Asia Cup 2022 : भारतावरून पाकिस्तानला फटकारलं, तौसीफ अहमदनं PCBची हजेरी घेतली, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

| Updated on: Aug 11, 2022 | 8:08 AM

आशिया चषक 27 ऑगस्टपासून सुरू होत आहे. पाकिस्तान एक दिवस नंतर म्हणजेच 28 ऑगस्टला कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करेल. यामुळे या सामन्याकडे देखील आता विशेष लक्ष असणार आहे.

Asia Cup 2022 : भारतावरून पाकिस्तानला फटकारलं, तौसीफ अहमदनं PCBची हजेरी घेतली, नेमकं काय घडलं? जाणून घ्या...
pakistan team
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (Pakistan Cricket Board) आशिया कप 2022 साठी (Asia Cup 2022) आपला संघ जाहीर केला आहे. या संघात अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळाले आहेत. हसन अलीला या संघातून वगळण्यात आले आहे. यामुळे माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. 40 वर्षीय शोएब मलिकालाही या संघात स्थान मिळालेले नाही. मात्र, हा अनुभवी खेळाडू या संघात आपले स्थान निर्माण करू शकेल, असे अनेकांना वाटत होते. यासोबतच आशिया चषकासाठी निवडण्यात आलेल्या संघाच्या मधल्या फळीतही कमतरता असल्याची चर्चा आहे. पाकिस्तानचा माजी गोलंदाज तौसीफ अहमद (Taufik Ahmed) म्हणतो की, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड संतुलित संघ बनवण्यात अपयशी ठरले आहे. पाकिस्तानसाठी 34 कसोटी आणि 70 एकदिवसीय सामने खेळलेल्या तौसीफने स्पोर्ट्स पाकटीव्हीला सांगितले की, “तुम्ही संघ व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला नाही. काही वर्षांपूर्वी जे खेळाडू होते तेच खेळाडू कोणत्या ना कोणत्या मार्गाने पुनरागमन करत आहेत. जेव्हा यासारख्या काही महत्त्वाच्या स्पर्धा येतात तेव्हा तुम्ही त्या खेळाडूंकडे जाता ज्यांच्याबद्दल तुम्ही एकदा म्हटले होते की त्यांनी क्रिकेट सोडावे. याचा अर्थ असा की तुमच्याकडे बॅकअप योजना नाही.’

भारताविरुद्धच्या खेळाची काळजी

तौसीफ अहमद म्हणाला की, जोपर्यंत तुम्ही सेटल होत नाही तोपर्यंत काही अर्थ नाही. सौद शकील तिथे होता, अजून 2-3 खेळाडू होते, आता तू कुठे आहेस?” त्याने पुढे असा दावा केला की पाकिस्तानला सध्या संपूर्ण आशिया चषकापेक्षा भारताविरुद्धच्या खेळाची काळजी आहे. तौसीफ अहमद पुढे म्हणाले,

नियोजन करावे लागेल

“आम्हाला आमचा संघ चांगला हवा आहे. आम्ही विचार करत होतो की ते शोएब मलिकची निवड करतील, कारण तुम्हाला या क्षणी फक्त हे लोक आठवतात. पण आम्हाला आशिया कपची पर्वा नाही, आम्हाला फक्त भारताविरुद्धच्या त्या 2-3 सामन्यांची काळजी आहे. हे असे आहे.. ‘आपण हे जिंकलो तर तेच’. तो मार्ग नाही. तुम्हाला नियोजन करावे लागेल.”

भारत- पाकिस्तान आमनेसामने

आशिया चषक 27 ऑगस्टपासून सुरू होत आहे आणि पाकिस्तान एक दिवस नंतर म्हणजेच 28 ऑगस्टला कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करेल. संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार्‍या कॉन्टिनेन्टल स्पर्धेत, दोन्ही बाजू दोनदा किंवा तीनदा (अंतिम फेरीपर्यंत पोहोचेपर्यंत) आमनेसामने येऊ शकतात. यामुळे या सामन्याकडे देखील विशेष लक्ष असणार आहे.