AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : 3 सामने-2 कर्णधार, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, पहिला सामना कधी?

India A vs Australia A One Day Series : भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने मायदेशात ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध होणाऱ्या 3 एकदिवसीय सामन्यासाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे.

IND vs AUS : 3 सामने-2 कर्णधार, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, पहिला सामना कधी?
Board of Control for CricketImage Credit source: Bcci
| Updated on: Sep 14, 2025 | 7:15 PM
Share

यूएईमध्ये 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान एकूण 8 संघात आशिया कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. गतविजेता टीम इंडिया यंदाही आशिया कप जिंकणार, असा ठाम विश्वास क्रिकेट चाहत्यांन आहे. या आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात 14 सप्टेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची लगबग सुरु आहे. पहलगाम हल्ल्यानंतरही हा सामना होतोय. त्यामुळे भारतीयांचा या सामन्याला तीव्र विरोध आहे. या दरम्यान बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे.

3 सामने, 1 मालिका आणि 2 कर्णधार

बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया ए विरुद्धच्या 3 एकदिवसीय मालिकेसाठी इंडिया ए टीमची घोषणा केली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. इंडिया ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए यांच्यात एकूण 3 एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेचं आयोजन हे 30 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आलं आहे. या 3 सामन्यांच्या मालिकेत इंडिया ए चं 2 खेळाडूं नेतृत्व करणार आहेत.

ऑस्ट्रेलिया ए विरुद्धच्या पहिल्या सामन्यात रजत पाटीदार भारताचं नेतृत्व करणार आहे. तर शेवटच्या 2 सामन्ंयात तिलक वर्मा भारत अ संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. या मालिकेतील तिन्ही सामने कानपूरमध्ये होणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहेत. तसेच या तिन्ही सामन्यांना दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

ऑस्ट्रेलिया ए विरुद्धच्या मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 30 सप्टेंबर, कानपूर दुपारी दीड वाजता

दुसरा सामना, 3 ऑक्टोबर, कानपूर दुपारी दीड वाजता

तिसरा सामना, 5 ऑक्टोबर, कानपूर दुपारी दीड वाजता.

वनडे सीरिजसाठी इंडिया ए टीमची घोषणा

पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी इंडिया ए टीम : रजत पाटीदार (कॅप्टन), प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), रियान पराग, आयुष बडोनी, सूर्यांश शेडगे, विपराज निगम, निशांत सिंधू, गुरजपनीत सिंग, युधवीर सिंग, रवी बिश्नोई, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), प्रियांश आर्य आणि सिमरजीत सिंग.

दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेसाठी इंडिया ए टीम : तिलक वर्मा (कर्णधार), रजत पाटीदार (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), रियान पराग, आयुष बदोनी, सूर्यांश शेडगे, विपराज निगम, निशांत सिंधू, गुर्जपनीत सिंग, युधवीर सिंग, रवी बिश्नोई, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग.

Follow Us
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... मोठी खळबळ
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... नवनाथ वाघमारांचे वादग्रस्त विधान; मराठा समाज आक्रमक, थेट...
वैद्यनाथ मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची अलोट गर्दी
श्रावण सोमवार आणि नागपंचमीनिमित्त वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर उजळून निघाले, भक्तांकडून जलाभिषेक
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप:
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी: मुंडेगाव ते पाडळीपर्यंत वाहनांच्या रांगा
संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
नाशिकमधील खड्डे पाहणीदरम्यान संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा खुलासा
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा कुणबी प्रमाणपत्राबाबत मोठा खुलासा
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... भावेश कावरेचं मोठं विधान
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... ब्रोकर भावेश कावरे ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाला?