AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final : न्यूझीलंडकडून पराभवानंतर निराश विराटची मोठी वक्तव्य, कसोटी संघात होणार बदल, काय म्हणाला कोहली?

न्यूझीलंडच्या संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) अंतिम सामन्यात भारताला आठ विकेट्सने पराभूत करत विजय मिळवला. या विजयासह भारताच विश्वविजेता होण्याचं स्वप्न तुटल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने प्रसार माध्यमांशी बोलताना काही महत्त्वाचे निर्णय सांगितले.

WTC Final : न्यूझीलंडकडून पराभवानंतर निराश विराटची मोठी वक्तव्य, कसोटी संघात होणार बदल, काय म्हणाला कोहली?
विराट कोहली
| Edited By: | Updated on: Jun 24, 2021 | 1:34 PM
Share

मुंबई : दोन वर्ष अप्रतिम खेळ दाखवून ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारख्या संघाना पराभूत करुन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) अंतिम सामन्यात पोहोचलेला भारतीय संघ न्यूझीलंडकडून 8 विकेट्सने पराभूत झाला. पराभवचं खापर सर्वात जास्त कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli) फोडलं जात असताना विराटने काही महत्त्वाची वक्तव्य करत भारतीय कसोटी संघात मोठे बदल होणार असल्याचा इशारा दिला आहे. (After losing in ICC WTC Final 2021 against New Zealand Indian Captain Virat Kohli says Important thing and gave some hints of changes in Test Team)

भारतीय संघामध्ये तगडे खेळाडू असतानाही भारताचा पहिला डाव 217 धावांवर आटोपला. ज्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात 249 धावा करत 32 धावांची लीड घेतली. जी फेडताना भारत 170 धावांवर ऑलआऊट झाला आणि न्यूझीलंडला केवळ 139 धावांचे लक्ष्य मिळाले. जे त्यांनी केवळ 2 विकेट गमावत मिळवले आणि भारताचा पराभव झाला. इतके चांगले खेळाडू असतानाही पराभव झाल्यानंतर ‘या सर्व पराभवाबद्दल सर्व संघ व्यवस्थापन योग्य विचार करेल आणि योग्य पावले उचलेल’ असे विराटने सामन्यानंतर एका ऑनलाईन प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितले.

नाव न घेता साधला निशाना

भारतीय फलंदाजाच्या सुमार कामगिरीमुळेच भारत पराभूत झाला. त्यामुळे विराटने बोलताना फलंदाजावर इशार साधला कोणाचेही नाव न घेता विराटने फलंदाजाच्या कामगिरीबद्दल निराशा व्यक्त केली. सामन्यात वरिष्ठ फलंदाज चेतेश्वर पुजाराने मोठ्या प्रमाणात निराश केलं. पहिल्या डावात 54 बॉल्समध्ये त्याने केवळ 8 धावा केल्या. पहिली धाव घेण्यासाठी पुजाराने 35 चेंडू घेतले. तर दुसऱ्या डावात 80 बॉल्समध्ये 15 धावांच केल्या. या सर्वांवर बोलताना कोहली म्हणाला, ”आम्ही आत्ममंथन करणार आहोत. संघाला आणखी मजबूत करण्यासाठी काय करावं लागेल? याचा विचार करणार आहोत. आम्ही वर्षभर वाट न पाहता लवकरच योग्य निर्णय घेऊन मर्यादित षटकांतील भारतीय संघाप्रमाणे कसोटी संघ करणार आहोत.”

नवीन सुरुवात करावी लागले.

कोहली म्हणाला,‘‘आम्हाला एक नवीन सुरुवात करुन योग्य ती योजना आखावी लागेल.तसेच संघासाठी काय फायदेशीर आहे ते जाणून घेऊन आम्ही निडरपणे कसे खेळू शकणार आहोत. याचाही विचार करावा लागणार आहे. त्यासाठी कोणत्या खेळाडूंना संघात आणावं  लागले याचाही विचार होणार आहे. आधी मानसिक दृष्ट्या ताकदवर होऊन आम्हाला खेळ सुधारावा लागेल.’’

 हे ही वाचा :

WTC Final : भारतीय संघाच्या पराभवानंतर विराटसह विल्यमसनही भावूक, फोटो सोशल मीडियावर व्हायरल, चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस

WTC Final 2021 : न्यूझीलंडचा जिगरबाज खेळाडू, कारकीर्दीतील शेवटची कसोटी, बोट तुटलं तरीही खेळतच राहिला…!

WTC Final 2021 : ‘चॅम्पियन’ न्यूझीलंड मालामाल, भारताचाही खिसा गरम, पाहा कुणाला किती बक्षिसाची रक्कम मिळाली…

(After losing in ICC WTC Final 2021 against New Zealand Indian Captain Virat Kohli says Important thing and gave some hints of changes in Test Team)

Follow Us
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग