शेतकऱ्यांमुळे आपण सुखाचा घास घेतोय, अजिंक्य रहाणे थेट बांधावर

| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

मुंबई : टीम इंडियाचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे थेट शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचला. शेतकऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करतानाचा एक व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केलाय. आपण जर सुखाचा घास घेत असू तर तो फक्त शेतकऱ्यामुळे, म्हणून शेतकऱ्याला कधीही विसरु नका, असं आवाहन अजिंक्य रहाणेने केलंय. व्हिडीओमध्ये अजिंक्य रहाणे एका शेतकऱ्यासोबत दिसत आहे. या बाबत तो म्हणतो, “एका […]

शेतकऱ्यांमुळे आपण सुखाचा घास घेतोय, अजिंक्य रहाणे थेट बांधावर
Follow us on

मुंबई : टीम इंडियाचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे थेट शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचला. शेतकऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करतानाचा एक व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केलाय. आपण जर सुखाचा घास घेत असू तर तो फक्त शेतकऱ्यामुळे, म्हणून शेतकऱ्याला कधीही विसरु नका, असं आवाहन अजिंक्य रहाणेने केलंय.

व्हिडीओमध्ये अजिंक्य रहाणे एका शेतकऱ्यासोबत दिसत आहे. या बाबत तो म्हणतो, “एका शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे माझ्या मनात शेतकऱ्यांकरिता खूप आदर आहे. जर आज आपल्या ताटामध्ये अन्न आहे, ते फक्त शेतकऱ्यांमुळे. त्यांच्या दररोजच्या मेहनतीमुळे आज आपण सुखाचे घास घेत आहोत.”

व्हिडीओ पाहा