AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explainer : मैदानात पडत असलेलं दव गोलंदाजांचं करिअर आणणार धोक्यात! सामन्यावर किती फरक पडतो? जाणून घ्या

क्रिकेट स्पर्धा सुरु झाल्यापासून काळानुरूप त्यात बरेच बदल होत गेले आहेत. नियम असो की इतर बाबींमध्ये बराच फरक पडला आहे. पूर्वी सामने दिवसा व्हायचे. आता सामने डे नाईट होतात, त्यामुळे मैदानात पडत असलेलं महत्त्वाची भूमिका बजावते. हे सर्व चित्र पाहता दोन्ही संघांना समान संधी मिळते का? असा प्रश्न उपस्थित होतो.

Explainer : मैदानात पडत असलेलं दव गोलंदाजांचं करिअर आणणार धोक्यात! सामन्यावर किती फरक पडतो? जाणून घ्या
Explainer : मैदानातील दव पाहता नाणेफेकीचा कौलच सामना फिरवतो! दोन्ही संघांना समान संधी मिळते का?
| Updated on: Dec 02, 2023 | 7:13 PM
Share

मुंबई : क्रिकेट स्पर्धेचं स्वरूप दिवसागणिक बदलत असल्याचं दिसून येत आहे. टेस्ट क्रिकेटनंतर, वनडे क्रिकेटला सुरुवात झाली. त्यानंतर छोट्या स्वरूपात झटपट खेळलं जाणारं क्रिकेट म्हणजे टी20..आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळाने अशी बरीच रुपं बदलली आहेत. दिवसा खेळला जाणारं क्रिकेट नंतर प्रकाशझोतात खेळलं जाऊ लागलं. वनडे स्पर्धेत डे नाईट, टी20 सामने तर पार संध्याकाळी होत आहेत. त्यात आता पिंक बॉल टेस्ट क्रिकेट सुरु केलं आहे. कसोटी सामना दिवस आणि रात्र असा खेळला जातो. पण संध्याकाळच्या वेळेत दव महत्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर खास रणनिती आखल्याचं दिसून येत आहे. दुसऱ्यांदा फलंदाजी करताना धावांचा पाठलाग करणं सोपं होतं असं एकंदरीत चित्र आहे. पण प्रत्येक वेळी असंच गणित असेल असं नाही.मात्र यामुळे दोन्ही संघांना समान संधी मिळते का? असा प्रश्न उपस्थित होतो.

प्रत्येक सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाची भूमिका बजावत आहे. संध्याकाळी पडणारं दव पाहता पहिल्यांदा गोलंदाजीला प्राधान्य दिलं जात आहे. कारण दुसऱ्या डावात गोलंदाजी करणं खूपच कठीण होतं. चेंडू ओला होत असल्याने पकड मिळणं कठीण होतं आणि गोलंदाजाची लाईन अँड लेंथ बिघडते. अनेकदा याबाबत आजी माजी खेळाडू सांगताना दिसतात. दव फॅक्टर महत्त्वाचं असल्याचं सांगतात.

कर्णधार नाणेफेकीचा कौल जिंकताच प्रथम गोलंदाजीला प्राधान्य देताना दिसत आहे. यासाठी अनेकदा कर्णधार दव पडत असल्याचं कारण देऊन नंतर फलंदाजी करणं सोपं होतं असं सांगतो. त्यामुळे खरंच दोन्ही संघांना समान संधी मिळते का? असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारत आहेत. भारत ऑस्ट्रेलिया तिसऱ्या टी20 सामन्यात असाच फटका टीम इंडियाला पडला. ग्लेन मॅक्सवेलने भारतीय गोलंदाजांना धु धु धुतला. सामन्यानंतर ऋतुराज गायकवाडने दव पराभवाला कारणीभूत असल्याचं सांगितलं होतं. तसेच चेंडू हातात पकडणं देखील कठीण होतं, असं सांगितलं.

क्रिकेटपटू आर. अश्विन याने दव पडत असल्याचं कारणामुळे सामने लवकर खेळवण्याचा सल्ला दिला होता. वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी त्याने याबाबत सांगितलं होतं. सामना पार दुपारी 1.30 वाजता सुरु करण्याऐवजी सकाळी 11.30 वाजता करावा असा सल्ला दिला होता. त्यामुळे धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला दव फॅक्टरचा फायदा मिळणार नाही. पण तसं काही झालं नाही,

ब्रॉडकास्टरचं गणित पाहता व्ह्यूअरशिपवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती आहे. पण त्यावरही अश्विनने सांगितलं की, क्रिकेटचे फॅन्स कधीही कोणत्याही वेळेला सामना पाहू शकतात. टी20 वर्ल्डकपही ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये हिवाळ्यात भरवला होता, यावरही त्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

Follow Us
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख