AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाच्या आधी का लावली जाते हळद? नवरदेव नवरीवर काय होतो याचा परिणाम

असे मानले जाते की लग्नापूर्वी हळद लावल्याने जोडप्याला सुखी जीवनाचा आशीर्वाद मिळतो. यासोबतच हळदीमध्ये त्वचा सुधारण्याचे आणि चमकदार बनवण्याचे गुणधर्म देखील आहेत.

लग्नाच्या आधी का लावली जाते हळद? नवरदेव नवरीवर काय होतो याचा परिणाम
हळदImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 09, 2023 | 10:17 PM
Share

मुंबई, भारतात लग्नसमारंभ म्हणजे एकप्रकारचा मोठा सोहळाच असतो. कारण भारतीय संस्कृतीत लग्नाच्या प्रथा हा हजारो वर्षांपासून यशस्वीपणे पाळल्या जात आहेत. त्यात लग्नात घातल्या जाणाऱ्या कपड्यांपासून तर दागिन्यांपर्यंत, अशा अनेक गोष्टी या खबरदारीनं पाळल्या जातात. परंतु तुम्ही विचार केलाय का लग्नात नवरा आणि नवरीला हळद (Haldi in Marrage) किंवा मेहेंदी का लावली जाते?, त्याबद्दल जाणून घेऊयात. भारतीय परंपरेत हळद अतिशय शुभ मानली जाते,ज्यामध्ये हळदीचा लेप वधू-वरांना लावला जाते. हळदीमध्ये तेल आणि पाणी मिसळून ही पेस्ट तयार केली जाते.

असे मानले जाते की लग्नापूर्वी हळद लावल्याने जोडप्याला सुखी जीवनाचा आशीर्वाद मिळतो. यासोबतच हळदीमध्ये त्वचा सुधारण्याचे आणि चमकदार बनवण्याचे गुणधर्म देखील आहेत.

नवरा आणि नवरीला का लावतात हळद?

भारतात जवळपास सर्वच भागांमधील लग्नात नवरा आणि नवरीला हळद लावली जाते. महाराष्ट्रात तर हळद लावण्याचा स्पेशल प्रोग्राम असतो. यावेळी नवरा आणि नवरीच्या पूर्ण चेहऱ्यावर आणि हातापायांवर हळद लावली जाते. ही प्रथा मुलामुलींची सुंदरता वाढवण्यासाठी पाळली जाते, असं काही जाणकार सांगत असतात.

परंतु हळदीत असलेल्या औषधी गुणांमुळं त्याचा शरिराला फायदाच होत असतो. त्वचेवर लग्नावेळी हळद लावल्यानं त्यावरील बॅक्टिरीया संपण्यास मदत होते. त्याचबरोबर हळदी लावल्यानं त्वचा मॉस्चराइज होण्यासही मदत होते.

लग्नावेळी का लावतात मेहेंदी?

भारतातलं कोणतंही लग्न हे मेहेंदी लावल्याशिवाय होत नाही. कारण मेहेंदीविना नवरीचा श्रुंगार अपूर्ण मानला जातो. त्यामुळं भारतीय लग्नांत मेहेदीला अनन्यसाधारण महत्व आहे. याशिवाय मेहेंदीत एन्टीसेप्टिक तत्वही असतात, त्यामुळं नवरा व नवरीला तणाव आणि डोकेदुखीपासून बचाव करता येतो. याशिवाय त्यामुळं नखांचे आजारही कमी होऊन त्यांची सुंदरता वाढते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.