AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोर्टात साक्ष देताना भगवत गीतेवर हात ठेऊन शपथ का दिली जाते? असा आहे नियम

oath act India ईस्ट इंडिया कंपनीने सुरुवातीला साक्षीदारांच्या शपथेसाठी भारतात मुघल काळापासूनच्या परंपरा पुढे नेल्या. मुघलांच्या काळात, दरबारात हिंदूंना निष्ठेची शपथ घ्यायची किंवा हातात गंगाजल घेऊन खरे बोलायचे.

कोर्टात साक्ष देताना भगवत गीतेवर हात ठेऊन शपथ का दिली जाते? असा आहे नियम
प्रतिकात्मक फोटोImage Credit source: Social Media
| Updated on: Sep 07, 2023 | 11:45 AM
Share

मुंबई : 70 ते 90 च्या दशकातील कोणताही चित्रपट असो, कोर्टरूमचा सीन असेल तर एक गोष्ट कॉमन होती. ती म्हणजे साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला गीता किंवा कुराण कापडात गुंडाळून कोर्टाचा कर्माचारी शपथ घ्यायला सांगतो. मग, साक्षीदार त्यावर हात ठेवून शपथ घेतो की, ‘मी जे काही बोलेन ते मी सत्य सांगेन, सत्याशिवाय काहीही सांगणार नाही.’ न्यायालयांचे हे सिनेमॅटिक चित्र पूर्णपणे काल्पनिक नाही. ब्रिटिशांनी तो कायद्याचा भाग (oath act India) बनवला होता. इंग्रज गेल्यानंतरही धर्मग्रंथांवर हात ठेऊन साक्षीदारांना शपथ देण्याची परंपरा कोर्टात दीर्घकाळ चालू होती.

ब्रिटीशांनी सुरू केली होती पद्धत

ईस्ट इंडिया कंपनीने भारत काबीज केला तेव्हा शासनापासून ते न्यायालयापर्यंत ज्या परंपरा ब्रिटिशांनी इंग्लंडमध्ये स्वीकारल्या होत्या त्याच होत्या. त्यांच्यासाठी राजा सर्वोच्च होता, राजा कधीत चुकत नाही असे म्हटले जाजचे. इंग्लंडमध्ये जसजसा चर्चचा प्रभाव वाढला, तसतसा त्यांचा राजेशाही सत्ता आणि परंपरांमध्येही ढवळाढवळ वाढत गेली. पूर्वी इंग्लंडमध्ये लोकं राजाच्या नावाने शपथ घेत असत. नंतर त्याची जागा देवाने घेतली आणि बायबलवर हात ठेवून शपथ घेण्यात यायची. भारतातही इंग्रजांनी ही व्यवस्था न्यायालयांमध्ये राबवली.

ईस्ट इंडिया कंपनीने सुरुवातीला साक्षीदारांच्या शपथेसाठी भारतात मुघल काळापासूनच्या परंपरा पुढे नेल्या. मुघलांच्या काळात, दरबारात हिंदूंना निष्ठेची शपथ घ्यायची किंवा हातात गंगाजल घेऊन खरे बोलायचे होते. नंतर गंगाजलाची जागा श्रीमद भागवत गीतेने घेतली. तसेच इतर लोकांनीही धर्मग्रंथावर आपापल्या धर्मानुसार शपथ दिली जायची. 1873 मध्ये केलेल्या शपथ कायद्यात काही बदल करून ते चालू ठेवण्यात आले.

धर्मावर आधारित राज्यकारभार आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या भारतीय शासनपद्धतीत पूर्वीही देवाची शपथ घेण्याची प्रथा प्रचलित होती. गौतम संहितेपासून ते विष्णू पुराण आणि मनूच्या ग्रंथांपर्यंत धर्मावर आधारित शपथेचा उल्लेख आहे. ही धर्म-आधारित शपथ प्रणाली विवेकापेक्षा दैवी शक्तीच्या  भीतीवर आधारित होती, ज्यामध्ये असा विश्वास होता की जो धर्म किंवा देवतेच्या नावावर सत्य बोलतो त्याचे मरणोत्तर जीवन चांगले असते. जर त्याने खोटे बोलले तर त्याला नरकात जावे लागते. चाणक्याने राज्यपद्धतीवर आधारित ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथातही देव किंवा धर्माच्या नावाने शपथ घेणे अनिवार्य केले होते. कुराणात असेही म्हटले आहे की, तुमची शपथ मोडू नका कारण तुम्ही देवाला साक्षीदार म्हणून निवडले आहे.

कायदा काय सांगतो?

स्वतंत्र भारतात पहिली दोन दशके धर्मग्रंथांवर हात ठेवून साक्षीदारांनी शपथ घेतली. उदाहरणार्थ, 1957 पर्यंत, मुंबई उच्च न्यायालयाने गैर-हिंदू आणि गैर-मुस्लिमांनी त्यांच्या धार्मिक ग्रंथांच्या नावाने शपथ घेण्याची तरतूद चालू ठेवली. ख्रिश्चनांना ‘न्यू टेस्टामेंट’वर, ज्यूंना ‘हिब्रू टेस्टामेंट’वर आणि पारशींना ‘झेंड-अवेस्ता’वर शपथ घ्यावी लागली. तर हिंदू आणि मुस्लिमांना देवाच्या नावाने शपथ घ्यावी लागायची.

शपथ कायदा 1969 मध्ये आणखी एक महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे, ज्याचा आधारही परंपरेशी जोडण्यात आला आहे. कायद्यानुसार, 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाला साक्ष देण्यासाठी शपथ घेण्याची आवश्यकता नाही. त्याची साक्ष थेट मान्य आहे. मुले ही देवाचे रूप आहेत आणि ते खोटे बोलत नाहीत, ही त्यामागची कल्पना आहे. मात्र, शपथेवर खोटे बोलणे किंवा खोटे पुरावे सादर करणे यासाठी शिक्षेचीही तरतूद आहे. यामध्ये शपथपत्रात चुकीची माहिती देणे देखील गुन्हा आहे कारण शपथ कायदा स्पष्टपणे सांगतो की एखादी व्यक्ती शपथेवर जे काही बोलते, त्याला तो स्वतः जबाबदार असतो.

निवडणूक आयुक्त सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर;वट्टेडीवरांचा हल्लाबोल
निवडणूक आयुक्त सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर;वट्टेडीवरांचा हल्लाबोल.
अजित पवारांनंतर कोणाकडे जाणार महत्त्वाची पदे?
अजित पवारांनंतर कोणाकडे जाणार महत्त्वाची पदे?.
लोकसभेचे कामकाज सुरु होताच विरोधकांचा गदारोळ
लोकसभेचे कामकाज सुरु होताच विरोधकांचा गदारोळ.
आधीच पत्ते उघडणं याला गेम म्हणत नाही; चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य
आधीच पत्ते उघडणं याला गेम म्हणत नाही; चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य.
पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणापूर्वीच तांत्रिक बिघाड
पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणापूर्वीच तांत्रिक बिघाड.
राज्यसभेसाठी पार्थ पवार यांचं नाव जवळपास निश्चित?
राज्यसभेसाठी पार्थ पवार यांचं नाव जवळपास निश्चित?.
लाडक्या बहिणींना खुशखबर! खात्यात जमा होणार 4500 रुपये?
लाडक्या बहिणींना खुशखबर! खात्यात जमा होणार 4500 रुपये?.
उल्हासनगर, वसई, भाईंदरमध्ये आज महापौरांची निवड
उल्हासनगर, वसई, भाईंदरमध्ये आज महापौरांची निवड.
ऑपरेशन लोटसमधून अजित पवारांचं बरं वाईट झालं नाही ना? राऊतांचा प्रश्न
ऑपरेशन लोटसमधून अजित पवारांचं बरं वाईट झालं नाही ना? राऊतांचा प्रश्न.
शेअर मार्केटमध्ये मोठी उसळी! निफ्टी 1 हजार 219 अंकांनी वाढला
शेअर मार्केटमध्ये मोठी उसळी! निफ्टी 1 हजार 219 अंकांनी वाढला.