवसांनीच करता येणार बुकिंग.
नागपूरमध्ये गॅस सिलेंडर तुटवड्याची शक्यता; OTP शिवाय सिलेंडर नाही
नागपूरमध्ये गॅस सिलेंडर तुटवड्याची शक्यता; OTP शिवाय सिलेंडर नाही.
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ? मिसळ महागणार?
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ? मिसळ महागणार?.
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह.