AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hanuman Ji | हनुमानजींना संकटमोचन का म्हटलं जातं, जाणून घ्या

मंगळवारचा दिवस हा रामभक्त हनुमानाला समर्पित असतो. मान्यता आहे की हनुमान जी 11 वे रुद्रावतार आहेत आणि अमर आहेत. हनुमानजी आजही पृथ्वीवर फिरत आहेत, असं म्हणतात. तसेच, ज्याहीठिकाणी अखंड रामायण पठण श्रद्धेने केले जाते तेथे हनुमान जी कुठल्या ना कुठल्या रुपात निश्चित पोचतात. म्हणूनच ते कलियुगचा प्रत्यक्ष देवता मानले जातात.

Hanuman Ji | हनुमानजींना संकटमोचन का म्हटलं जातं, जाणून घ्या
Hanuman
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Jul 13, 2021 | 8:21 AM
Share

मुंबई : मंगळवारचा दिवस हा रामभक्त हनुमानाला समर्पित असतो. मान्यता आहे की हनुमान जी 11 वे रुद्रावतार आहेत आणि अमर आहेत. हनुमानजी आजही पृथ्वीवर फिरत आहेत, असं म्हणतात. तसेच, ज्याहीठिकाणी अखंड रामायण पठण श्रद्धेने केले जाते तेथे हनुमान जी कुठल्या ना कुठल्या रुपात निश्चित पोचतात. म्हणूनच ते कलियुगचा प्रत्यक्ष देवता मानले जातात. हनुमानजी खूप शक्तिशाली आहेत, म्हणून त्यांना बजरंगबली आणि महावीर सारख्या नावाने देखील ओळखले जाते. संकटमोचन हेही त्यांचेच एक नाव आहे. हे नाव कसे पडले त्याबद्दल जाणून घ्या (Why Hanuman ji is called as sankatmochan know this).

मान्यता आहे की जेव्हा भगवान राम त्रेतायुगात अडचणीत होते तेव्हा हनुमानजी संपूर्ण भक्तीने त्यांचे सहायक म्हणून राहिले आणि त्यांचे सर्वात मोठे संकट दूर केले. त्यांनी रावणाच्या लंकेला आग लावली आणि आपल्या स्वामीबद्दलच्या त्याच्या भक्तीचा पुरावा दिला. जेव्हा लक्ष्मण बेशुद्ध झाले तेव्हा संजीवनी बूटीच्या नावाने त्यांनी संपूर्ण डोंगर उचलून आणला. रावणापासून सीतेला वाचवण्यासाठी श्री राम आणि वानर सैन्यासह लंकेवर हल्ला केला. श्रीराम यांचे संकट दूर केल्यामुळे त्यांना संकटमोचन हे नाव मिळाले.

असं म्हणतात की, जगात असे कोणतेही संकट नाही, ज्यांचे निराकरण सर्वात शक्तिशाली हनुमानजी करु शकत नाही. संकटकाळी त्यांच्या कोणत्याही भक्ताने त्यांचे श्रद्धेने स्मरण केले तर ते नक्कीच आपल्या भक्ताच्या मदतीसाठी पोहोचतात. तुमच्या आयुष्यात काही अडचण येत असेल तर तुम्ही देखील हनुमानजींची खरी भक्ती करुन प्रार्थना करावी. ते तुमची प्रत्येक समस्या सोडवतील.

मंगळवारी हे उपाय केल्याने सर्व संकटं टळतील

1. हनुमानजींना चोला खूप आवडतो. चोला हे त्यांच्या रामभक्तीचे प्रतिक आहेत. आपण मंगळवारी त्यांना चोला अर्पण केल्यास ते प्रसन्न होतात आणि भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

2. मान्यता आहे की जर तुम्ही दररोज हनुमान चालीसाचे पठण केले तर तुमचे जीवन खूप सोपे होईल कारण संकट मोचन तुमचे सर्व त्रास दूर करतील. जर दररोज नसेल तर मंगळवार आणि शनिवारी करा.

3. मंगळवारी सुंदरकांडचे पठण करणे फार चांगले मानले जाते. हनुमान जी लंकेत माता सीतेला भेटल्याचा संदर्भ त्यात आहे.

4. मंगळवारी हनुमानजींसमोर चमेली तेलाचा दिवा लावावा आणि वानरांना गूळ-चणे खायला द्या. वानरांना हनुमानजींची सेना म्हणतात.

5. मंगळवारी संध्याकाळी अशा मंदिरात जा जेथे भगवान श्री राम आणि हनुमानजींची मूर्ती आहे. तेथे तुपाचा दिवा लावा आणि प्रथम श्री रामरक्षा स्तोत्र आणि नंतर हनुमान चालीसाचे पठण करा.

Why Hanuman ji is called as sankatmochan know this

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Shanishchari Amavasya 2021 | वर्षातील दुसरी शनिश्चरी अमावस्या, जाणून घ्या ही तिथी खास का आहे?

Gupt Navratri 2021 | मनोकामना पूर्ण करण्यासाठी गुप्‍त नवरात्रात करा शक्तीची साधना

Follow Us
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी