AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेशच्या सुपरफॅनला कानपूर स्टेडियममध्ये मारहाण, मोहम्मद सिराजचा या प्रकरणाशी काय संबंध?

Bangladesh ‘super fan’ Tiger Roby: भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दुसरा कसोटीचा पहिला दिवस पावसाच्या व्यत्ययामुळे वाया गेला. 35 षटकांचा खेळ झाला आणि पावसाने हजेरी लावली. बांगलादेशची 3 बाद 107 अशी स्थिती होती. पण या सामन्यात बांगलादेशी फॅनला झालेली मारहाण चर्चेचा विषय ठरली आहे. आता या प्रकरणात मोहम्मद सिराजच्या नावाचा संबंध जोडला जात आहे.

बांगलादेशच्या सुपरफॅनला कानपूर स्टेडियममध्ये मारहाण, मोहम्मद सिराजचा या प्रकरणाशी काय संबंध?
| Updated on: Sep 27, 2024 | 4:55 PM
Share

कानपूर कसोटी सामन्यात भारत आणि बांग्लादेशचे खेळाडू सामना करत आहेत. असं असताना या सामन्याव्यतिरिक्त एक प्रकरण चांगलंच गाजत आहे. कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियममध्ये बांगलादेशचा जबरा फॅनला मारहाण करण्यात आली आहे. बांगलादेशच्या या चाहत्याचं नाव टायगर रोबी असं आहे. त्याने मारहाणीसाठी काही भारतीय चाहत्यांना जबाबदार धरलं आहे. मारहाणीनंतर टायगर रोबी रडताना दिसला. इतकंच काय तर पोटात जबर मार लागल्याने पोलिसांसमोरच गयावया करत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला थेट रुग्णालयात दाखल केलं. बांगलादेशच्या फॅनला मारहाण करण्याचं नेमकं कारण काय? नेमकं कशासाठी टायगर रोबीला मारहाण केली गेली? असे एक ना अनेक प्रश्न समोर येत आहेत. बांगलादेशच्या फॅनला मारहाण झाली, पण यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचं नाव काही कारण नसताना घेतलं जात आहे. मोहम्मद सिराजचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही. पण सोशल मीडियावर याबाबत काही दावे केले जात आहेत.

सोशल मीडियावरील दाव्यानुसार, टायगर रोबी सामन्यात विचित्र पद्धतीने वागत होता. त्यामुळे कानपूरच्या लोकांना राग अनावर झाला. इतकंच काय तर बांगलादेशचा हा फॅन मोहम्मद सिराजला शिव्या देत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे मैदानातील लोकांची तळपायाची आग मस्तकात गेली. इतकंच काय तर बांगलादेशचा हा फॅन चेन्नईमध्ये टीम इंडियाविरुद्ध घोषणाबाजी करत होता. दुसरीकडे, कानपूरमध्ये बांगलादेशी संघाचा विरोध होत आहे. बांगलादेशचा संघ कानपूरला आला तेव्हा काही संघटनांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. बांगलादेशमध्ये सत्तांतर झाल्यानंतर हिंदूंवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे संघटनांमध्ये रोष आहे. बांगलादेशी फॅनला झालेली मारहाण त्याच्या निगडीत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. पण याबाबत ठोस असं काहीच नाही.

दरम्यान, नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने लागला. कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बांगलादेशने पहिल्या दिवशी 3 गडी बाद 107 धावा केल्या आहे. पहिल्या दिवशी फक्त 35 षटकांचा सामना झाला. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवावा लागला.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल