AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T 20 वर्ल्ड कप आधी India-Pakistan भिडणार, जाणून घ्या कुठल्यादिवशी होणार ही हाय वोल्टेज टक्कर

यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा (T 20 World cup) होणार आहे. या वर्ल्ड कप मध्ये सर्वात लक्षवेधी लढत ठरेल, ती भारत-पाकिस्तानची.

T 20 वर्ल्ड कप आधी India-Pakistan भिडणार, जाणून घ्या कुठल्यादिवशी होणार ही हाय वोल्टेज टक्कर
ind vs pakImage Credit source: AFP
| Updated on: Jul 07, 2022 | 12:25 PM
Share

मुंबई:  यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा (T 20 World cup) होणार आहे. या वर्ल्ड कप मध्ये सर्वात लक्षवेधी लढत ठरेल, ती भारत-पाकिस्तानची.  मागच्यावर्षी 2021 मध्ये टी 20 वर्ल्ड कप झाला. त्यावेळी सलामीच्या सामन्यात पाकिस्तानने भारताला (IND vs PAK) पराभूत केलं होतं. भारतीय संघाने त्या पराभवाचा वचपा काढावा, अशीच तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे. वर्ल्ड कप स्पर्धेआधी आशियातील हे दोन बलाढ्य संघ एका स्पर्धेत परस्परांना भिडणार आहेत. आशिया कप (Asia Cup) मध्ये ही लढत होईल. 27 ऑगस्टपासून श्रीलंकेत आशिया चषक स्पर्धेची सुरुवात होणार आहे. 28 ऑगस्टला भारत-पाकिस्तान मध्ये लढत होईल. आशिया चषक टी 20 फॉर्मेट मध्ये खेळला जाणार आहे. टी 20 वर्ल्ड कप तयारीच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची आहे. भारत-पाकिस्तान संघ 2021 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पहिल्यांदा आशिया कप स्पर्धेच्या निमित्ताने आमने-सामने येतील.

मागच्या पराभवाचा बदला घ्या

मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कपच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानने 10 विकेटने भारताचा पराभव केला होता. आशिया कप नंतर वर्ल्डकप 2022 मध्येही दोन्ही संघांमध्ये सामना होईल. 23 ऑक्टोंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानात ही मॅच होईल. म्हणजे दोन महिन्यात दोनदा क्रिकेट रसिकांना भारत-पाकिस्तान लढतीचा रोमांच अनुभवता येणार आहे.

आशिया चषक स्पर्धेत भारताचा रेकॉर्ड कसा आहे?

आशिया चषक स्पर्धेत भारताचा शानदार रेकॉर्ड आहे. भारताने 6 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. यापूर्वी भारताने शेवटचं 2018 मध्ये बांगलादेशला फायनल मध्ये नमवून आशियातील चॅम्पियन संघ बनण्याचा मान मिळवला होता. भारतानंतर श्रीलंकेने ही स्पर्धा 5 वेळा जिंकली आहे. पाकिस्तानच्या संघाला फक्त दोनदा आशिया चषक जिंकता आला आहे. पाकिस्तानने 2012 मध्ये शेवटची आशिया चषक स्पर्धा जिंकली होती.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप