AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket | प्रत्येकाला बीएमडब्ल्यू, तसेच टीमला 1 कोटी कॅश, अध्यक्षांचा शब्द

Cricket News | भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. टीमने ट्रॉफी जिंकल्यास प्रत्येक खेळाडूला बीएमडबल्यू आणि 1 कोटी रोख देणार असल्याची घोषणा अध्यक्षांनी केली आहे. जाणून घ्या नक्की अटी काय आहेत?

Cricket | प्रत्येकाला बीएमडब्ल्यू, तसेच टीमला 1 कोटी कॅश, अध्यक्षांचा शब्द
| Updated on: Feb 21, 2024 | 9:02 PM
Share

मुंबई | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. तर मालिकेतील चौथा सामना हा 23 फेब्रुवारीपासून रांचीत खेळवण्यात येणार आहे. त्याआधी भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी केलेल्या घोषणेची एकच चर्चा पाहायला मिळतेय. ही घोषणाच अशी आहे, ज्यामुळे प्रत्येक क्रिकेट चाहता थक्क झाला आहे. क्रिकेट अध्यक्षांनी नक्की काय घोषणा केली आहे, हे आपण जाणून घेऊयात.

रणजी ट्रॉफी स्पर्धेत यंदा हैदराबाद टीमने उल्लेखनीय कामगिरी करत प्लेट ग्रुपमधून अव्वल स्थान पटकावलं आहे. हैदराबादने अंतिम फेरीत मेघालयचा धुव्वा उडवत प्लेट ग्रुपमध्ये बाी मारली. त्यानंतर आता एचसीए अर्थात हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन मोहन राव अरिश्रपल्ली यांनी हैदराबादच्या खेळाडूंसाठी आगामी 3 हंगामात रणजी एलीट ट्रॉफी जिंकल्यास मोठं बक्षिस देणार असल्याची घोषणा केली आहे. जगन मोहन राव अरिश्रपल्ली यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

“जर टीमने पुढील 3 वर्ष रणजी ट्रॉफी स्पर्धेत एलीट ग्रुपमधून विजेतेपेट पटकावलं, तर प्रत्येक खेळाडूला बीएलडब्ल्यू आणि संघाला 1 कोटी रोख बक्षिस”, असं ट्विट जगन मोहन राव अरिश्रपल्ली यांनी केलं आहे. जगन मोहन राव अरिश्रपल्ली यांनी ट्विटमध्ये सचिन तेंडुलकर , बीसीसीआय सचिव जय शाह आणि इतरांना मेन्शन केलं आहे.

जगन मोहन राव अरिश्रपल्ली यांचं ट्विट

जगन मोहन राव अरिश्रपल्ली यांनी 20 फेब्रुवारी रोजी प्लेट ग्रुपमध्ये यशस्वी कामगिरी केल्यांनतर हैदराबाद टीमसाठी 10 लाख रुपये रोख बक्षिस म्हणून देणार असल्याचं जाहीर केलं. तसेच स्पर्धेत सर्वोत्तम कामिगरी केल्यामुळे कॅप्टन तिलक वर्मा याच्यासह एकूण 5 जणांना प्रत्येकी 50 हजार रुपये बक्षिसाची घोषणा केली. हैदराबादने प्लेट ग्रुपमध्ये बाजी मारली. त्यामुळे हैदराबाद टीम पुढील वेळेस एलीट ग्रुप सीमधून खेळेल.

नेमका फरक तरी काय?

देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा होत असतात. मात्र त्याचं स्वरुप क्रिकेट चाहत्यांना माहिती नसतं. आता रणजी ट्रॉफी स्पर्धेतील एलीट आणि प्लेट ग्रुप ही नक्की भानगड काय? याबाबतही क्रिकेट चाहत्यांमध्ये संभ्रम आणि गोंधळ आहे. आता या दोन्हीमध्ये नक्की फरक काय, हे आपण जाणून घेऊयात.

रणजी ट्रॉफी स्पर्धा ही 2 प्रकारात खेळली जाते. यात एलीट आणि प्लेट अशा 2 प्रकाराचा समावेश आहे. प्लेट ग्रुपमध्ये जिंकणारी टीम आगामी मोसमात एलीट ग्रुपमधून खेळण्यासाठी पात्र ठरते. तसेच एलीट ग्रुपमध्ये सर्वात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या संघाची रवानगी ही प्लेट ग्रुपमध्ये केली जाते.

हा आहे फरक

एलीट ग्रुपमध्ये 6 टीम असतात. एलीट ग्रुपमध्ये तब्बल 32 संघांचा समावेश असतो. या 32 संघांची विभागणी 8-8 हिशोबाने 4 गटात केली जाते. एलीट ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी. प्रत्येक ग्रुपमध्ये 8 संघ असतात. प्रत्येक टीम 7 सामने खेळते. प्रत्येक गटातील 2 अव्वल टीम क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरते. त्यानंतर पुढील सेमी फायनल, फायनल आणि अखेरीस विजेता संघ निश्चित होतो.

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...