AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Duleep Trophy 2024 : इंडिया ए संघ श्रेयस अय्यरवर पडला भारी, 186 धावांनी पाजलं पराभवाचं पाणी

दुलीप ट्रॉफी स्पर्धेत इंडिया ए आणि इंडिया डी या संघात सामना पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वातील इंडिया डी संघाने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय फसला आणि पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

Duleep Trophy 2024 : इंडिया ए संघ श्रेयस अय्यरवर पडला भारी, 186 धावांनी पाजलं पराभवाचं पाणी
| Updated on: Sep 15, 2024 | 3:24 PM
Share

दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेत इंडिया ए आणि इंडिया डी यांच्यात लढत झाली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर श्रेयस अय्यरने गोलंदाजी निवडली. प्रथम गोलंदाजी करताना इंडिया ए संघाच्या आघाडीचे फलंदाज झटपट बाद केले. पण मधल्या फळीतील शम्स मुलानी त्यांच्यावर भारी पडला. त्याने 187 चेंडूत 89 धावा केल्या. तसेच त्याला तरुण कोटियनची साथ मिळाली. त्याने 80 चेंडूत 53 धावांची खेळी केली आणि संघाला 290 धावांपर्यंत पोहोचवलं. या धावांचा पाठलाग करताना श्रेयस अय्यरचा संघ गडबडला. कर्णधार श्रेयस अय्यरला आपल खातं खोलता आलं नाही. त्यामुळे संघाला सर्वबाद 183 धावांपर्यं मजल मारता आली. इंडिया ए संघाकडे 107 धावांची आघाडी होती. त्यात दुसऱ्या डावात इंडिया ए संघाने त्यात 3 गडी बाद 380 धावा जोडल्या. प्रथम सिंगने 122 आणि तिलक वर्माने 111 धावांची खेळी केली. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या संघापुढे 487 धावांचं आव्हान मिळालं. हे आव्हान खरं तर खूपच मोठं होतं आणि सावध खेळीशिवाय पर्याय नव्हता.

विजयी धावांचा पाठलाग करताना श्रेयस अय्यरच्या संघाला सुरुवातीलाच धक्का बसला.अथर्व तायडेला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर रिक भूईने एका बाजूने मोर्चा सांभाळला आणि 195 चेंडूत 113 धावा केल्या. श्रेयस अय्यरने 41, संजू सॅमसनने 40 धावांची खेळी केली. पण विजयी धावांपर्यंत पोहोचवण्यात अपयश आलं. दोघांना मोठी धावसंख्या करण्यात अपयश आलं. श्रेयस अय्यरचा संघ सर्वबाद 301 धावांपर्यंत मजल मारू शकला. इंडिया संघाने 186 धावांनी विजय मिळवला. इंडिया डी संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे.

दुसऱ्या डावात इंडिया ए संघाकडून तनुष कोटियनने सर्वाधिक 4 गडी बाद केले. शम्स मुलानीने 3 गडी, खलील अहमद आणि रियान परागने प्रत्येकी 1 गडी बाद केला. आता इंडिया डी संघाचा पुढचा आणि शेवटचा सामना इंडिया बी संघासोबत आहे. हा सामना 19 सप्टेंबरला सुरु होणार आहे. पण या सामन्यात विजय मिळवूनही इंडिया डी संघाला काही एक उपयोग होणार नाही. कारण दोन सामन्यात पराभव झाल्याने 0 गुणांसह तळाशी आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.