AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करणार का? हार्दिक पंड्या म्हणाला…

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आज या दोन आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सामना खेळवला जात आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करणार का? हार्दिक पंड्या म्हणाला...
Hardik-Pandya
| Edited By: | Updated on: Oct 24, 2021 | 8:36 PM
Share

दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आज या दोन आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सामना खेळवला जात आहे. विश्वचषक स्पर्धा सुरु होण्याच्या आधीपासूनच एका भारतीय खेळाडूची मोठी चर्चा आहे. तो खेळाडू म्हणजे अष्टपैलू हार्दिक पंड्या. आजच्या सामन्यात नाणेफेक झाल्यानंतर पंड्या स्टार स्पोर्ट्सच्या एका मुलाखती बोलत असताना त्याला गोलंदाजी करणार का? असा सवाल करण्यात आला, त्यावर पंड्या म्हणाला की, “माझी पाठ आता ठीक आहे. ही एक मोठी समस्या होती, परंतु मी सध्या गोलंदाजी करणार नाही. मी हळू हळू गोलंदाजी सुरू करेन. नॉकआउट सामन्यांच्या दरम्यान मी गोलंदाजी करण्यास सुरुवात करेन. तज्ज्ञांशी चर्चा करुन मला याबातचा निर्णय घ्यावा लागणार आहे. (Hardik pandya breaks silence over bowling against pakistan match in t20 world cup 2021)

आजच्या सामन्याबद्दल पंड्या म्हणाला, “मला परिस्थितीच्या जास्त प्रचारात जायचे नाही. माझ्या कुटुंबानेही याची खात्री केली आहे. मी सोशल मीडियापासून दूर राहतो कारण हे सर्व पाहून तुम्ही आणखी रोमांचित व्हाल. हे अगदी सोपे आहे, आम्ही आमच्या भावनिक होत नाही आणि गोष्टींकडे व्यावसायिक पद्धतीने पाहतो. आम्ही सर्वकाही तयार करण्याचे आणि योग्य प्रक्रियेचे पालन करण्याचे सुनिश्चित करतो. ”

भारत अडचणीत

भारत आणि पाकिस्तान या बहुप्रतिक्षित सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक झाली असून पाकिस्तानने नाणेफेक जिंकली आहे. पाकिस्तानच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या भारताची बिकट अवस्था झाली आहे. भारताने पहिल्याच षटकात धडाकेबाज रोहित शर्माची विकेट गमावली तर तिसऱ्या षटकात के. एल. राहुलची विकेट गमावली. त्यानंतर सहाव्या षटकात सूर्यकुमार यादवची विकेट गमावली आहे. त्यामुळे भारताची 6 षटकात 3 बाद 36 अशी अवस्था झाली आहे.

भारताचे अंतिम 11

केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती

पाकिस्तानचे अंतिम 11

बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरीस रौफ, हैदर अली.

इतर बातम्या

India vs Pakistan T20 world cup 2021 LIVE Score: भारत विरुद्ध पाकिस्तान आमने-सामने, महामुकाबल्याला अवघे काही तास शिल्लक

India vs Pakistan: मला यावेळी पाकिस्तानचं पारडं अधिक जड वाटतंय, ‘या’ नेत्याकडून टीम इंडियाला सावधगिरीचा इशारा

T20 World Cup 2021 Ind vs Pak : वसीम जाफरनं वात पेटवली, पाकिस्तानच्या वर्मावर बोट, भन्नाट मीम्सद्वारे डिवचलं

(Hardik pandya breaks silence over bowling against pakistan match in t20 world cup 2021)

Follow Us
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.