AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या शरीरात या व्हिटॅमिनची कमतरता भासल्यास त्वचा होते कोरडी, यासाठी त्वरित करा ‘हे’ उपाय

हिवाळ्यात या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी होऊ शकते. अशा वेळेस कोणत्या फळांचा समावेश आपल्या आहारात करणे खूप प्रभावी ठरू शकते. चला तर मग आजच्या लेखात आपण कोणत्या व्हिटॅमिनची कमतरता भासल्यास त्वचा कोरडी होते आणि कोणते उपाय केले पाहिजे ते जाणून घेऊयात.

तुमच्या शरीरात या व्हिटॅमिनची कमतरता भासल्यास त्वचा होते कोरडी, यासाठी त्वरित करा 'हे' उपाय
dry skinImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 18, 2025 | 11:38 PM
Share

हिवाळा सुरू झाला की आरोग्यासोबतच त्वचेच्या समस्याही निर्माण होतात. कारण या दिवसांमध्ये वातावरणात बदल होतात तसेच थंड वारे देखील अधिक वाहतात. तसेच हिवाळ्यात प्रदूषणात वाढ होते. त्यामुळे आपल्यापैकी अनेकांना असे वाटते की या सर्व कारणांमुळे कोरड्या त्वचेची समस्या उद्भवते. काही प्रमाणात ही कारणं खरं असले तरी आपल्या शरीरात थंडीच्या दिवसात या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे देखील त्वचा कोरडी होऊ शकते. जर तुम्हाला वारंवार सर्दी होत असेल, तुमची त्वचा कोरडी आणि निर्जीव होत असेल, तुमच्या हिरड्यांमधून रक्त येत असेल किंवा तुमच्या जखमा हळूहळू बऱ्या होत असतील, तर ही व्हिटॅमिन सीच्या कमतरतेची लक्षणे असू शकतात. तर आजच्या लेखात आपण या समस्या टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता ते जाणून घेऊयात.

थंडीच्या दिवसात व्हिटॅमिन सी का महत्त्वाचे आहे?

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आणि निरोगी त्वचा राखण्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, ज्यामुळे तुम्हाला या दिवसांमध्ये संसर्ग लगेच होते ज्यामुळे तुम्ही आजारी पडतात. व्हिटॅमिन सीची कमतरता ही चुकीचे आहार, जंक फूडचे जास्त सेवन, सतत अपचन, ताणतणाव किंवा अनियमित जीवनशैलीमुळे देखील होऊ शकते.

– व्हिटॅमिन सीच्या नैसर्गिक स्रोतांमध्ये संत्री, लिंबू, किवी, स्ट्रॉबेरी आणि विशेषतः आवळा यांचा समावेश आहे, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास आणि त्वचेला चमक देण्यास मदत करते. त्यामुळे थंडीच्या दिवसात या फळांचा आहारात समावेश करा.

– आयुर्वेदात जीवनसत्त्वांच्या कमतरतेचा संबंध धातूंच्या क्षय आणि पचनशक्ती कमी होण्याशी जोडला गेला आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की संतुलित आहार आणि योग्य दिनचर्येद्वारे या कमतरता टाळता येतात.

– व्हिटॅमिन सीची कमतरता दूर करण्यासाठी दररोज ताजी फळे आणि हंगामी भाज्या खा. दररोज एक आवळा खाणे पुरेसे आहे. इतर पदार्थांमध्ये पेरू, शिमला मिरची, ब्रोकोली, पपई आणि टोमॅटो यांचा समावेश नक्की करा.

या गोष्टी लक्षात ठेवा:

हिवाळ्यात त्वचेची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक असते. म्हणून, केवळ आहार पुरेसा नाही. फेस वॉशने पूर्णपणे मॉइश्चरायझिंग करणे देखील आवश्यक आहे. विशेषतः बाहेरून आल्यानंतर तुमचा चेहरा स्वच्छ करायला विसरू नका.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा..
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा...
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा.
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया.
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?.
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ.
भोंदू बाबा खरातचा पेनड्राईव्ह बाहेर आल्यास तीन मंत्र्यांची विकेट जाईल
भोंदू बाबा खरातचा पेनड्राईव्ह बाहेर आल्यास तीन मंत्र्यांची विकेट जाईल.