AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: वेंकटेश अय्यरला एक षटकही का दिलं नाही? शिखर धवनने सांगितलं कारण…

तब्बल सहा महिन्यानंतर भारतीय संघ वनडे फॉर्मेटमध्ये खेळत होता. बहुतांश खेळाडू खासकरुन गोलंदाजीमध्ये ती धार दिसली नाही. भारतीय संघ पाच गोलंदाजांना घेऊन खेळत होता.

IND vs SA: वेंकटेश अय्यरला एक षटकही का दिलं नाही? शिखर धवनने सांगितलं कारण...
| Edited By: | Updated on: Jan 20, 2022 | 3:17 PM
Share

पार्ल: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (INDvsSA) पहिल्या वनडे मॅचमध्ये काल भारताचा 31 धावांनी पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेने सहाबाद 296 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताने पन्नास षटकात सहाबाद 265 धावा केल्या. कर्णधार म्हणून काल केएल राहुलचा (KLRahul) पहिलाच सामना होता. तब्बल सहा महिन्यानंतर भारतीय संघ वनडे फॉर्मेटमध्ये खेळत होता. बहुतांश खेळाडू खासकरुन गोलंदाजीमध्ये ती धार दिसली नाही. भारतीय संघ पाच गोलंदाजांना घेऊन खेळत होता.

राहुलने अय्यरला एक षटकही दिलं नाही हार्दिक पांड्याच्या जागी अष्टपैलू म्हणून वेंकटेश अय्यरचा संघात समावेश करण्यात आला होता. कॅप्टन केएल राहुलने वेंकटेश अय्यर सहावा गोलंदाजीचा पर्याय आहे, असे सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले होते. काल प्रमुख गोलंदाज बावुमा आणि डुसेची भागीदारी फोडण्यात अपयशी ठरत होते. पण त्यावेळी राहुलने अय्यरकडून एक षटकही गोलंदाजी करुन घेतली नाही.

म्हणून दिली नाही बॉलिंग फलंदाजीमध्ये वेंकटेशने निराश केले. 7 चेंडूत त्याने फक्त दोन धावा केल्या. सामन्यानंतर शिखर धवनने वेंकटेश अय्यरकडून एक षटकही गोलंदाजी का करुन घेतली नाही? त्याचं कारण सांगितलं. “वेंकटेश अय्यरला गोलंदाजीला आणलं नाही. खेळपट्टीवर चेंडू वळत होते आणि फिरकी गोलंदाज चांगली बॉलिंग करत होते. मधल्याषटकांमध्ये वेगवान गोलंदाजांकडे चेंडू दिला नाही. फिरकी गोलंदाजांकडून बॉलिंग करुन घेतली” असे धवनने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले.

संघ हिताला प्राधान्य दिलं मधल्याषटकात भारताने जी खराब फलंदाजी केली, त्याबद्दलही धवनने आपलं मत मांडलं. धवनने (79) आणि कोहलीने (51) धावा केल्या. हे दोघे बाद होताच भारताचा डाव गडगडला. “परिस्थितीनुसार आम्ही खेळ केला. परिस्थितीची काय गरज आहे, संघ हिताला प्राधान्य दिलं. व्यक्तीगत खेळही महत्त्वाचा आहे” असे धवन म्हणाला. मधल्याफळीतल्या चुका कशा दुरुस्त करणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शिखरने, “एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही 2023 चा वर्ल्डकप डोळ्यासमोर ठेवून संघ बांधणी करत आहोत. त्यामुळे थोड्याफार काही गोष्टी वर-खाली होणार. एक संघ म्हणून आम्ही अजून काय चांगलं करु शकतो, याचा विचार करतो”

Dhawan reveals why Venkatesh Iyer didn’t bowl a single over during 1st ODI

Follow Us
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...