AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियासाठी बीसीसीआयचा स्पेशल व्हिडिओ, रोहित शर्मा, विराट कोहली अन् टीम….

T20 world Champion Team India Arrives Delhi: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा, विराट कोहलीसह संपूर्ण टीम इंडियातील खेळाडू ट्रॉफीसह दिसून येत आहेत. रोहित शर्मा ट्रॉफीसोबत जल्लोष करतानाही दिसत आहे.

टीम इंडियासाठी बीसीसीआयचा स्पेशल व्हिडिओ, रोहित शर्मा, विराट कोहली अन् टीम....
रोहित, विराट ट्रॉफीसोबत
| Updated on: Jul 05, 2024 | 7:04 AM
Share

T20 world Champion Team India Arrives Delhi: टी 20 विश्वचषकातील भारतीय संघ मायदेशात दाखल झाला आहे. भारतीय संघाचे दिल्ली विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. भारतीय खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी टीम इंडियाचे फॅन्स मोठ्या संख्येने विमानतळावर जमले होते. भारतीय संघाच्या चाहत्यांकडून इंड‍िया-इंड‍िया अशा घोषणा दिल्या जात होत्या. टीम इंडियाच्या खेळाडूंना स्पेशल बसने विमानतळापासून हॉटेलपर्यंत नेण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

बीसीसीआयकडून व्हिडिओ शेअर

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा, विराट कोहलीसह संपूर्ण टीम इंडियातील खेळाडू ट्रॉफीसह दिसून येत आहेत. रोहित शर्मा ट्रॉफीसोबत जल्लोष करतानाही दिसत आहे. काही तासांत हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याला हजारो जणांना लाइक अन् कॉमेंट केल्या आहेत. या व्हिडिओनंतर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे कौतूक करण्यात आले आहे. It’s home असे दोन शब्दांचे कॅप्शन बीसीसीआयने व्हिडिओ ट्विट करताना दिले आहे.

यामुळे टीम इंडियाला उशीर

बारबाडोसमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा 29 जून रोजी 7 धावांनी पराभव केला. त्यानंतर 17 वर्षांनी भारतीय संघाने विश्वविजेतपदावर नाव कोरले. वेस्ट इंडिजमध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे सर्व विमाने बंद होती. विमानतळावरील सर्व ऑपरेशनही बंद होते. त्यामुळे 30 जून ते 3 जुलैपर्यंत भारतीय संघ वेस्ट इंडिजमधील हॉटेलमध्येच अडकला होता. चक्रीवादळ शांत झाल्यानंतर बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना आणण्यासाठी विशेष विमान पाठवले. त्या विमानाने भारतीय संघ 4 जुलै रोजी सकाळी दिल्ली विमानतळावर दाखल झाला. आता गुरुवारी भारतीय संघाची विजयी मिरवणूक मुंबईतून निघणार आहे.

रोहित शर्माच्या टीम इंडियाचा कार्यक्रम

  • 06:00 hrs: दिल्ली विमानतळावर आगमन
  • 06:45 तास: ITC मौर्या, दिल्ली येथे आगमन
  • 09:00 वाजता: ITC मौर्य येथून पंतप्रधान कार्यालयासाठी प्रस्थान
  • 10:00 – 12:00 वाजता: पंतप्रधान कार्यालयात समारंभ
  • 12:00 वाजता : ITC मौर्या साठी प्रस्थान
  • दुपारी 12:30: ITC मौर्या येथून विमानतळासाठी प्रस्थान
  • 14:00 वाजता: मुंबईसाठी प्रस्थान
  • 16:00 तास: मुंबई विमानतळावर आगमन
  • 17:00 वाजता: वानखेडे स्टेडियमवर आगमन
  • 17:00 – 19:00 वाजता: खुल्या बसमधून विजयी मिरवणूक
  • 19:00 – 19:30 वाजता: वानखेडे स्टेडियमवर छोटा समारंभ
  • 19:30 वाजता: हॉटेल ताजसाठी प्रस्थान

Follow Us
तुम्ही खातायेत कृत्रीम आंबे, नवी मुंबईत एफडीएच्या कारवाईत धक्कादायक...
तुम्ही खातायेत कृत्रीम आंबे, नवी मुंबईत एफडीएच्या कारवाईत धक्कादायक....
भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल
भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल.
डिझेल टंचाईचा फटका! हिंगोली-बीडमध्ये डिझेलसाठी झुंबड, हैराण वाहनधारक..
डिझेल टंचाईचा फटका! हिंगोली-बीडमध्ये डिझेलसाठी झुंबड, हैराण वाहनधारक...
माय पैनगंगा कोरडीठाक, पाण्याच्या थेंबासाठी पशूपक्ष्यांची भटकंती
माय पैनगंगा कोरडीठाक, पाण्याच्या थेंबासाठी पशूपक्ष्यांची भटकंती.
धक्कादायक! नाशिकच्या आयटी कंपनी प्रकरणातील मोठी अपडेट, त्या गोड पदार्थ
धक्कादायक! नाशिकच्या आयटी कंपनी प्रकरणातील मोठी अपडेट, त्या गोड पदार्थ.
सरकारचाच आधी एन्काऊंटर झाला पाहिजे, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्
सरकारचाच आधी एन्काऊंटर झाला पाहिजे, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्.
महाराष्ट्राच्या तिजोरीला 32 हजार कोटींची 'गळती', धक्कादायक अहवाल समोर
महाराष्ट्राच्या तिजोरीला 32 हजार कोटींची 'गळती', धक्कादायक अहवाल समोर.
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,.
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले....
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले.....