AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN | फायनलआधी बांग्लादेश बिघडवू शकते टीम इंडियाचा खेळ

IND vs BAN Asia cup 2023 : टीम इंडियाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. विजेतेपदाच्या सामन्याआधी आज होणारी मॅच टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे. फायनलआधी आजचा सामनाही टीम इंडियासाठी तितकाच महत्त्वाचा का आहे? जाणून घ्या.

IND vs BAN | फायनलआधी बांग्लादेश बिघडवू शकते टीम इंडियाचा खेळ
Team India Image Credit source: BCCI
| Updated on: Sep 15, 2023 | 8:01 AM
Share

कोलंबो : टीम इंडियाने आशिया कप 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. शुक्रवारी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर टीम इंडियाचा बांग्लादेश विरुद्ध सामना होणार आहे. सुपर-4 फेरीतला हा शेवटचा सामना आहे. बांग्लादेशची टीम फायनलच्या शर्यतीतून आधीच बाद झाली आहे. पण टीम इंडियाला फायनलआधी आजच्या सामन्यात बांग्लादेशला कमी लेखण्याची चूक महाग पडू शकते. यामुळे टीम इंडियाची विजयाची लय बिघडू शकते. बांग्लादेशमध्ये टीम इंडियाला हरवण्याची क्षमता आहे. असं झाल्यास फायनलआधी रोहित शर्माच्या टीमची लय बिघडू शकते. कॅप्टन रोहित शर्मा समोर सुद्धा प्रश्न असेल, की सध्याची विनिंग प्लेइंग इलेव्हन कायम ठेवायची की, आतापर्यंत टुर्नामेंटमध्ये न खेळलेल्या खेळाडूंना संधी द्यायची. टीममध्ये काही बदल होऊ शकतात, असे संकेत गोलंदाजी कोच पारस महाम्ब्रे यांनी दिले आहेत.

टीम इंडियामध्ये दोन खेळाडूंची एन्ट्री पक्की मानली जात आहे. श्रेयस अय्यर पूर्णपणे फिट आहे. नेट्समध्ये त्याने फलंदाजीसोबत गोलंदाजीचा सुद्धा सराव केला. त्याचं खेळणं निश्चित मानलं जात आहे. मोहम्मद सिराजच्या जागी मोहम्मद शमीला टीममध्ये स्थान मिळू शकतं. या दोन बदलांमुळे टीम इंडियावर जास्त परिणाम होणार नाही. दोन्ही खेळाडूंना वर्ल्ड कपआधी मॅचमध्ये खेळण्याची सुद्धा संधी मिळेल. अय्यरचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केल्यास इशान किशनला बाहेर बसवलं जाऊ शकतं. फायनलआधी आपली विजयी लय कायम ठेवण्याच्या दृष्टीने टीम इंडियासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. वर्ल्ड कपआधी काही खेळाडूंना मॅच टाइम मिळेल, ते सुद्धा तितकच महत्त्वाच आहे.

दोघांनी जास्तीत जास्त खेळणं टीम इंडियासाठी महत्त्वाच

केएल राहुल सुरुवातीच्या दोन सामन्यात खेळला नव्हता. पुनरागमन करताना त्याने पाकिस्तान विरुद्ध दमदार शतक ठोकलं. श्रीलंकेविरुद्ध चांगल्या सुरुवातीला मोठ्या इनिंगमध्ये बदलता आलं नाही. राहुल दुखापतीमुळे बरेच महिने टीमच्या बाहेर होता. मोठ्या ब्रेकनंतर परतल्यामुळे राहुलला जितके सामने खेळण्याची संधी मिळेल, ते टीमसाठी चांगलं आहे. जसप्रीत बुमराहची सुद्धा हीच स्थिती आहे. बुमराहने एक वर्षानंतर टीममध्ये पुनरागमन केलय. आशिया कपमध्ये बुमराह आतापर्यंत दोन सामने खेळलाय. वर्ल्ड कप आधी त्याने सुद्धा जास्तीत जास्त सामने खेळणं महत्त्वाच आहे.

भारत : रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

बांग्लादेश : शाकिब अल हसन (कॅप्टन), अनामुल हक बिजॉय, नजमुह हसन शांतो, तौहिद हृदय, अफीफ हुसैन ध्रुबो, मेहदी हसन मिराज, तास्किन अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, नासुम अहमद, शाक मेहदी हसन, नईम शेख, शमीम हुसैन, तंजिद हसन तमीम, तंजिम हसन साकिब.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.