AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Duleep Trophy 2024 : इंडिया ए संघ श्रेयस अय्यरवर पडला भारी, 186 धावांनी पाजलं पराभवाचं पाणी

दुलीप ट्रॉफी स्पर्धेत इंडिया ए आणि इंडिया डी या संघात सामना पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वातील इंडिया डी संघाने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय फसला आणि पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

Duleep Trophy 2024 : इंडिया ए संघ श्रेयस अय्यरवर पडला भारी, 186 धावांनी पाजलं पराभवाचं पाणी
| Updated on: Sep 15, 2024 | 3:24 PM
Share

दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेत इंडिया ए आणि इंडिया डी यांच्यात लढत झाली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर श्रेयस अय्यरने गोलंदाजी निवडली. प्रथम गोलंदाजी करताना इंडिया ए संघाच्या आघाडीचे फलंदाज झटपट बाद केले. पण मधल्या फळीतील शम्स मुलानी त्यांच्यावर भारी पडला. त्याने 187 चेंडूत 89 धावा केल्या. तसेच त्याला तरुण कोटियनची साथ मिळाली. त्याने 80 चेंडूत 53 धावांची खेळी केली आणि संघाला 290 धावांपर्यंत पोहोचवलं. या धावांचा पाठलाग करताना श्रेयस अय्यरचा संघ गडबडला. कर्णधार श्रेयस अय्यरला आपल खातं खोलता आलं नाही. त्यामुळे संघाला सर्वबाद 183 धावांपर्यं मजल मारता आली. इंडिया ए संघाकडे 107 धावांची आघाडी होती. त्यात दुसऱ्या डावात इंडिया ए संघाने त्यात 3 गडी बाद 380 धावा जोडल्या. प्रथम सिंगने 122 आणि तिलक वर्माने 111 धावांची खेळी केली. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या संघापुढे 487 धावांचं आव्हान मिळालं. हे आव्हान खरं तर खूपच मोठं होतं आणि सावध खेळीशिवाय पर्याय नव्हता.

विजयी धावांचा पाठलाग करताना श्रेयस अय्यरच्या संघाला सुरुवातीलाच धक्का बसला.अथर्व तायडेला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर रिक भूईने एका बाजूने मोर्चा सांभाळला आणि 195 चेंडूत 113 धावा केल्या. श्रेयस अय्यरने 41, संजू सॅमसनने 40 धावांची खेळी केली. पण विजयी धावांपर्यंत पोहोचवण्यात अपयश आलं. दोघांना मोठी धावसंख्या करण्यात अपयश आलं. श्रेयस अय्यरचा संघ सर्वबाद 301 धावांपर्यंत मजल मारू शकला. इंडिया संघाने 186 धावांनी विजय मिळवला. इंडिया डी संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे.

दुसऱ्या डावात इंडिया ए संघाकडून तनुष कोटियनने सर्वाधिक 4 गडी बाद केले. शम्स मुलानीने 3 गडी, खलील अहमद आणि रियान परागने प्रत्येकी 1 गडी बाद केला. आता इंडिया डी संघाचा पुढचा आणि शेवटचा सामना इंडिया बी संघासोबत आहे. हा सामना 19 सप्टेंबरला सुरु होणार आहे. पण या सामन्यात विजय मिळवूनही इंडिया डी संघाला काही एक उपयोग होणार नाही. कारण दोन सामन्यात पराभव झाल्याने 0 गुणांसह तळाशी आहे.

Follow Us
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?