AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: वेंकटेश अय्यरला एक षटकही का दिलं नाही? शिखर धवनने सांगितलं कारण…

तब्बल सहा महिन्यानंतर भारतीय संघ वनडे फॉर्मेटमध्ये खेळत होता. बहुतांश खेळाडू खासकरुन गोलंदाजीमध्ये ती धार दिसली नाही. भारतीय संघ पाच गोलंदाजांना घेऊन खेळत होता.

IND vs SA: वेंकटेश अय्यरला एक षटकही का दिलं नाही? शिखर धवनने सांगितलं कारण...
| Edited By: | Updated on: Jan 20, 2022 | 3:17 PM
Share

पार्ल: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (INDvsSA) पहिल्या वनडे मॅचमध्ये काल भारताचा 31 धावांनी पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेने सहाबाद 296 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताने पन्नास षटकात सहाबाद 265 धावा केल्या. कर्णधार म्हणून काल केएल राहुलचा (KLRahul) पहिलाच सामना होता. तब्बल सहा महिन्यानंतर भारतीय संघ वनडे फॉर्मेटमध्ये खेळत होता. बहुतांश खेळाडू खासकरुन गोलंदाजीमध्ये ती धार दिसली नाही. भारतीय संघ पाच गोलंदाजांना घेऊन खेळत होता.

राहुलने अय्यरला एक षटकही दिलं नाही हार्दिक पांड्याच्या जागी अष्टपैलू म्हणून वेंकटेश अय्यरचा संघात समावेश करण्यात आला होता. कॅप्टन केएल राहुलने वेंकटेश अय्यर सहावा गोलंदाजीचा पर्याय आहे, असे सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले होते. काल प्रमुख गोलंदाज बावुमा आणि डुसेची भागीदारी फोडण्यात अपयशी ठरत होते. पण त्यावेळी राहुलने अय्यरकडून एक षटकही गोलंदाजी करुन घेतली नाही.

म्हणून दिली नाही बॉलिंग फलंदाजीमध्ये वेंकटेशने निराश केले. 7 चेंडूत त्याने फक्त दोन धावा केल्या. सामन्यानंतर शिखर धवनने वेंकटेश अय्यरकडून एक षटकही गोलंदाजी का करुन घेतली नाही? त्याचं कारण सांगितलं. “वेंकटेश अय्यरला गोलंदाजीला आणलं नाही. खेळपट्टीवर चेंडू वळत होते आणि फिरकी गोलंदाज चांगली बॉलिंग करत होते. मधल्याषटकांमध्ये वेगवान गोलंदाजांकडे चेंडू दिला नाही. फिरकी गोलंदाजांकडून बॉलिंग करुन घेतली” असे धवनने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले.

संघ हिताला प्राधान्य दिलं मधल्याषटकात भारताने जी खराब फलंदाजी केली, त्याबद्दलही धवनने आपलं मत मांडलं. धवनने (79) आणि कोहलीने (51) धावा केल्या. हे दोघे बाद होताच भारताचा डाव गडगडला. “परिस्थितीनुसार आम्ही खेळ केला. परिस्थितीची काय गरज आहे, संघ हिताला प्राधान्य दिलं. व्यक्तीगत खेळही महत्त्वाचा आहे” असे धवन म्हणाला. मधल्याफळीतल्या चुका कशा दुरुस्त करणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शिखरने, “एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही 2023 चा वर्ल्डकप डोळ्यासमोर ठेवून संघ बांधणी करत आहोत. त्यामुळे थोड्याफार काही गोष्टी वर-खाली होणार. एक संघ म्हणून आम्ही अजून काय चांगलं करु शकतो, याचा विचार करतो”

Dhawan reveals why Venkatesh Iyer didn’t bowl a single over during 1st ODI

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.