AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : अनुष्का शर्माने विराट कोहलीला केलं ‘आऊट’, रागाच्या भरात थेट मैदान सोडत म्हणाला…

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या जोडीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ चाहत्यांना खूपच आवडला. कारण या व्हिडीओत क्रिकेटच्या मैदानात दोघांमध्ये जुलगबंदी पाहायला मिळाली. इतकंच काय तर अनुष्काने विराट कोहलीला बाद केलं आणि मग काय झालं ते जाणून घ्या

Video : अनुष्का शर्माने विराट कोहलीला केलं 'आऊट', रागाच्या भरात थेट मैदान सोडत म्हणाला...
| Updated on: Oct 02, 2024 | 8:08 PM
Share

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे कोट्यवधी चाहते आहेत. विराट कोहलीची क्रिकेटमधील ओळख किंग म्हणून आहे. तर अनुष्का शर्माही अभिनयासह क्रिकेटची माहिती ठेवते. आता या दोघांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात दोघांमध्ये क्रिकेटवरून तू तू मै मै झाल्याचं दिसत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि गल्ली क्रिकेटमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे बॅट हातात घेतल्यानंतर पहिल्यांदा नियम माहिती असणं गरजेचं आहे, असं अनुष्का शर्मा म्हणाली. त्याबाबत अनुष्का शर्मा विराट कोहलीला समजावून सांगत होती. पण विराट कोहली म्हणाला, मला क्रिकेटचे सर्व नियम माहिती आहेत. त्यामुळे या दोघांच्या सामन्यात प्रत्येक चेंडूनंतर काही ना काही घडत होतं. या व्हिडीओच्या सुरुवातीला अनुष्का शर्मा नियमांची यादी वाचून दाखवत आहे. यातील पहिला नियम असा की, तीनवेळा बॅटला बॉल लागला नाही तर आऊट असेल. दुसऱ्या नियमानुसार, तीनवेळा बॉल अंगाला लागला तरी आऊट असेल. हे नियम ऐकून विराट कोहलीला राग आला. मग नियम नंबर तीन ऐकून राग शांत झाला. कारण नुसता राग दाखवला तरी आऊट असेल असा हा नियम होता. नियम नंबर 4 सांगताना अनुष्का म्हणाली ज्याची बॅट तो पहिल्यांदा फलंदाजी करेल. मग काय सामन्याला सुरुवात झाली.

अनुष्का शर्मा फलंदाजीसाठी उतरली. विराट कोहलीने गोलंदाजी टाकताना पहिल्याच चेंडूवर अनुष्काला त्रिफळाचीत केलं. मग पहिला चेंडू ट्रायल असतो असं सांगत पुन्हा बॅटिंगला सुरुवात केली. मग दुसऱ्या चेंडूवर बाद झाल्यानंतर काहीच कारण सांगता आलं नाही. मग अनुष्का गोलंदाजीसाठी आली. पहिल्याच चेंडूवर विराटने जोरदार फटका मारला आणि बॉल थेट बाहेर गेला. मग काय आणखी नियम तयार झाला. जो बॉल मारेल तोच आणेल.

अनुष्काच्या गोलंदाजीवर आणखी एक फटका मारला आणि म्हणाला की हा लस्सी शॉट होता. त्यानंतर अनुष्काने टाकलेला बॉल विराटच्या शरीराला लागला. त्यामुळे विराट कोहली स्टंप असलेल्या बॉक्सपासून थोडा दूर उभा होता. मग काय अनुष्काने बॉल टाकला आणि त्या स्टंपरुपी बॉक्सला लागला. तिने मग आऊट असल्याचं सांगताच विराट संतापला म्हणाला असं कसं आऊट..मग रागाच्या भरात मैदान सोडून जात होता. तेव्हा अनुष्काने आणखी एक नियम सांगितला की रागाने गेला तर आऊट..मग विराटला आणखी राग आणि म्हणाला मला नाही खेळायचं.

मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा.
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर.
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी.
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती...
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती....
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात.
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?.
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर.
कोण कुणाचे लाडके, उदय सामंत मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे?
कोण कुणाचे लाडके, उदय सामंत मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे?.
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य.