AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Indians च्या ‘या’ प्लेयरला ODI वर्ल्ड कप टीममध्ये स्थान द्या, रवी शास्त्रींचा महत्त्वाचा सल्ला

ODI World Cup 2023 | वर्ल्ड कप टीममध्ये त्याला घेतल्यास डबल फायदा. टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री यांनी वर्ल्ड कपची टीम निवडणाऱ्या सिलेक्टर्सना महत्त्वाचा सल्ला दिलाय.

Mumbai Indians च्या 'या' प्लेयरला ODI वर्ल्ड कप टीममध्ये स्थान द्या, रवी शास्त्रींचा महत्त्वाचा सल्ला
Ravi Shastri
| Updated on: Aug 17, 2023 | 11:02 AM
Share

मुंबई : टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात टेस्ट, वनडे आणि टी 20 मध्ये दोन खेळाडूंनी आपली छाप उमटवली. सकारात्मक आणि बिनधास्त खेळण्याचा त्यांची पद्धत अनेकांना भावली. टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू सुद्धा त्यांच्या खेळाने प्रभावित झाले आहेत. टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री यांनी वर्ल्ड कपची टीम निवडणाऱ्या सिलेक्टर्सना महत्त्वाचा सल्ला दिलाय. 39, 51, 49, 7 आणि 27 वेस्ट इंडिज विरुद्ध पाच सामन्यांच्या T20 सीरीजमध्ये त्याने हा परफॉर्मन्स केला. सहाजिकच डेब्यु सीरीजमध्ये ही जबरदस्त कामगिरी आहे.

त्यामुळे सहाजिकच तिलक वर्माचा वनडे वर्ल्ड कपसाठी निवडल्या जाणाऱ्या टीममध्ये समावेश करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. रवी शास्त्री यांनी सुद्धा असाच सल्ला दिलाय.

‘हे भारतीय सिलेक्टर्सना माहित’

“कोण फॉर्ममध्ये आहे, हे भारतीय सिलेक्टर्सना माहित आहे. त्यामुळे वर्ल्ड कपसाठी त्यांची निवड करा. तिलक वर्मा फॉर्ममध्ये आहे, तर त्याला निवडा. यशस्वी जैस्वाल फॉर्ममध्ये असेल, तर त्याला सुद्धा निवडा” असं रवी शास्त्री स्टार स्पोर्ट्सवर म्हणाले. तिलक वर्मा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो.

त्याला निवडण्याचे दोन फायदे

बॉलवर बिनधास्तपणे प्रहार करणाऱ्या तिलक वर्मामुळे टॉप ऑर्डरमध्ये लेफ्टी बॅट्समनचा पर्याय मिळतो. त्याला निवडल्यास फिरकी गोलंदाजीचा सुद्धा पर्याय मिळेल. तो टीमसाठी जमेची बाजू ठरेल. रवी शास्त्री यांनी यशस्वी जैस्वालला सुद्धा पाठिंबा दिला. टेस्ट आणि टी 20 मध्ये यशस्वीने जोरदार सुरुवात केलीय. त्यामुळे त्याची सुद्धा वनडे वर्ल्ड कप टीममध्ये निवड करावी, असं रवी शास्त्री यांचं मत आहे. वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची निवड कधी?

येत्या 5 सप्टेंबरला वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया निवडली जाणार आहे. सुरुवातीला 18 सदस्यीस संघ निवडला जाईल, नंतर अंतिम 15 प्लेयर्सची निवड केली जाईल. तिलक वर्माने वेस्ट इंडिज सीरीजमध्ये तडाखेबंद बॅटिंग दाखवली आहे. त्यामुळे सिलेक्टर्सची डोकेदुखी वाढली आहे. वर्माच नाही, यशस्वी जैस्वाल आणि इशान किशन यांचा सुद्धा वनडे वर्ल्ड कप टीममध्ये समावेश करावा, असं रवी शास्त्री यांचं मत आहे.

Follow Us
मराठी न आल्यास रिक्षा चालकांचा परवाना रद्द, या तारखेपासून नियम लागू
मराठी न आल्यास रिक्षा चालकांचा परवाना रद्द, या तारखेपासून नियम लागू.
हातात पिस्तूल, पैशांचे बंडल, अन्... अमरावतीतील आरोपीची रॉयल लाईफस्टाईल
हातात पिस्तूल, पैशांचे बंडल, अन्... अमरावतीतील आरोपीची रॉयल लाईफस्टाईल.
जय पवारांचं प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवणार, कारण...
जय पवारांचं प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवणार, कारण....
अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात अल्पवयीन मुलीने दिली संवेदनशील माहिती
अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात अल्पवयीन मुलीने दिली संवेदनशील माहिती.
नाशिक आयटी कंपनीतील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी
नाशिक आयटी कंपनीतील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी.
मुंबईतील ड्रग्स प्रकरणाचं बॉलिवूड कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर
मुंबईतील ड्रग्स प्रकरणाचं बॉलिवूड कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर.
देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना ओपन चॅलेंज, म्हणाले...
देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना ओपन चॅलेंज, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल, अडीच वर्षे झाली तरी आरक्ष
सुप्रिया सुळेंचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल, अडीच वर्षे झाली तरी आरक्ष.
गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळाव
गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळाव.
महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले "हे आधीच..
महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले