AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लक्ष्मी एका जागी टिकत नाही असे का म्हणतात? लक्ष्मी चंचल असण्यामागची ही गोष्ट माहिती आहे का?

भगवान विष्णू गंभीर आणि धीर धरणारे असले तरी त्यांचा स्वभाव शाश्वत आहे. तर, माता लक्ष्मी चंचल आहे. ती जास्त दिवस कुठेच राहत नाही.

लक्ष्मी एका जागी टिकत नाही असे का म्हणतात? लक्ष्मी चंचल असण्यामागची ही गोष्ट माहिती आहे का?
माता लक्ष्मीImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 16, 2023 | 5:22 PM
Share

मुंबई,  लक्ष्मीचा वास आपल्या घरीच असावा असे प्रत्येकाला वाटते. पण लक्ष्मी ही एका ठिकाणी स्थिर नसते. शास्त्रानुसार धनाची देवी लक्ष्मी (Lakshmi) ही भगवान विष्णूची (Bhagwan Vishnu) पत्नी आहे. देवलोकात अनेक देवी-देवता आहेत, जे स्वभावाने एकमेकांच्या विरुद्ध आहेत, परंतु त्यांचे विवाहित जीवन एकमेकांना पूरक आहे. लक्ष्मीजीही याच प्रकारात मोडतात. भगवान विष्णू गंभीर आणि धीर धरणारे असले तरी त्यांचा स्वभाव शाश्वत आहे. तर, माता लक्ष्मी चंचल आहे. ती जास्त दिवस कुठेच राहत नाही. दोघांचे विचार आणि उद्दिष्टे एकच असली तरी दोघांचे स्वरूप वेगळे आहे. लक्ष्मीजींच्या चंचल स्वभावाची कथाही खूप रंजक आहे.

काय आहे आख्यायीका

एकदा हा प्रश्न ब्रह्मर्षी नारदांनी ब्रह्माजींना विचारला होता. माता लक्ष्मी चंचल का आहे? त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ब्रह्माजी म्हणाले, जर लक्ष्मी एखाद्याच्या स्थानी कायम असेल तर ती व्यक्ती पृथ्वीवरील अभिमानाने भंग पावून निरनिराळ्या दुष्कृत्यांमध्ये गुंतून जाईल. या कारणासाठी देवयोगाने लक्ष्मीजींना चंचल मन दिले आहे. या संपूर्ण त्रैलोक्यात लक्ष्मी जर कोणाच्या अधीन असेल तर ती श्री विष्णू आहे. लक्ष्मीजींचे अस्तित्व विष्णूजींच्या गुरुत्वाकर्षणात विलीन झाले आहे, त्यामुळे लक्ष्मीजींना प्रसन्न करण्यापूर्वी विष्णूजींना प्रसन्न करणे आवश्यक आहे. जे मनापासून विष्णूजींची पूजा करतात, त्यांना लक्ष्मीची कृपा सहज मिळू लागते. भगवान विष्णूच्या भक्तांवर लक्ष्मीची कृपा सदैव राहाते.

या उपायांनी होईल माता लक्ष्मी प्रसन्न

  1. शुक्रवारी अष्ट लक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीच्या 8 रूपांची पूजा करा. ही पूजा रात्री करा. ही पूजा सूर्यास्तानंतर कधीही करू शकता.
  2. यासोबतच लक्ष्मीच्या प्रिय श्रीयंत्राचीही पूजा करावी. श्रीयंत्राची पूजा करण्याबरोबरच त्यात बनवलेल्या प्रत्येक कोनाकडे पहा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक संकटे टळतात.
  3. अष्ट लक्ष्मीच्या पूजेच्या वेळी देवी लक्ष्मीला कमळ आणि गुलाबाची फुले अर्पण करा, असे केल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल.
  4. जर तुमचे पैसे चोरीला गेले असेल किंवा कुठेतरी अडकले असेल तर तुम्ही शुक्रवारी काळ्या मुंग्यांना साखर, गूळ, मैदा किंवा इतर कोणतीही पांढरी गोड वस्तू खाऊ घालावी.
  5. घरात काळ्या मुंग्या येणे हे सुख आणि समृद्धीचे लक्षण आहे. म्हणूनच त्यांना अन्न मिळाले पाहिजे तसेच त्यांना मारण्याची चूक करू नये.
  6. शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मीला गूळ आणि फुटण्याचा नैवेद्य दाखवावा यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा..
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा...
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा.
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया.
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?.
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ.