AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंत की कार्तिक, कोण खेळणार Asia Cup 2022? भारतीय विकेटकीपरने दिलं सरळ उत्तर

आशिया कप 2022 चं काउंटडाउन सुरु झालय. त्याचबरोबर भारतीय संघ व्यवस्थापनाची कुठल्या 11 खेळाडूंना संधी द्यायची, त्यावरुन डोकेदुखी वाढलीय.

पंत की कार्तिक, कोण खेळणार Asia Cup 2022? भारतीय विकेटकीपरने दिलं सरळ उत्तर
Dinesh Karthik-Rishabh PantImage Credit source: AFP
| Updated on: Aug 15, 2022 | 3:53 PM
Share

मुंबई: आशिया कप 2022 चं काउंटडाउन सुरु झालय. त्याचबरोबर भारतीय संघ व्यवस्थापनाची कुठल्या 11 खेळाडूंना संधी द्यायची, त्यावरुन डोकेदुखी वाढलीय. भारतीय संघाकडे सध्याच्या घडीला क्वालिटी विकेटकीपर आहेत. दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, संजू सॅमसन, इशान किशन हे विकेटकिपींग सोबत तडाखेबंद फलंदाजी सुद्धा करु शकतात. आशिया कपच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिकपैकी कोणा एकाला जागा मिळेल. या बद्दल आतापासूनच विविध तर्क लढवले जात आहेत.

प्लेइंग इलेव्हन मध्ये दोघांना जागा मिळणार?

ऋषभ पंतला पहिली पसंती मिळेल, हे स्पष्ट आहे. पण दिनेश कार्तिककडून त्याला कडवी टक्कर मिळत आहे. आशिया कप भारतासाठी टी 20 वर्ल्ड कप आधी एक मोठा इवेंट आहे. आता प्लेइंग इलेव्हन मध्ये दोघांना जागा मिळते की, एकाला हे लवकरच कळेल. टीम मधल्या स्थानावरुन पंतने मोठ विधान केलय. “टीम मध्ये मला जागा मिळते की, कार्तिकला ते कोच आणि कॅप्टनवर अवलंबून आहे”. दोन्ही खेळाडू मॅचविनर आहेत. फक्त काही चेंडूं मध्ये ते खेळाची दिशा बदलू शकतात.

पंत vs कार्तिक कामगिरी

मागच्या 10 डावातील पंत आणि कार्तिकच्या प्रदर्शनाची तुलना केली, तर पंतने 171 धावा आणि कार्तिकने 155 धावा केल्यात. कार्तिकच्या 55 धावांच्या इनिंगच्या तुलनेत पंतची 44 धावांची खेळी सर्वश्रेष्ठ आहे. पंतला अनेकदा वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवल जातं. कार्तिकचा वापर फिनिशर म्हणूनच केला जातो. दोन्ही खेळाडू अनेकदा प्लेइंग इलेव्हन मध्ये एकत्र खेळले आहेत. टीम मॅनेजमेंटने कोणा एकाला संधी द्यावी, असं माजी खेळाडूंच मत आहे. त्यामुळे संघात संतुलन साधलं जाईल.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.