AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2013 चॅम्पियन ट्रॉफीनंतर भारत खेळला 10 आयसीसी स्पर्धा, असा राहिला प्रवास; जाणून घ्या

टीम इंडियाने पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत स्थान मिळवलं आहे. टीम इंडिया 27 जूनला इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. 2013 नंतर टीम इंडिया ही 11वी स्पर्धा खेळत आहे. चला जाणून घेऊयात आतापर्यंत काय केलं ते

2013 चॅम्पियन ट्रॉफीनंतर भारत खेळला 10 आयसीसी स्पर्धा, असा राहिला प्रवास; जाणून घ्या
| Updated on: Jun 26, 2024 | 10:05 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची विजय घोडदौड सुरु आहे. साखळी फेरीनंतर सुपर 8 फेरीतही टीम इंडियाने विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. मात्र आता बाद फेरीत टीम इंडियाची कसोटी लागणार आहे. बाद फेरीत टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. या सामन्यात करो या मरोची लढाई आहे. टीम इंडियाने 10व्यांदा बाद फेरीत स्थान मिळवलं आहे. सलग या ग्रपमध्ये एन्ट्री घेऊनही भारताला 2013 पासून आतापर्यंत एकही जेतेपद मिळवता आलेलं नाही. टीम इंडियाने आयसीसी स्पर्धेचं शेवटचं जेतेपद महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात 2013 मध्ये जिंकला होता. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये इंग्लंडला त्याच्यात धरतीवर मात दिली होती. येथून पुढे टीम इंडियाने एकही जेतेपद जिंकलेलं नाही. भारताने 2007 मध्ये पहिल्यांदा टी20 वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर आतापर्यंत निराशाच पदरी पडली आहे. 2009, 2010, 2012 मध्ये ग्रुप स्टेजमधूनच गाशा गुंडाळावा लागला. 2014 मध्ये श्रीलंकेने अंतिम फेरीत पराभूत केलं. 2016 मध्ये वेस्ट इंडिजने उपांत्य फेरीत हरवलं. 2021 मध्ये ग्रुप स्टेजमध्ये बाहेर, 2022 मध्ये इंग्लंडने उपांत्य फेरीत पराभूत केलं.

भारताने शेवटचा वनडे वर्ल्डकप 2011 मध्ये जिंकला होता. 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत, 2019 मध्ये न्यूझीलंडने उपांत्य फेरीत, तर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत पराभूत केलं. चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत सांगायचं तर, 2017 मध्ये पाकिस्तानने अंतिम फेरीत पराभूत केलं होतं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्याची दोनदा संधी मिळाली. पण दोन्ही वेळेस पदरात निराशा पडली. 2021 मध्ये न्यूझीलंडकडून आणि 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला.

टीम इंडियाने 2013 पासून आतापर्यंत दहा आयसीसी स्पर्धामध्ये भाग घेतला. 9 वेळा बाद फेरीत स्थान मिळवलं आणि एकदा साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलं. 9 बाद फेरीत भारताने 13 सामने खेळले आहेत. यापैकी 9 सामन्यात पराभव आणि 4 सामन्यात विजय मिळाला आहे. या दरम्यान भारताने 4 उपांत्य फेरी आणि 5 अंतिम सामने गमवले आहेत.  मागच्या 11 वर्षात 5 वेळा जेतेपद मिळवता मिळवता चुकला आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.