AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3 महिन्यात 3 संघांसोबत भिडणार टीम इंडिया, वर्ल्डकप आधी भारताची कसोटी

भारतीय संघ पुढील तीन महिने व्यस्त राहणार आहे. कारण भारतीय संघाला तीन संघासोबत सीरीज खेळायच्या आहेत. ज्याचं वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केलंय.

3 महिन्यात 3 संघांसोबत भिडणार टीम इंडिया, वर्ल्डकप आधी भारताची कसोटी
Team india
| Updated on: Dec 08, 2022 | 9:59 PM
Share

मुंबई : टीम इंडिया (Team India) सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. भारत आणि बांगलादेश (Ind vs Ban) यांच्यात वनडे आणि टेस्ट सीरीज खेळली जात आहे. वनडे सीरीज गमवल्यानंतर आता टेस्ट सीरीज तरी टीम इंडिया जिंकणार का याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष लागून आहे. भारतीय चाहत्यांना पुढील 3 महिने क्रिकेटची मनसोक्त आनंद लुटता येणार आहे. कारण भारतीय संघ नॉन स्टॉप सामने खेळणार आहे.(BCCI announces schedule for home series against Sri Lanka, New Zealand and Australia)

बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघाच्या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ज्यामध्ये भारतीय संघ तीन देशांच्या संघासोबत भिडणार आहे. भारतीय संघ श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघासोबत सामने खेळणार आहे. हे तीन संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. जानेवारीत न्यूझीलंड आणि श्रीलंका संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. तर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया संघासोबत सामने खेळणार आहे.

श्रीलंका संघा विरुद्ध 3 टी20 सामने आणि 3 वनडे सामन्यांची सीरीज खेळली जाणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध ही टीम इंडिया 3 वनडे आणि 3 टी20 सामन्यांची सीरीज खेळणार आहे. तर बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील 4 टेस्ट सामने भारत ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका सीरीज (India vs Sri Lanka)

पहिला टी20 सामना – 3 जानेवारी (मुंबई) दुसरी टी20 सामना – 5 जानेवारी (पुणे) तिसरा टी20 सामना – 7 जानेवारी (राजकोट)

पहिला वनडे सामना – 10 जानेवारी (गुवाहाटी) दुसरा वनडे सामना – 12 जानेवारी (कोलकाता) तिसरा वनडे सामना – 15 जानेवारी (तिरुवनंतपुरम)

भारत विरुद्ध न्यूझीलंड सीरीज (India vs New Zealand)

पहिला वनडे सामना – 18 जानेवारी (हैदराबाद) दूसरा वनडे सामना – 21 जानेवारी (रायपूर) तीसरा वनडे सामना – 24 जानेवारी (इंदोर) पहिला टी20 सामना – 27 जानेवारी (रांची) दुसरा टी20 सामना – 29 जानेवारी (लखनऊ) तिसरा टी20 सामना – 1 फेब्रुवारी (अहमदाबाद)

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सीरीज (India vs Australia)

पहिला टेस्ट सामना – 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी (नागपूर) दुसरा टेस्ट सामना – 17 ते 21 फेब्रुवारी (दिल्ली) तिसरा टेस्ट सामना – 1 ते 5 मार्च (धर्मशाला) चौथा टेस्ट सामना – 9 ते 13 मार्च (अहमदाबाद) पहिला वनडे सामना – 17 मार्च (मुंबई) दुसरा वनडे सामना – 19 मार्च (विशाखापट्टणम) तिसरा वनडे सामना – 22 मार्च (चेन्नई)

तीन संघाविरुद्ध सीरीज खेळल्यानंतर टीम इंडियाला वर्ल्डकपची (World cup 2023) तयारी देखील करायची आहे. दुसरीकडे मार्च एप्रिलमध्ये आयपीएल (IPL) होणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना अनेक रोमहर्षक सामने पाहायला मिळणार आहेत.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.