AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BCCI Selection Committee : बीसीआयकडून टीम इंडियाच्या निवड समितीची घोषणा

बीसीसीआयने निवड समितीची घोषणा केली आहे. यामध्ये टीम इंडियासाठी 3 कसोटी आणि 5 वनडे खेळलेल्या खेळाडूची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्विट करत माहिती दिली आहे.

BCCI Selection Committee : बीसीआयकडून टीम इंडियाच्या निवड समितीची घोषणा
| Updated on: Jun 19, 2023 | 6:46 PM
Share

मुंबई : बीसीसीआयने महिला निवड समिती आणि ज्युनियर क्रिकेट समितीची घोषणा केली आहे. सुलक्षणा नाईक, अशोक मल्होत्रा ​​आणि जतीन परांजपे यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने श्यामा डे शॉ यांची भारतीय वरिष्ठ महिला निवड समितीच्या सदस्य म्हणून निवड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर व्हीएस टिळक नायडू यांची ज्युनिअर महिला निवड समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

श्यामा यांनी भारतासाठी 3 कसोटी आणि 5 वनडे असे एकूण 8 सामने खेळले आहेत.  क्रिकेट करिअरला अलविदा केल्यानंतर ती बंगालची सिलेक्टरही होती. डावखुऱ्या फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज, शॉने तीन कसोटी आणि पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे. 1985 ते 1997 पर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालचे प्रतिनिधित्व केलं आणि नंतर 1998 ते 2002 पर्यंत रेल्वेकडून खेळल्या होत्या.

व्हीएस टिळक नायडू यांनी 1998-99 ते 2009-10 दरम्यान कर्नाटक तसेच दुलीप ट्रॉफी आणि देवधर ट्रॉफीमध्ये दक्षिण विभागाचे प्रतिनिधित्व केलं आहे. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या नायडू यांनी 93 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 4386 धावा केल्या आहेत. 2013 ते 2016 या काळात त्यांनी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) कनिष्ठ निवड समितीचे अध्यक्षपद भूषवलं आहे.

दरम्यान, महिला भारतीय संघ डिसेंबरमध्ये इंग्लंडला रवाना होणार आहे. वर्षाच्या शेवटला भारतीय संघ ऑस्ट्रेलियासोबत एक कसोटी, 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. जी पुढील वर्षी जानेवारीपर्यंत चालणार आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.