AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Pandya: संजू सॅमसनला का संधी दिली नाही? पंड्याने सांगितलं त्यामागचं कारण…

हार्दिक म्हणाला, कोण दु:खी असेल, तर त्याने....

Hardik Pandya: संजू सॅमसनला का संधी दिली नाही? पंड्याने सांगितलं त्यामागचं  कारण...
Hardik-pandya Image Credit source: PTI
| Updated on: Nov 23, 2022 | 1:29 PM
Share

नेपियर: न्यूझीलंडमध्ये T20 सीरीज जिंकल्यानंतर हार्दिक पंड्याला एक प्रश्न विचारण्यात आला. तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांना सुद्धा पडलेला हा प्रश्न आहे, असं म्हटल्यास हरकत नाही. शेवटच्या टी 20 सामन्यात उमरान मलिक आणि संजू सॅमसनला संधी का दिली नाही? हार्दिक पंड्याने या प्रश्नावर उत्तर दिलय. “रणनीतिक कारणांमुळे सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं नाही. कोण दु:खी असेल, तर चर्चेसाठी दरवाजे नेहमी उघडे आहेत” असं हार्दिकने सांगितलं.

माझा विश्वास नाही

“प्रत्येक खेळाडूला पुरेशा संधी मिळतील. अजून बराच वेळ बाकी आहे. ही तीन मॅच ऐवजी मोठी सीरीज असती, तर नक्कीच आम्ही त्यांना संधी दिली असती. कमी सामने असलेल्या सीरीजमध्ये फार बदल करण्यावर माझा विश्वास नाही” असं हार्दिक म्हणाला.

मला भावना कळतात

“माझे सर्व खेळाडूंसोबत चांगले संबंध आहेत. ज्यांना संधी मिळाली नाहीय, त्यांना माहितीय, हे काही व्यक्तीगत कारण नाही. टीम कॉम्बिनेशनमुळे त्यांना संधी मिळालेली नाही. जर कुठल्या खेळाडूला यापेक्षा काही वेगळं वाटत असेल, तर माझे दरवाजे नेहमी उघडे आहेत. ते माझ्याशी बोलू शकतात. मला त्यांच्या भावना माहित आहेत” असं हार्दिकने सांगितलं.

सॅमसनचा विषय दुर्भाग्यपूर्ण

“सॅमसनचा विषय दुर्भाग्यपूर्ण आहे. आम्हाला त्याला खेळवायच होतं. पण रणनीतिक कारणांमुळे तो प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळवू शकला नाही” असं हार्दिक म्हणाला.

सॅमसनला 7 वर्षात फक्त इतक्या मॅचमध्ये संधी

संजू सॅमसनने टीम इंडियासाठी 2015 साली टी 20 मध्ये डेब्यु केला. मागच्या सात वर्षात हा खेळाडू भारताकडून फक्त 16 टी 20 सामने खेळलाय. त्याच्या नावावर फक्त 10 वनडे सामने आहेत. दुसऱ्याबाजूला पंतला अपयशी ठरुनही अनेक संधी मिळाल्या आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.