AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री केसं कापू नये असे जुने लोकं का सांगायचे? हे आहे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण

नखे आणि केस कापणे, झाडू मारणे आणि इतर अनेक गोष्टी रात्रीच्या वेळी केल्यास जुने लोकं अजूनही टोकतात.

रात्री केसं कापू नये असे जुने लोकं का सांगायचे? हे आहे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण
केशकर्तन Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 10, 2022 | 2:34 PM
Share

मुंबई,  हिंदू धर्मात अनेक प्रथा आणि परंपरा (Hindu Customs and Traditions) आहेत. या प्रथा वर्षानुवर्षे सुरू आहेत. यामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचा उल्लेख शास्त्रात आहे. ज्यांना या प्रथा माहीत आहेत. त्यांना त्यामागील कारण माहित नाही, परंतु तरीही या नियमांचे पालन करतात. नखे आणि केस कापणे, झाडू मारणे आणि इतर अनेक गोष्टी रात्रीच्या वेळी केल्यास जुने लोकं अजूनही टोकतात. यामागे प्रत्येकजण वेगवेगळी कारणे सांगतात. ग्रामीण भागात वडीलधाऱ्यांच्या या सल्ल्याचे पालन करणारे अनेक जण आहेत.  या मागचे कारण जाणून घेऊया

वैज्ञानिक कारण

शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिले तर रात्री केस न कापण्याचे कारण म्हणजे रात्री केस इकडे तिकडे उडतात. काही वेळा अन्नात केस जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आजारी पडण्याची भीती आहे. याशिवाय केसांतून घाण आणि बॅक्टेरिया पसरण्याची भीती असते. त्यामुळे रात्री केस कापण्यास मनाई केली जाते.

धार्मिक कारणे

हिंदू धर्मात सूर्योदय आणि सूर्यास्ताला खूप महत्त्व दिले जाते. दिवसाची वेळ कोणत्याही कामासाठी अनुकूल मानली जाते. सूर्यास्तानंतर केस किंवा नखे ​​कापू नयेत हा जुना नियम आहे. ज्यावर आजही लोक विश्वास ठेवतात. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार रात्री केस कापणे अशुभ मानले जाते. असे मानले जाते की संध्याकाळी लक्ष्मी घरात वास करते. सुख-समृद्धी आणि ऐश्वर्य मिळावे यासाठी महालक्ष्मी रात्री घरी राहते. त्यामुळे रात्री केस न कापण्याचा सल्ला दिला जातो. दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास पूर्वीच्या काळी वीज नसल्याने केसं कापताना इजा होण्याची शक्यता होती. यामुळेदेखील रात्री केसं कापण्यास मनाई केली जात असे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.